शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

रोजचंच रडगाणं ! मध्य रेल्वे विस्कळीत, आसनगाव ते वाशिंद रेल्वेसेवा पुन्हा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 10:09 IST

मध्य रेल्वेची वाहतूक सेवेवर पुन्हा परिणाम झाला आहे. यामुळे मंगळवारचा दिवसही मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी त्रासदायकच ठरणार आहे. आसनगाव ते वाशिंददरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. ट्रॅक खालील भराव खचल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.

कल्याण, दि. 5 - मध्य रेल्वेची वाहतूक सेवेवर पुन्हा परिणाम झाला आहे. यामुळे मंगळवारचा दिवसही मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी त्रासदायकच ठरणार आहे. आसनगाव ते वाशिंददरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. ट्रॅक खालील भराव खचल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. उशीर होत असल्याने हैराण झालेल्या प्रवाशांनी अखेर ट्रॅकवर उतरुन चालत पुढील स्टेशन गाठलं. मध्य रेल्वेच्या सततच्या कटकटीला कंटाळलेले प्रवासी संपात व्यक्त करत आहेत.  या खोळंब्यामुळे सकाळपासून मध्य रेल्वेची आसनगाव ते वासिंद रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण-कसारा रेल्वे मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. 29 ऑगस्ट रोजी  मध्य रेल्वेच्या आसनगाव-वासिंद स्थानकांदरम्यान नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस घसरून मोठा अपघात झाला होता. आसनगाव आणि वाशिंददरम्यात वेहरोळी वस्तीजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरले होते.  रेल्वे रुळावर पावसामुळे दगड-माती आल्यानं मंगळवारी (29 ऑगस्ट) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.   यानंतर तब्बल 4 दिवस या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. शनिवारी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: खुला करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा भराव खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे