शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

सहायक उपायुक्त घेणार आढावा

By admin | Updated: July 23, 2016 01:54 IST

छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या २५ कलमी कार्यक्रमाची पोलीस यंत्रणेकडून प्रभावी अंमलबजावणी होत नाही

पिंपरी : छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या २५ कलमी कार्यक्रमाची पोलीस यंत्रणेकडून प्रभावी अंमलबजावणी होत नाही, याबाबतचे वृत ‘लोकमत’ने रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी असुरक्षित या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके गंभीर दखल घेऊन सोमवारी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तसेच सर्व महाविद्यालयांमध्ये आठवडाभरात तक्रार पेट्याही बसविण्यात येणार आहेत.पोलीस आयुक्तांनी महाविद्यालय परिसरामध्ये टवाळखोरांकडून होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी २५ कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमानुसार संबंधित पोलीस ठाण्यातील बीट मार्शल यांनी आठवड्यातून दोनदा शाळा-महाविद्यालयांना भेटी द्याव्यात. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनीही विद्यार्थिनींची स्वतंत्र बैठक घ्यावी आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये मुलींसाठी तक्रार पेट्याही ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानादेखील या २५ कलमी कार्यक्रमाची शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तात प्रसिद्ध झाले होते. या संदर्भात पिंपरी पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मांडुरके म्हणाले, ‘‘त्यांनी महाविद्यालयातील गस्तीसंदर्भात येत्या सोमवारी सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आणि चौकी अमंलदारांची बैठक बोलावली आहे. शहरातील महत्त्वाच्या महाविद्यालयांत भेट देणार असून, सर्व आठवडाभरात तक्रार पेट्या बसविण्यात येणार आहेत.’’ (प्रतिनिधी)