शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

‘पॉवर टेक्स इंडिया’ यंत्रमाग क्षेत्रात क्रांती

By admin | Updated: April 2, 2017 01:36 IST

यंत्रमागांना देण्यात येणाऱ्या सबसिडीत ३० टक्क्यांनी केलेली वाढ, कामगारांना विश्रांतीकरिता व निवासाकरिता व्यवस्था करण्याची केलेली तरतूद, ११ जणांनी एकत्र येऊन यार्न बँकेची स्थापना

भिवंडी : यंत्रमागांना देण्यात येणाऱ्या सबसिडीत ३० टक्क्यांनी केलेली वाढ, कामगारांना विश्रांतीकरिता व निवासाकरिता व्यवस्था करण्याची केलेली तरतूद, ११ जणांनी एकत्र येऊन यार्न बँकेची स्थापना करण्याची असलेली तरतूद आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देताना केवळ चार टक्के व्याजदराने परतफेड करण्याची सोय, यामुळे देशात यंत्रमाग क्रांती होईल, असा विश्वास केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी व्यक्त केला.यंत्रमाग उद्योगाकरिता आखलेल्या पॉवर टेक्स इंडिया या देशव्यापी योजनेचा शुभारंभ भिवंडीतून झाला. त्या वेळी स्मृती इराणी बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या वेळी उपस्थित होते. पॉवर टेक्स इंडियामुळे देशातील यंत्रमागाला संजीवनी प्राप्त होऊन या उद्योगाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.इराणी म्हणाल्या की, विजेची कमतरता लक्षात घेता यंत्रमागधारकांनी सौरऊर्जेचा वापर केला तर भविष्यात भारत ऊर्जा क्षेत्रात संपन्न होईलच; पण यंत्रमागधारकांनाही लाभ होईल. देशातील ४५ टक्के कापड महाराष्ट्रात तयार होते. त्यापैकी जास्त उत्पादन भिवंडीत घेतले जाते. त्यामुळे योजनेचा प्रारंभ इथे करताना आनंद होत आहे.देशातील सुरत, बनारस, भागलपूर, बंगळुरू, वाराणसी, कोल्हापूर, बऱ्हाणपूर अशा ४३ यंत्रमाग शहरांतील मालक व कामगारांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते. इराणी व फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना योजनेची माहिती दिली. खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, वस्त्रोद्योग राज्यमंत्री सुभाष देशमुख, वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता आदी या वेळी उपस्थित होते. इराणी म्हणाल्या की, यंत्रमाग उद्योगाला संजीवनी देण्याकरिता असलेल्या या योजनेत शासन एक लाख रुपयांचा मार्जीन मनी देईल. या सर्व योजना त्वरित व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाइटबरोबरच लवकर पॉवर टेक्सचे मोबाइल अ‍ॅप काढण्यात येईल. यंत्रमाग क्षेत्राला ऊर्जितावस्था देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्त्रोद्योग विभागाने तयार केलेली ही योजना देशात नवा इतिहास रचेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. याची सुरुवात भिवंडीसारख्या यंत्रमागाच्या राजधानीतून होते आहे, ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. यापूर्वी १००० कोटींची वीज सबसिडी दिली जात होती. ती आमच्या सरकारने अलीकडेच १५०० कोटी केली आहे. म्हणजे जवळजवळ ५० टक्के वाढ केली आहे. यासंदर्भात एका योजनेवर आम्ही काम करीत असून, लवकरच त्यातील निर्णय जाहीर करण्यात येतील, असेही फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)