शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ५४ विधवांना दिले रिक्षा परमीट

By admin | Updated: August 4, 2016 20:59 IST

मरण पावलेल्या रिक्षा चालकांच्या पत्नीच्या नावे परमीट करण्याचा सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रयोग राबविला आहे. याचा ५४ विधवांना लाभ मिळाला आहे.

- राजकुमार सारोळेसोलापूर : मरण पावलेल्या रिक्षा चालकांच्या पत्नीच्या नावे परमीट करण्याचा सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रयोग राबविला आहे. याचा ५४ विधवांना लाभ मिळाला आहे. सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परवानाधारक रिक्षांची संख्या ८५९३ हजार इतकी आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार रिक्षा परमीटची संख्या वाढणे अपेक्षित होते. पण याला शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे स्क्रॅप रिक्षांची संख्या वाढत गेली.

याबाबत ओरड झाल्यावर २00७ मध्ये दीड हजार वाढीव परवाने खुले झाले. आरटीओ कार्यालयाच्या स्थापनेनंतर हा एकदाच प्रयोग झाला. यात कित्येक परमीट धारक मरण पावले आहेत. त्यामुळे परमीटची संख्या कमी होत गेली. सध्या एसएमटीची (महापालिका परिवहन खाते) स्थिती पाहता शहरात रिक्षांची परमीट वाढविणे अपेक्षित आहे. या मागणीचा विचार करून तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिवहन प्राधीकरणच्या बैठकीत रिक्षा परमीट नूतनीकरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेतला. जे परमीटधारक रिक्षाचालक मरण पावले आहेत. त्यांच्या पत्नीला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पतीचे लॅप्स झालेले परमीट पत्नीच्या नावे ट्रान्सर्फर करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला. शासनाची मंजुरी मिळाल्यावर आरटीओ कार्यालयाने त्या पद्धतीने मोहीम हाती घेतली.

जिल्हा परिवहन प्राधीकरण बैठकीतील निर्णयानुसार आरटीओ कार्यालयाने मरण पावलेल्या परमीटधारक रिक्षा चालकांच्या पत्नीकडून अर्ज मागविले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. यात १९८५ पासूनची यादी तपासल्यानंतर ५४ परमीट विधवांच्या नावे करण्यास मंजुरी देण्यात आली. आरटीओ कार्यालयाच्या इतिहासातील व राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मेडशीकर यांनी सांगितले.शेतकऱ्याच्या पत्नीला मिळणार परमीटआतहत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियासाठी शासनाने हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वावलंबन निराधार योजना जाहीर केली आहे. सोलापूर जिल्ह्यात ६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १ लाखाचे अर्थसहाय्य मिळालेल्या अशा कुटुंबियांना कार्यालयाने संपर्क केला आहे. त्यांना परमीट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परमीटची ११ हजार फी आहे. शासनाने १0 हजार माफ करून एक हजारात हे परमीट देण्याचे धोरणठेवलेआहे.जिल्हा परिवहन प्राधीकरणच्या बैठकीतील निर्णयास अपवादात्मक स्थितीत शासनाने परवानगी दिली. ठिकाण व नियम एकच असल्याने मरण पावलेल्या ५४ रिक्षा परमीटधारकांचे परवाने पत्नीच्या नावे करण्यात आले. यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला आहे.बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी