शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात उभी राहणार ‘राइट टू पी’ची चळवळ

By admin | Updated: January 13, 2015 05:11 IST

महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत मुता-या असाव्यात, म्हणूून २०११ साली मुंबईत सुरू झालेल्या ‘राइट टू पी’ चळवळीला चार वर्षांनी सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे

मुंबई : महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत मुता-या असाव्यात, म्हणूून २०११ साली मुंबईत सुरू झालेल्या ‘राइट टू पी’ चळवळीला चार वर्षांनी सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. हा विषय फक्त एका शहरातील, गावातील महिलांशी संबंधित नसून तो सर्व महिलांचा प्रश्न आहे. यामुळे सर्व महिलांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, यादृष्टीने ‘राइट टू पी’ चळवळीने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. पुढच्या काळात ही चळवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता राज्यातील विविध जिल्ह्यांशी जोडली जाणार आहे. आतापर्यंत मुंबईत उभ्या राहिलेल्या ‘राइट टू पी’ चळवळीने अनेक ठिकाणी लढा देऊन त्यातून मार्ग शोधले आहेत. यामुळे त्यांची स्वत:ची एक कामाची प्रक्रिया आहे. ‘राइट टू पी’ने एक मांडणी तयार केली आहे. यामुळे मुंबईचे मॉडेल तयार झाले आहे. यापुढे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, कुरखेडा (विदर्भ), कोकणप्रमाणेच इतर भागांशी जोडून घेतले जाणार आहे. लोकसहभाग वाढवला जाणार असून, एक नवीन सुरुवात होणार असून चळवळीची व्यापकता वाढली जाणार आहे, असे ‘राइट टू पी’च्या मुमताज शेख यांनी सांगितले.‘राइट टू पी’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, पुढच्या वाटचालीची योजना आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी १८ महिन्यांच्या आत महिलांसाठी मोफत मुताऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. याचा पाठपुरावा केला जाणार आहे. चळवळीत अधिकाधिक महिलांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व महिला आघाड्यांवर निवेदन देऊन अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे.