शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

रायसोनी समूहाच्या १३ पदाधिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: October 7, 2016 19:18 IST

विविध योजनांचे आमिष दाखवून गुतंवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी समूहाच्या (बीएचआर) १३ पदाधिकाऱ्यांना राज्य गुन्हे

ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 07 -  विविध योजनांचे आमिष दाखवून गुतंवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी समूहाच्या (बीएचआर) १३ पदाधिकाऱ्यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने १३ आरोपींना १० आॅक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीएचआरच्या राजापेठस्थित शाखेने गुतवंणूकदारांची तब्बल १० कोटी ५२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. संचालक प्रमोद भाईचंद रायसोनी, दिलीप कांतीलाल चोरडीया, मोतीलाल ओंकार गिरी, सूरजमल जैन, हितेंद्र महाजन, भागवत माळी, राजाराम कोळी, दादा पाटील, भगवान वाघ, इंद्रकुमार लालवाणी, शेख रहमान शेख अब्दूल नबी, सुखलाल माळी व यशंवत गिरी अशी आरोपींची नावे आहेत. बीएचआरच्या भारतभरात २५० शाखा असून अमरावती जिल्ह्यात अंजनगाव, खोलापुरी गेट व राजापेठ या तीन ठिकाणी शाखा होत्या. या तीनही शाखांच्या माध्यमातून बीएचआरच्या पदाधिकाऱ्यांनी गुतवंणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम गोळा करून पोबारा केला. याबाबत ३० मार्च २०१५ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात राधेश्याम चांडक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४०९, ४२०, ४६८, १२० (ब), एमपीआयडीनुसार गुन्हा नोंदविला होता. यामध्ये चांडक यांची २ लाखांनी फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली. त्याचप्रमाणे आरोपींनी गुतवणुकदारांची १० कोटी ५२ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. राजापेठ पोलिसांच्या चौकशीनंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये हा तपास राज्य अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान जळगाव पोलिसांनी बीएचआरच्या संचालकासह १३ पदाधिकाऱ्यांना अटक केली. या आरोपींना सीआयडीने प्रोड्यूस वाँरटवर ताब्यात घेतले असून शुक्रवारी अमरावतीत आणले. पोलीस उपअधीक्षक एस.डी.सोळंके यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल गजानन पवार, नितीन पेठे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे. तेराही आरोपींना शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश व विशेष न्यायाधीश (मकोका) ज्ञा.वा.मोडक यांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यावर सरकारी पक्षातर्फे दीपक आंबलकर यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने १३ आरोपींना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या आरोपींना राजापेठ पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. बीएचआरने राजापेठ परिसरातील शाखेमार्फत गुंतवणूकदारांची १० कोटी ५२ लाखांनी फसवणूक केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी १३ जणांना जळगावहून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. - एस.डी.सोळंके, पोलीस उपअधीक्षक, सीआयडी, अमरावती