शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाकडून पुन्हा एसटीचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 03:08 IST

ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली.

कल्याण : रिक्षाचालकाच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची भिवंडीतील घटना आणि त्यापाठोपाठ ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली. बस बळवण्याच्या जागी उभी केलेली रिक्षा पुढे घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला. यामुळे कल्याण-डोंबिवलीत भररस्त्यात ठिकठिकाणी बेकायदा सुरू असलेल्या रिक्षातळांचा मुद्दा गंभीर बनला आहे. पालिकेचा ढिसाळपणा, पोलिसांचे दुर्लक्ष, आरटीओचा नसलेला बचक हे सारे मुद्दा यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. मारहाणीच्या घटनेचे वृत्त बस आगारात समजताच बसचालक-वाहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलिसांनी रिक्षाचालक सलीम अब्दुल पठाण (३०, रा. कल्याण) याला अटक केली आहे.अलिबागहून कल्याणला आलेली एसटी बस दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याण आगारात प्रवेश करत होती. तेव्हा बसचालक सुरेश भोसले (४३, रा. कोनगाव) यांनी पुढे उभी असलेली रिक्षा तिच्या चालकाला पुढे घेण्यास सांगितले. त्यावरून त्यांचा वाद झाला. त्यातून रिक्षा चालकाने बसचालक सुरेश भोसले यांना मारहाण केली. त्याने बोटाचा चावा घेतल्याचेही सुरूवातीला सांगितले जात होते. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. भोसले यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एसटी स्थानक, केडीएमटी बसचे थांबे येथे दिवसभर रिक्षांची बेकायदा वर्दळ असते. रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याचा रिक्षाचालकांनी बेकायदा ताबा घेतला आहे. भररस्त्यात तीन-तीन रांगा करून प्रवासी भरले जातात. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत सुरू असूनही ते कारवाई करत नसल्याचा प्रवाशांचा, वाहनचालकांचा आरोप आहे.एसटी चालकांप्रमाणेच अन्य वाहनचालकांनाही या रस्त्यावरून जाण्यास पुरेशी जागा नसते. त्याबाबत रिक्षाचालकांना काहीही सांगितले तरी ते हमरीतुमरीवर येतात. एकत्र येत शिवीगाळ-मारहाण करतात आणि पोलीस त्यात काहीही करत नाहीत, असा वाहनचालकांचाही आरोप आहे. (प्रतिनिधी) >पोलिसांकडून न्यायालयाचा अवमानमहाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे सचिव महादेव म्हस्के यांनी या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे. भिवंडीतील दुदैवी घटनेनंतर बस आगाराच्या प्रवेशद्वारावर जागा अडवून उभ्या असलेल्या रिक्षांचा मुद्दा पुढे आला. रिक्षांमुळे बस चालकांना व प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत पाठपुरावा केला गेला. त्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले, असे म्हस्के यांनी सांगितले. बस स्थानक परिसरापासून २०० मीटर अंतरावर कोणतेही खाजगी वाहन थांबवू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत म्हस्के यांनी व्यक्त केली.