शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत तिरंगा नेण्याचा मिळाला हक्क

By admin | Updated: February 21, 2016 03:34 IST

केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले.

विजय दर्डा : लोकप्रतिनिधींना मिळावा ध्वजारोहणाचा हक्क

पुणे : केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले.दर्डा म्हणाले, ‘‘ऐके काळी संसदेमध्ये तिरंग्याचा बॅच लावून जाणे गुन्हा होता. भैरोसिंह शेखावत त्या वेळी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती होते. मी संसदेत चर्चा घडवून आणली. ‘आमचा हा अधिकार आहे. तो आम्हाला मिळायला हवा,’ अशी मागणी मी संसदेत केली होती. त्यानंतर हा अधिकार आम्हाला मिळाला.’’ ते म्हणाले. ‘‘मुख्यमंत्री, राज्यपाल ध्वजारोहण करतात; पण स्थानिक स्तरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात खासदार, आमदार, सरपंच व इतर लोकप्रतिनिधी बसलेले असतात आणि तहसीलदार ध्वजारोहण करतात. हे चुकीचे आहे. ही कोणती लोकशाही? स्थानिक स्तरावरही ध्वजारोहणाचा अधिकार लोकप्रतिनिधींनाच मिळायला हवा. तिरंगा हा केवळ एक कपडा नाही. तिरंगा आपली ओळख आहे, ती आपली सभ्यता आहे. ’’ते म्हणाले, ‘‘शिक्षणाच्या माध्यमातून आपण युवकांमध्ये, समाजाला, शैक्षणिक, सांस्कृतिक, नैतिक, आर्थिक, धार्मिक, मानवीय मूल्यांची निर्मिती करतो. आज देशात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. जर आपण जगात ज्ञानाच्या क्षेत्रात विश्वगुरूच्या रूपाने पुढे येण्यासाठी प्रयत्न करत असू, तर आपल्याला चांगल्या संसाधनांबरोबरच गुणवत्तेचीही निर्मिती करावी लागेल. स्मृती इराणी यांच्यासारख्या सशक्त, प्रज्ञावान मनुष्यबळ विकासमंत्री देशाला लाभलेल्या आहेत. देशात अनेक समस्या आहेत; पण त्यावर आपण शिक्षणाच्या माध्यमातून मात करू शकतो, असा विश्वास व्यक्त करून दर्डा म्हणाले, ‘‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘शिक्षण संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रातील अनेक प्रश्न पुढे आले आहेत. आपला देश खरंच कसले शिक्षण देतोय? युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यायोग्य शिक्षण त्यांना मिळतेय का? त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवतोय का? याचा विचार होण्याची गरज आहे.’’दर्डा म्हणाले, ‘‘शिक्षण हक्क कायद्यामुळे शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला आहे; पण आपण संस्कृती, सभ्यता आणि भाषा विसरत चाललो आहोत. माझी स्मृती इराणी व विनोद तावडे यांना विनंती आहे, की प्रत्येक विद्यार्थ्याला हिंदी, मातृभाषा आणि इंग्रजी या किमान ३ भाषा यायला हव्यात. त्या सर्व शाळांमध्ये बंधनकारक करायला हव्यात.’’