शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

‘मोरारजी देसार्इंना दिलेले ‘भारतरत्न’ परत घ्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 01:33 IST

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना १९९१ मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मागे घ्यावा.

मुंबई : माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना १९९१ मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मागे घ्यावा. देसार्इंनी त्यांच्या कारकिर्दीत नेहमीच ‘भारतरत्न’ व ‘पद्म’ पुरस्कारांना विरोध केला. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी एका वकिलाने याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.मोरारजी देसार्इंनी त्यांच्या ‘स्टोरी आॅफ माय लाइफ’ या आत्मचरित्रात ‘पद्म’ व ‘भारतरत्न’ पुरस्काराला त्यांचा विरोध असल्याचा उल्लेख केला आहे. या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या काही दिग्गजांनी त्याचा गैरवापर केल्याचेही देसाई यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. याचाच आधार घेत, याचिकाकर्त्या वकिलांनी देसाई ‘दुटप्पी’ असल्याचे म्हणत, त्यांना दिलेला ‘भारतरत्न’ मागे घेण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.‘भारतरत्न’ व ‘पद्म’ पुरस्कारांना विरोध करणाऱ्या व पंतप्रधान पद भूषवत असताना, हे पुरस्कार स्थगित करणाऱ्या मोरारजी देसार्इंनी १९९१ मध्ये ‘भारतरत्न’ व पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-पाकिस्तान’ स्वीकारला. असे म्हणत सरकारने त्यांना दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार मागे घ्यावा,’ अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले धनंजयसिंग जगताप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)