शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

८ कोटीहून अधिक मतदारराजा बजावणार हक्क

By admin | Updated: October 14, 2014 03:02 IST

राज्यातील १८ वर्ष पूर्ण केलेला मतदारराजा उद्या १५ तारखेला आपला लाखमोलाचा मतदानाचा अधिकार बजावेल.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राज्यातील १८ वर्ष पूर्ण केलेला मतदारराजा उद्या १५ तारखेला आपला लाखमोलाचा मतदानाचा अधिकार बजावेल. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यातील ८ कोटी ३५ लाख मतदार बुधवारी ४, ११९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.   
यंदा राज्यात सर्व पक्ष स्वबळावर लढत असल्याने निवडणुक पंचरंगी तर काही ठिकाणी बहूरंगी झाली आहे. निवडणुकीचा प्रचार आता संपला असून उद्या मतदान होणार आहे. एकूण मतदारांपैकी चार कोटीहून अधिक पुरुष मतदार असून जवळपास साडे तीन कोटीहून अधिक महिला मतदार आहेत. २८८ जागांसाठी ३,८४८ पुरुष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून केवळ २७६ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील २८८ मतदार संघांपैकी २३४ जागा या खुल्या प्रवर्गातील आहेत. तर, २९ जागा अनुसुचित जातींसाठी असून २५ जागा या अनुसुचित जमातीसाठी  राखीव आहेत. 
८३ मतदार संघात १६ हून अधिक मतदार उभे आहेत, तर एका मतदार संघात ३२ हून अधिक उमेदार आहेत. नांदेड दक्षिण येथील विधानसभा क्षेत्रात ८७ उमेदवार निवडणुकीकरता उभे राहिले आहेत. तर अकोला येथे २१६ उमेदवारांपैकी ५ उमेदवार हे भटक्याविमुक्त  गटातील आहेत. तर, २६४ पैकी ५  उमेदवार गुहागर येथे उमेदवार हे भटक्या विमुक्त जमातीतील आहेत. निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजेच २८७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्याखालोखाल २८२ उमेदवारांसह शिवसेनेचा दुसरा क्रमांक लागतो. तर भाजपचे २८० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  बहूजन समाज पक्षाचे २६०, कम्युनिटस्ट पार्टी ऑफ इंडियाचे २३४, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे १९ उमेदवार उभे आहेत. मनसे मधून २१९ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्ष वगळून नोंदणीकृत पक्षांचे ७६१ उमेदवार तर १६९९ अपक्ष उमेदवार आहेत. राज्यभरात एकूण ४,११९ उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. 
पुणे जिल्ह्यातील चिंचवड हे राज्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे. चिंचवडमध्ये तब्बल ४,८४,०८० मतदार आहेत. राज्यातील सर्वात लहान मतदार संघ म्हणून ख्याती असलेल्या वडाळा मतदार संघात १ लाख ५० हजारांहून अधिक मतदार या मतदार क्षेत्रात आहेत. 
बुधवारी होणा-या मतदानासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली आहे. राज्यात १३५ सामान्य निरीक्षक तर, खर्चावर निरीक्षण ठेवण्यासाठी ११२ पथकं नेमण्यात आली आहेत. तर जागरुकता निरीक्षक म्हणून १८ पथकं कार्यरत आहेत. तसेच मतदानासाठी राज्यभरात ५, ८४, ६१७ कर्मचारी कार्यरत आहेत.  तर, ९१ हजार तीनशे ७६ मतदान केंद्र आहेत