शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

समृद्ध कलांचा वारसा लाभलेले ‘यड्राव’

By admin | Updated: July 10, 2017 00:49 IST

समृद्ध कलांचा वारसा लाभलेले ‘यड्राव’

घ:नशाम कुंभार । लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : यड्रावनगरीच्या मातीमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक, समाजकारण, राजकारण, उद्योग, व्यवसाय यांची जडणघडण होऊन त्यांचा नावलौकिक राज्याबाहेर झाला. अशा सर्वच क्षेत्रांत येथील ग्रामस्थांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. इ.स. १८२२ (शके १७४५) साली तत्कालीन कोल्हापूर दरबारचे सरंजामी सरदार धोंडिबा यांना करवीर सरकारातून दहा हजारांची तैनात मिळाली व त्या तैनातीच्या वसुलीकरिता मौजे यड्राव पेठा हातकणंगलेसह इतर सहा गावे सरंजामी म्हणून मिळाली. सरकार घराण्याचा वारसा लाभलेल्या यड्रावमध्ये सन १९५३ साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली. जयसिंगपूर बाजारपेठेमध्ये कर्नाटक भागातून शेतीमाल बैलगाडीतून विक्रीसाठी येताना यड्राव येथे बैलगाड्यांचा मुक्काम होत असे. मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जयसिंगपूर बाजारपेठेत जाऊन बैलगाड्या परतीच्या प्रवासाला लागत असत. बैलांचा कर्नाटकातून जयसिंगपूर बाजारपेठ ते परत कर्नाटकपर्यंतचा प्रवास हा जादा अंतराचा असल्याने बैलांची तब्बेत चांगली राहावी. त्यांची क्रियाशक्ती मजबूत होऊन सुदृढता येण्यासाठी मोकळ्या बैलगाड्यांपैकी कोणती बैलगाडी जयसिंगपूर बाजारपेठेतून यड्रावपर्यंत पहिली येते, त्या गाडीस प्रोत्साहन म्हणून विठ्ठलराव आनंदराव नाईक-निंबाळकर सरकार यांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी पहिल्या येणाऱ्या गाडीस बक्षीस देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून बैलगाडी शर्यतींचा प्रघात सुरू झाला. बैलगाडी शर्यतीस सुरुवात करणारे गाव असा यड्रावचा लौकिक आहे. यड्रावमध्ये विठ्ठलराव आनंदराव नाईक-निंबाळकर, आप्पासाो नाईक-निंबाळकर, नरसगोंडा पाटील, गणपती कुंभार, बाळू कोळी, वसंत डकरे, शिवाजी पाटील यांच्यासह अनेकांनी बैलसंपत्ती जपली. येथील बैलजोड्यांनी कर्नाटक-महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या बऱ्याच शर्यतीमध्ये आपल्या कार्यशैली व सुदृढतेचा ठसा उमटविला आहे. कलाविष्कारातही यड्राव आघाडीवर आहे. नवजीवन नाट्यमंडळाच्या माध्यमातून शंकर प्रभावळकर, मधुकर जांभळे, दिलावर मिरजकर, गणपती कदम, बापू कोकाटे, दगडू भोसले यांनी व रत्नदीप कला, क्रीडा, नाट्य मंडळाच्या माध्यमातून राजाभाऊ उर्फ आर. एस. कुंभार, जे. एस. पाटील, व्ही. पी. सदलगे, टी. बी. पासोबा, डी. बी. पिष्टे, धनंजय शेट्टी, तुकाराम मोहिते, दगडू भोसले यांनी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाची छाप उमटवून अनेक बक्षिसे पटकाविली. येथील जयहिंद मंडळ, विश्वशांती, विवेक क्रीडा मंडळ, देवराज स्पोर्टस्, रत्नदीप क्रीडा मंडळ, राजेंद्र पाटील अकॅडमी या माध्यमातून कबड्डी खेळावर लक्ष दिले. डी. के. पाटील, सुरगोंडा पाटील, बापू लोखंडे, रजाक मुजावर, बी.एम.दानोळे, बापू कोकाटे, शिवा कोडणे, बापू आळते, जयसिंग माने, पुंडलिक जाधव, शिवाजी दळवी यांनी क्रीडा कौशल्याचा ठसा उमटविला. यापैकी बऱ्याच जणांनी लेझीम व दांडपट्टा खेळामध्ये उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केले होते. बापू काकडे, लहू ठाणेकर, जोतीराम ठाणेकर, वसंत झुटाळ, शंकर कांबळे, शिवाजी जगताप, जालिंद काकडे या पैलवानांनी तालीम व व्यायामाच्या माध्यमातून शरीरसंपदा व कुस्तीचे कसब प्राप्त केले. शामराव पाटील-यड्रावकर यांनी राज्य पातळीवर विविध क्षेत्रात आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध केले आहे. विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भूषविले. राजेंद्र पाटील-यड्रावकर हे जिल्हा बँकेचे संचालक व शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर यांनी शिरोळ पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले आहे. तर राजवर्धन नाईक-निंबाळकर हे सध्या जि. प. सदस्य आहेत. कै. विष्णू कांबळे यांनी जि.प. तर मंगल कांबळे यांनी पं.स.चे सदस्यत्व भूषविले आहे. माजी सरपंच सरदार सुतार यांना यशवंत सरपंचपदाचा सन्मान मिळाला. तर माजी सरपंच लक्ष्मीकांत लड्डा व उल्हास भोसले यांनी व विद्यमान उपसरपंच विजय पाटील यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे. १९६८ साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते येथे कोल्हापूर जिल्हा शेतकरी, विणकरी सहकारी सूतगिरणीची स्थापना दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुढाकाराने व शामराव पाटील-यड्रावकर, धोंडोजीराव नाईक-निंबाळकर, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्या सहकार्याने झाली. यामुळे हजारो बेरोजगारांना काम मिळाले व संस्थेस पूरक विविध उद्योग व रोजगार निर्मिती झाली.यड्राव एज्युकेशन हब : यड्रावमध्ये कन्या विद्यामंदिर, कुमार विद्यामंदिर, पार्वती विद्यामंदिर, अल्फोन्सा स्कूल, पोदार स्कूल, दि न्यू हायस्कूल, एसपीवाय हायस्कूल, शरद प्ले स्कूल, शरद कॉमर्स कॉलेज, शरद आयटीआय, शरद पॉलिटेक्निक, शरद इंजिनिअरिंग अशी बालवाडीपासून ते अभियांंत्रिकी शिक्षणापर्यंतचा अभ्यासक्रम याठिकाणी इंग्रजी व मराठी माध्यमातून मिळत असल्याने यड्राव एज्युकेशन हब बनले आहे. पर्यावरणाच्या समतोलासाठी २५०० वृक्षलागवडपार्वती औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वसाहतीमध्ये २ हजार ५०० वृक्षांची लागवड करून संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीमधील कापड उद्योग प्रक्रियेतून निघणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करून साडेचार एकर जागेत बांबू लागवडीचा प्रकल्प राबवून प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारीही उद्योजकांनी घेतली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादनशील असलेल्या उद्योगात काम करण्यासाठी देशातील विविध राज्यांतून कामगार येत आहेत. यामुळे पार्वती औद्योगिक वसाहत जणू राष्ट्रीय एकात्मतेचाच संदेश देत असल्याचे दिसत आहे. यामुळे इतर राज्यातील रीतीरिवाज व परंपरांची ओळख होत आहे. त्याचबरोबर येथील बंधुभाव व सलोख्याचे दर्शन होत आहे.संरक्षण दलास टर्किश टॉवेल पार्वती औद्योगिक वसाहतीमधील इचलकरंजी टेक्स्टाईल प्रा.लि.मधून टर्किश टॉवेलचे उत्पादन केले जाते. या टॉवेलचा गुणवत्ता व निकषाच्या आधारावर भारताच्या संरक्षण विभागातील एअरफोर्स, इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, एअर इंडिया यांना पुरवठा होतो. याचबरोबर अमेरिका, इस्राईल, फ्रान्स या देशांना टॉवेलची निर्यात होते. यड्राव येथे सन १९८१ मध्ये पार्वती औद्योगिक वसाहतीची स्थापना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व सहकाररत्न शामराव पाटील-यड्रावकर यांच्या संकल्पनेतून साकारली. २६६ एकरांमध्ये सहकार तत्त्वावरील आशिया खंडातील सर्वांत मोठ्या असलेल्या या वसाहतीमध्ये २५० उद्योग कार्यरत आहेत. या वसाहतीत प्रामुख्याने टेक्स्टाईल-पॉवरलूम्स, अ‍ॅटोलूम्स, वार्पिंग, निटिंग, कॉटन फॅब्रीक्स, टर्कीश टॉवेल, सिंथेटीक प्रोसेस, सॉक्स उत्पादन. इंजिनिअरिंग- युनिव्हर्सल टेक्स्टिंग, एम. एस. पाईप, फॅब्रीकेशन, सीएनसी, व्हीएमसी मशिन्स. रबर व पीव्हीसी-पीव्हीसी पाईप, आदी सेवा मिळतात. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन यासह वीसहून अधिक उत्पादनांचा परदेशी बाजारपेठेत नावलौकिक आहे.