शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बालकांचा हक्क न्यायाच्या प्रतीक्षेत!;आयोगाचा संथगती कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 02:12 IST

राज्यातील बालकांच्या हक्कांसाठी सर्वांत महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य बाल हक्क व संरक्षण आयोगावर आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सन २०१५ ते २०१८ या ३ वर्षांत २८० पैकी फक्त ३३ तक्रारींवर निर्णय घेतल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.

 मुंबई : राज्यातील बालकांच्या हक्कांसाठी सर्वांत महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य बाल हक्क व संरक्षण आयोगावर आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सन २०१५ ते २०१८ या ३ वर्षांत २८० पैकी फक्त ३३ तक्रारींवर निर्णय घेतल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. यामध्ये शिक्षण हक्क कायद्यातील बालकांच्या अधिकार पायदळी तुडवण्यापासून ते लैंगिक अत्याचाराच्या अनेक प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे बालकांचा हक्क न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळतआहे.न्यायालयाच्या तारखांपेक्षाही उशिरा न्याय देण्याचे काम आयोग मागील अनेक वर्षांपासून करीत असल्याचे या माहिती अधिकाराच्या माहितीमधून स्पष्ट झाले आहे. बाल हक्कासाठी लढणारे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद तुळसकर यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या अर्जास महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाने उत्तर दिले असून ३ वर्षांत २८० पैकी फक्त ३३ तक्रारींवर निर्णय घेतल्याची माहिती त्यांना आयोगानेच दिली आहे. म्हणजे २०१५ पासून आयोगाकडे दाखल झालेल्या २८० तक्रारींंपैकी केवळ ३३ प्रकरणांवर अंतिम आदेश देण्यात आले असून तब्बल २४७ तक्रारी या अजूनही प्रलंबित आहेत. इतकेच नाहीतर, मागील काही महिन्यांपासून आयोगाकडून कित्येक प्रकरणांची सुनावणीच स्थगित करण्यात आली असून अनेक प्रकरणांबाबत बालकांचे गंभीर शैक्षणिक व इतर मूलभूत हक्कांचे हनन होत असूनही याबाबत कोणतीच कारवाई झालेली नाही, असे तुळसकर यांनी सांगितले.धनादेश केला शासनास परतनुकतेच महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी सरकारने आयोगातर्फे खर्चासाठी मागणी केलेल्या रकमेपैकी ५०% हून कमी निधी दिल्याने, तसेच आयोगाने मागणी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याच संख्येस मान्यता दिल्याने, सुमारे ५० लाखांहून अधिक रकमेचा चेक हा आयोगाकडून शासनास परत करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे तुळसकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र