शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

रिक्षाचालकाकडून पुन्हा एसटीचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 03:08 IST

ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली.

कल्याण : रिक्षाचालकाच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची भिवंडीतील घटना आणि त्यापाठोपाठ ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली. बस बळवण्याच्या जागी उभी केलेली रिक्षा पुढे घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला. यामुळे कल्याण-डोंबिवलीत भररस्त्यात ठिकठिकाणी बेकायदा सुरू असलेल्या रिक्षातळांचा मुद्दा गंभीर बनला आहे. पालिकेचा ढिसाळपणा, पोलिसांचे दुर्लक्ष, आरटीओचा नसलेला बचक हे सारे मुद्दा यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. मारहाणीच्या घटनेचे वृत्त बस आगारात समजताच बसचालक-वाहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलिसांनी रिक्षाचालक सलीम अब्दुल पठाण (३०, रा. कल्याण) याला अटक केली आहे.अलिबागहून कल्याणला आलेली एसटी बस दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याण आगारात प्रवेश करत होती. तेव्हा बसचालक सुरेश भोसले (४३, रा. कोनगाव) यांनी पुढे उभी असलेली रिक्षा तिच्या चालकाला पुढे घेण्यास सांगितले. त्यावरून त्यांचा वाद झाला. त्यातून रिक्षा चालकाने बसचालक सुरेश भोसले यांना मारहाण केली. त्याने बोटाचा चावा घेतल्याचेही सुरूवातीला सांगितले जात होते. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. भोसले यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एसटी स्थानक, केडीएमटी बसचे थांबे येथे दिवसभर रिक्षांची बेकायदा वर्दळ असते. रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याचा रिक्षाचालकांनी बेकायदा ताबा घेतला आहे. भररस्त्यात तीन-तीन रांगा करून प्रवासी भरले जातात. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत सुरू असूनही ते कारवाई करत नसल्याचा प्रवाशांचा, वाहनचालकांचा आरोप आहे.एसटी चालकांप्रमाणेच अन्य वाहनचालकांनाही या रस्त्यावरून जाण्यास पुरेशी जागा नसते. त्याबाबत रिक्षाचालकांना काहीही सांगितले तरी ते हमरीतुमरीवर येतात. एकत्र येत शिवीगाळ-मारहाण करतात आणि पोलीस त्यात काहीही करत नाहीत, असा वाहनचालकांचाही आरोप आहे. (प्रतिनिधी) >पोलिसांकडून न्यायालयाचा अवमानमहाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे सचिव महादेव म्हस्के यांनी या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे. भिवंडीतील दुदैवी घटनेनंतर बस आगाराच्या प्रवेशद्वारावर जागा अडवून उभ्या असलेल्या रिक्षांचा मुद्दा पुढे आला. रिक्षांमुळे बस चालकांना व प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत पाठपुरावा केला गेला. त्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले, असे म्हस्के यांनी सांगितले. बस स्थानक परिसरापासून २०० मीटर अंतरावर कोणतेही खाजगी वाहन थांबवू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत म्हस्के यांनी व्यक्त केली.