शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातील भातपीक दुप्पट करणार

By admin | Updated: May 7, 2017 06:14 IST

कोकणातील ‘भात’ हे प्रमुख खरीप पीक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने केलेल्या

विशेष प्रतिनिधी /लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोकणातील ‘भात’ हे प्रमुख खरीप पीक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने केलेल्या विशेष नियोजनानुसार २०१७-१८ पासून ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ वैशिष्ट्यपूर्ण संपूर्ण मोहीम राज्यात हाती घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीम राज्यात रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर म्हणजेच, २५ मे रोजी शुभारंभ होऊन ८ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. कोकणातील पाऊस लवकर सुरू होत असल्याने ही मोहीम महाराष्ट्र दिन १ मे ते १५ मे यादरम्यान राबविण्यात येत आहे. कोकणातील प्रमुख खरीप पीक भात उत्पादन २०२२पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग सिगेदार यांनी दिली. कृषी उत्पादन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने व उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. बियाणे, रासायनिक खते व कीड नाशके या निविष्ठांवरील खर्च व पिकांच्या पूर्व मशागतीपासून काढणी व मळणीपर्यंत मजुरीवर होणारा खर्चही प्रामुख्याने शेती उत्पादन खर्च वाढण्याची कारणे असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर लहरी हवामानामुळे पाऊस कमी झाल्याने किंवा वेळेवर न पडल्याने निर्माण होणाऱ्या स्थितीचा पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने शेतीतील जोखीम वाढत आहे. त्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. भाताचे प्रमाणित बियाणे वापरल्यास शेतातील काही भाग पुढील हंगामासाठी स्वत:करिता बियाणे म्हणून वापरण्यासाठी राखून ठेवावा. मात्र, बियाण्यांसाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रावरील पिकाची विशेष काळजी घ्यावी. एका हंगामात वापरलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून तयार झालेले बियाणे पुढील दोन हंगामापर्यंत वापरावे, अशी महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. भात रोपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास ३ टक्के मिठाच्या पाण्याची, थायरम (३ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास) तद्नंतर पीएसबी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. या पद्धतीने भात लागवडीसाठी एका ठिकाणी एकच रोपाला वाढवायचे असल्याने रोपवाटिकेत ५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात बियाणे पेरावे. चारसूत्री पद्धतीने भात लागवडीसाठी रोपवाटिकेत वाणाच्या प्रकारानुसार २० ते ३० किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात बियाणे पेरावे. रोहू पद्धतीने बियाणे मोड आणून पेरल्यास बियाणाची उगवण चांगली होते. भात रोपवाटिकेत रोपांचे किडी-रोगांपासून संरक्षण केल्यास पुनर्लागवडीनंतरच्या पीक संरक्षणावरील खर्चात बचत होते. कोकणात भाताची पुनर्लागवड केली जाते. अशा ठिकाणी शेतकरी वा महिला गटांनी सामूहिक रोपवाटिका तयार कराव्यात. जेणे करून मजुरी व देखभाल खर्चामध्ये बचत होते. रोपांचे वय १२ ते १५ दिवसांचे असतानाच पुनर्लागवड पूर्ण करावी. अधिक वयाची रोपे लावल्यास रोपवाटिका व्यवस्थापनाचा खर्च वाढण्याबरोबरच फुटवे कमी आल्याने उत्पादनात घट होते. पूर्व मशागतीसाठी नांगरट व चिखलणीची कामेमिनी ट्रॅक्टर वा पॉवर टिलरद्वारे केल्यास मजुरी वाचते.भातशेती नफ्यासाठीविविध उपाययोजनाजमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादनवाढीबरोबरच रासायनिक खतांवरील खर्चात बचत, लावणी किंवा रोवणीनंतर चार चुडांच्या चौकोनात एक युरिया डीएपी ब्रिकेट खोचून नत्रखत कार्यक्षमरीत्या पिकास उपलब्ध करून देणे, तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा योग्य वेळेस वापर, भातपिकातील तणांच्या बंदोबस्ताकरिता कोनोविंडरचा वापर, कीड-रोग सर्वेक्षणानुसार कीड व रोग नियंत्रण उपाय,कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळे, प्रकाश सापळे, पक्षीथांबे लावणे, जैविक कीडनाशकाचा वापर, पीक निसवताना व दाणे भरताना पुरेसे पाणी ठेवणे, भातपिकाच्या बांधावर तूर, भाजीपाला लागवड, भातकापणी यंत्राचा व भात मळणी यंत्राचा वापर, भातपिकानंतर उपलब्ध ओलाव्यावर हरभरा, वाल, चवळी या दुबार पिक लागवड, यांत्रिक सेवांचा वापर करावा, असा विश्वास कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला. यांत्रिक पद्धतीने पुनर्लागवडीनेखर्च बचतभाताच्या शेतीभोवती गिरी पुष्पाची लागवड करून चिखलणीच्या वेळी हिरवळीचे खत म्हणून गिरीपुष्पाचा पाला चिखलात ४ टन एकरी गाडावा. भाताची पुनर्लागवड यांत्रिकी पद्धतीने केल्यास खर्चामध्ये २५ ते ४० टक्के बचत होते. गादी वाफ्यावर टोकन पद्धतीने भात लागवड तंत्राचा अवलंब करावा. एका हंगामात तयार केलेले गादी वाफे न मोडता, त्यावर पुढील पिकाची टोकन केल्याने खर्च वाचतो.