शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

रिक्षाचालकाकडून पुन्हा एसटीचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 03:08 IST

ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली.

कल्याण : रिक्षाचालकाच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची भिवंडीतील घटना आणि त्यापाठोपाठ ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली. बस बळवण्याच्या जागी उभी केलेली रिक्षा पुढे घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला. यामुळे कल्याण-डोंबिवलीत भररस्त्यात ठिकठिकाणी बेकायदा सुरू असलेल्या रिक्षातळांचा मुद्दा गंभीर बनला आहे. पालिकेचा ढिसाळपणा, पोलिसांचे दुर्लक्ष, आरटीओचा नसलेला बचक हे सारे मुद्दा यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. मारहाणीच्या घटनेचे वृत्त बस आगारात समजताच बसचालक-वाहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलिसांनी रिक्षाचालक सलीम अब्दुल पठाण (३०, रा. कल्याण) याला अटक केली आहे.अलिबागहून कल्याणला आलेली एसटी बस दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याण आगारात प्रवेश करत होती. तेव्हा बसचालक सुरेश भोसले (४३, रा. कोनगाव) यांनी पुढे उभी असलेली रिक्षा तिच्या चालकाला पुढे घेण्यास सांगितले. त्यावरून त्यांचा वाद झाला. त्यातून रिक्षा चालकाने बसचालक सुरेश भोसले यांना मारहाण केली. त्याने बोटाचा चावा घेतल्याचेही सुरूवातीला सांगितले जात होते. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. भोसले यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एसटी स्थानक, केडीएमटी बसचे थांबे येथे दिवसभर रिक्षांची बेकायदा वर्दळ असते. रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याचा रिक्षाचालकांनी बेकायदा ताबा घेतला आहे. भररस्त्यात तीन-तीन रांगा करून प्रवासी भरले जातात. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत सुरू असूनही ते कारवाई करत नसल्याचा प्रवाशांचा, वाहनचालकांचा आरोप आहे.एसटी चालकांप्रमाणेच अन्य वाहनचालकांनाही या रस्त्यावरून जाण्यास पुरेशी जागा नसते. त्याबाबत रिक्षाचालकांना काहीही सांगितले तरी ते हमरीतुमरीवर येतात. एकत्र येत शिवीगाळ-मारहाण करतात आणि पोलीस त्यात काहीही करत नाहीत, असा वाहनचालकांचाही आरोप आहे. (प्रतिनिधी) >पोलिसांकडून न्यायालयाचा अवमानमहाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे सचिव महादेव म्हस्के यांनी या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे. भिवंडीतील दुदैवी घटनेनंतर बस आगाराच्या प्रवेशद्वारावर जागा अडवून उभ्या असलेल्या रिक्षांचा मुद्दा पुढे आला. रिक्षांमुळे बस चालकांना व प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत पाठपुरावा केला गेला. त्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले, असे म्हस्के यांनी सांगितले. बस स्थानक परिसरापासून २०० मीटर अंतरावर कोणतेही खाजगी वाहन थांबवू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत म्हस्के यांनी व्यक्त केली.