शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

मुंबईवरचा धोका टळला; ओखी चक्रीवादळ गुजरातकडे सरकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 19:44 IST

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ओखी चक्रीवादळ ताशी २१ किलोमीटर या वेगाने गुजरातकडे सरकले असतानाच; चक्रीवादळाचा विपरित परिणाम म्हणून मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग संथ झाला होता.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ओखी चक्रीवादळ ताशी 21 किलोमीटर या वेगाने गुजरातकडे सरकल्यामुळे मुंबईवरचा धोका टळला आहे. चक्रीवादळाचा विपरित परिणामामुळे मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरांत पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग संथ झाला होता. चक्रीवादळासह पावसामुळे मंगळवारी मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या असतानाच उर्वरित दैनंदिन व्यवहारही धीम्या गतीने सुरू होते. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकही काही अंशी धीम्या गतीने सुरू असतानाच मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलही स्लो ट्रॅकवर आली होती.ओखी चक्रीवादळाचा मुंबईला प्रत्यक्ष फटका बसला नसला तरी हवामान खात्याने दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्वच आपत्कालीन यंत्रणा सतर्क असल्याने पाऊस वगळता सुदैवाने मुंबईकरांना वादळाला सामोरे जावे लागले नाही. दरम्यान, समुद्रात मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर घोंगावत असलेले ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेन सरकले आहे.केरळ आणि तामिळनाडूचे अतोनात नुकसान करणारे ओखी चक्रीवादळ वा-याच्या वेगाने गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकत होते. वादळ जसजसे वेगाने पुढे सरकत होते; तसतसे वा-याचा वेगही काही अंशी कमी होत होता. गोवा आणि महाराष्ट्राच्या किना-यापर्यंत येईस्तोवर वादळाचा वेग ताशी एकवीस किलोमीटर एवढा झाला होता. चक्रीवादळाचा विपरित परिणाम म्हणून राज्यासह मुंबईत पाऊस पडेल, अशी शक्यताही भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, सोमवारी दिवसभर मुंबईतले वातावरण ढगाळ राहिले. आणि सायंकाळी सहानंतर सुरु झालेल्या पावसाने आपला मारा मंगळवारी दिवसभर कायम ठेवला.सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत फोर्ट, नरिमन पॉइंटपासून दहिसर आणि मुलुंडपर्यंतच्या परिसराला अक्षरश: गारद केले. विशेषत: मंगळवारी सकाळीच पावसाने जोर धरला. दुपारचे काही क्षण वगळता तीननंतर पावसाने पुन्हा आपला वेग पकडला. मुळात भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी सतर्कता बाळगल्याचे चित्र होते. मंगळवारी सकाळी निर्माण झालेले वातावरण पाहूनच अनेकांनी घराबाहेरचा रस्ता धरण्याचे काही प्रमाणात टाळल्याचे चित्र होते. सकाळाच्या पावसाचा वेग किंचितसा कमी झाल्यानंतर मात्र मुंबईकरांची पाऊले कार्यालयांकडे वळल्याची चित्र होते.दरम्यानच्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर पाऊसाचा धिंगाणा सुरुच होता. पावसाचा वेग आणि मारा कमी असल्याने कोठेही पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. विशेष म्हणजे पावसाचा मारा सुरु असतानादेखील जंक्शन स्पॉट वगळता वाहतूक कोंडीच्या फारशा तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचे चित्र होते..........................................पावसाचा इशारा कायमवल्साड, सुरत, नवसारी, भरुच, दंग, तापी, अमरेली, गिर-सोमनाथ, भावनगर, दिव, दमण, दादरा-नगर हवेली या परिसरात बुधवारी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किना-यावर बुधवारी ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. ठिकठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरण बुधवारी ढगाळ राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे..........................................खवळलेला समुद्रसोमवारी सायंकाळपासून खवळलेल्या समुद्राचे तांडव मंगळवारी दिवसभर कायम होते. मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटीसह वर्सोवा चौपाटीवर उसळलेल्या समुद्रांच्या लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती. प्रत्यक्षात मात्र मुंबईपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ओखी वादळाने दक्षिण गुजरातकडे आगेकुच केल्याने मुंबईकरांच्या जीवात जीव आल्याचे चित्र होते..........................................अनुयायांना फटकामहापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर देशासह राज्यातून दाखल झालेल्या लाखो अनुयायांना ओखी वादळामुळे पडलेल्या पावसाचा फटका बसला. पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात चिखल झाल्याने अनुयायांना लगतच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. दरम्यान, हवामान खात्याने जर पावसाचा इशारा दिला होता तर महापालिकेने अगोदरच अनुयायांची पर्यायी व्यवस्था का केली नाही? असा सवालही आता उपस्थित झाला आहे..........................................तैनात है हम्म...राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्यांना मुंबईत तैनात करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्याही सतर्क होत्या. जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्टही सतर्क होते..........................................परतलेल्या बोटीजिल्हा समुद्रात गेलेल्या बोटींची संख्या परतलेल्या बोटी बेपत्ता बोटीमुंबई ९४३ ९४३ ०रायगड २५१ २५० १पालघर ६९४ ६९४ ०ठाणे ६९० ६९० ०रत्नागिरी २८ २८ ०एकूण २६०६ २६०५ १.........................................देवगड बंदर, सिंधुदुर्ग - ६३ बोटी - ८०९ मच्छिमाररत्नागिरी जिल्हयातील वेगवेगळ्या बंदरावर ७९ बोटी आणि १ हजार ४७६ मच्छिमारांनी आश्रय घेतला आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळMumbaiमुंबई