शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

संसदेत तिरंगा नेण्याचा मिळाला हक्क

By admin | Updated: February 21, 2016 03:34 IST

केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले.

विजय दर्डा : लोकप्रतिनिधींना मिळावा ध्वजारोहणाचा हक्क

पुणे : केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले.दर्डा म्हणाले, ‘‘ऐके काळी संसदेमध्ये तिरंग्याचा बॅच लावून जाणे गुन्हा होता. भैरोसिंह शेखावत त्या वेळी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती होते. मी संसदेत चर्चा घडवून आणली. ‘आमचा हा अधिकार आहे. तो आम्हाला मिळायला हवा,’ अशी मागणी मी संसदेत केली होती. त्यानंतर हा अधिकार आम्हाला मिळाला.’’ ते म्हणाले. ‘‘मुख्यमंत्री, राज्यपाल ध्वजारोहण करतात; पण स्थानिक स्तरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात खासदार, आमदार, सरपंच व इतर लोकप्रतिनिधी बसलेले असतात आणि तहसीलदार ध्वजारोहण करतात. हे चुकीचे आहे. ही कोणती लोकशाही? स्थानिक स्तरावरही ध्वजारोहणाचा अधिकार लोकप्रतिनिधींनाच मिळायला हवा. तिरंगा हा केवळ एक कपडा नाही. तिरंगा आपली ओळख आहे, ती आपली सभ्यता आहे. ’’ते म्हणाले, ‘‘शिक्षणाच्या माध्यमातून आपण युवकांमध्ये, समाजाला, शैक्षणिक, सांस्कृतिक, नैतिक, आर्थिक, धार्मिक, मानवीय मूल्यांची निर्मिती करतो. आज देशात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. जर आपण जगात ज्ञानाच्या क्षेत्रात विश्वगुरूच्या रूपाने पुढे येण्यासाठी प्रयत्न करत असू, तर आपल्याला चांगल्या संसाधनांबरोबरच गुणवत्तेचीही निर्मिती करावी लागेल. स्मृती इराणी यांच्यासारख्या सशक्त, प्रज्ञावान मनुष्यबळ विकासमंत्री देशाला लाभलेल्या आहेत. देशात अनेक समस्या आहेत; पण त्यावर आपण शिक्षणाच्या माध्यमातून मात करू शकतो, असा विश्वास व्यक्त करून दर्डा म्हणाले, ‘‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘शिक्षण संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रातील अनेक प्रश्न पुढे आले आहेत. आपला देश खरंच कसले शिक्षण देतोय? युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यायोग्य शिक्षण त्यांना मिळतेय का? त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवतोय का? याचा विचार होण्याची गरज आहे.’’दर्डा म्हणाले, ‘‘शिक्षण हक्क कायद्यामुळे शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला आहे; पण आपण संस्कृती, सभ्यता आणि भाषा विसरत चाललो आहोत. माझी स्मृती इराणी व विनोद तावडे यांना विनंती आहे, की प्रत्येक विद्यार्थ्याला हिंदी, मातृभाषा आणि इंग्रजी या किमान ३ भाषा यायला हव्यात. त्या सर्व शाळांमध्ये बंधनकारक करायला हव्यात.’’