शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

मराठा मूकमोर्चाची गर्जना हृदय छेदून गेली- फडवणीस

By admin | Updated: October 7, 2016 19:42 IST

मराठ्यांनी मुकमोर्चे शांततेत, शिस्तीत काढले. मात्र त्याची महागर्जना आमच्या कानीच पोहोचली नाही तर हृदय छेदून गेली. कोपर्डी घटनेतील नराधमांना

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.07 -  मराठ्यांनी मुकमोर्चे शांततेत, शिस्तीत काढले. मात्र त्याची महागर्जना आमच्या कानीच पोहोचली नाही तर हृदय छेदून गेली. कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी व मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षमपणे प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हिंगोली येथे भाजपतर्फे आयोजित शेतकरी व बचत गट मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दिलीप कांबळे, खा. बंडू जाधव, आ.तुषार राठोड, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. सुभाष वानखेडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मराठा समाजाचे मुकमोर्चे काही राजकीय नाहीत. एवढी विक्रमी मोर्चे काढणे कुणालाही शक्य नाही. हा समाजाचा आक्रोश आहे. आरक्षण देण्याचीच आमची भूमिका आहे. त्यासाठी सक्षम वकील लावले. आतापर्यंत सत्तेत असणाºयांनी कायदेशीर प्रक्रिया न करता लोकसभेच्या निवडणुकीनंतर पायाखालची वाळू घसरल्याने हा निर्णय घेतला. त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र आम्ही आरक्षणासाठी कायदा केला. आता सक्षमपणे ही बाजू मांडू. आरक्षणच नव्हे, तर कोपर्डीच्या आक्रोशातही काही मंडळी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांना ती सवयच आहे. मात्र त्यांना त्यांची जागा दाखवा. आरक्षणात शासकीय संस्थांच्या ६ हजारपैकी ९00 जागाच मराठा मुलांना मिळतील. मात्र १.४५ लाख जागा या खाजगी कॉलेजात भरल्या जातात. तेथे किती मराठ्यांना मोफत प्रवेश मिळाला? असा सवाल त्यांनी केला. मात्र उच्च शिक्षणासाठी आता शासन खर्च करेल, असे ते म्हणाले.
तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ५ लाख जणांना रोजगार संधी उपलब्ध करून देवू. तर  सिंचनक्षेत्र वाढीसाठी सरकार नियोजन करीत असून ९५ हजार कोटींचा निधी उभारून विविध प्रकल्प मार्गी लावले जातील, असेही ते म्हणाले. तर जगातील सर्वात मोठा राजा छञपती शिवाजी महाराजांचे स्मारकही तेवढेच मोठे उभारले जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वीज व पाणीप्रश्न सोडला तर शेतकरी कुणाच्याही दारी भीक मागणार नाही. हे दोन्ही प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सरकार काम करीत आहे. ९५ हजार कोटींची कामे करायची आहेत. त्यासाठी नाबार्डकडून ६ टक्के व्याजाने १६८00 कोटी, केंद्राचे १५ हजार कोेटी व उर्वरित राज्य शासन नियमित तरतूद करणार आहे. तर हिंगोलीचा १७00 कोटी रुपयांचा अनुशेष निघत असून तो राज्यपालांच्या मंजुरीनंतर तीन वर्षांत भरून काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या काळातील विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.  
 
उच्च शिक्षण, आरोग्यसेवा विनामूल्य करू
फडणवीस म्हणाले, आगामी काळात शेतकरी व गोरगरिबांना १२00 आजारांवर विनामूल्य उपचारासाठी म.फुले जनारोग्य योजना आखली आहे. यासाठी काही उद्योगपती व सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तर सध्या ७५0 स्मार्ट गावे केली असून २0१८ पर्यंत २९ हजार गावांपर्यंत हा लाभ पोहोचवू. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे शहरी शिक्षण व आरोग्य सेवांचा लाभ ग्रामीण भागात मिळेल. एवढेच नव्हे, तर उच्च शिक्षणासाठी शेतकºयांच्या मुलाचा खर्च शासन करेल, असेही ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेत सहा हजार गावे दुष्काळमुक्त झाली. २0१९ पर्यंत २0 हजार गावे दुष्काळमुक्त होतील, असेही फडणवीस म्हणाले. कौशल्या विकासात कृषीपूर उद्योगांचे प्रशिक्षण अन् अण्णासाहेब आर्थिक महामंडळामार्फत ५ लाख जणांना कर्जपुरवठा करणार असल्याचेही सांगितले.