शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

निवृत्त पोलीस कर्मचारी, कुटुंबीयांना मोफत उपचार

By admin | Updated: May 2, 2017 04:36 IST

महाराष्ट्राचे संरक्षण करण्यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतरही पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय

कोल्हापूर : महाराष्ट्राचे संरक्षण करण्यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतरही पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून १२०० आजारांवर मोफत उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. येथील पोलीस उद्यानामध्ये उभारलेल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या तिरंग्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांची उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, पोलिसांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. त्यांना घरं बांधून देण्याची योजना राबवण्यात येत आहे. जीवनातील मौल्यवान असे क्षण पोलीस जनतेसाठी देत असतात. अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम दल असून, या दलाचे गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण ५८ टक्के इतके आहे. चंद्रकांत पाटील आणि विश्वास नांगरे पाटील यांनी या तिरंग्याच्या रूपाने एक चांगली भेट महाराष्ट्राला दिली आहे, असे सांगत फडणवीस यांनी या तिरंग्याने कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकल्याचे सांगितले. या भव्य अशा तिरंग्याकडे पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची, शाहू महाराजांची, क्रांतिकारकांची आठवण होते, परंपरेची जाणीव होते आणि ३०३ फुटांच्या या ध्वजाकडे मान उंच करून पाहिल्यानंतर ऊर भरून येतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यापुढच्या काळात इथल्या अंबाबाईला दर्शनासाठी येणारे या हा झेंडा पाहून आपली देशभक्ती जागवतील, असे ते म्हणाले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अवकळा आलेल्या पोलीस उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले. लोकांच्या सहकार्यातून हा तिरंगा उभारण्यात आला. शाहू महाराजांनी अनेक गोष्टी करून ठेवल्या. परंतु आम्ही नवीन काही केलं नव्हतं. म्हणूनच ही सुरुवात केली. कोल्हापुरात येणारा पर्यटक दोन दिवस इथं राहावा यासाठी प्रयत्न असून इथे फुलपाखरांचे संग्रहालयही करणार असल्याचे त्यांनी घोषित केले. या वेळी पोलीस महासंचालक सतीश माथूर, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पोलीस कल्याण निधीसाठी पुणे जनता बँक, उद्योगपती संजय घोडावत, चाटे शिक्षण समूह यांच्या वतीने प्रत्येकी पाच लाखांचे धनादेश या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सांगितली ‘भारत के वीर’ची जन्मकथाअक्षयकुमार याने सुरू केलेल्या ‘भारत के वीर’ या अ‍ॅपची जन्मकथा अक्षयकुमार याने सांगितली नाही. मात्र नंतर बोलणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती सांगितली. दहशतवादी कसे तयार केले जातात याची चित्रफीत ‘बीबीसी’वर दाखवली जात होती. तुम्ही ठार झालात तरी तुमच्या परिवाराची आम्ही काळजी घेऊ याची खात्री या दहशतवाद्यांना दिली जाते. मग दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या सैनिकांना याची कोण खात्री देणार? ही खात्री देण्यासाठीच अक्षयकुमार यांनी हे अ‍ॅप तयार केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.अक्षयकुमार हेलिकॉप्टरने तिरंगा फडकवणार होतेआपल्या भाषणात फडणवीस यांनी अक्षयकुमार हे हेलिकॉप्टरमधून हा तिरंगा फडकवणार होते. परंतु, वेळेमुळे ते शक्य झाले नसल्याचे सांगितले. अक्षयकुमार हे स्वत: स्टंट करतात. त्यांना आम्ही नाराज करणार नाही. आम्ही पुढे जेव्हा असा तिरंगा तयार करू तेव्हा अक्षयकुमार यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून तिरंगा फडकवण्यात येईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री, अक्षयकुमार यांनी दिल्या घोषणामुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण सुरू करण्याआधी तीन वेळा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. त्याला उपस्थितांनीही मोठा प्रतिसाद दिला. तर अक्षयकुमार यांनी ‘शिवाजी महाराज की जय’, ‘शाहू महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. त्या वेळीही उपस्थितांनी जोरदार आवाजात प्रतिसाद दिला. मी तर भाग्यवान - अक्षयकुमारअक्षयकुमार म्हणाला, मी मूळचा पंजाबचा आहे. मात्र आज महाराष्ट्र दिनी मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बसण्याचा मान मिळाला. रात्री २ वाजता झोपून पुन्हा सकाळी ७ वाजता उठून महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री काम करत आहेत, यासाठी त्यांचे अभिनंदन करू या, असे आवाहन अक्षयकुमार यांनी केले. प्रत्येक पोलीस मैदानामध्ये असा तिरंगा फडकला पाहिजे, अशी अपेक्षा त्याने या वेळी व्यक्त केली. देशातील १२५ कोटी जनता सैनिकांच्या पाठीशी आहे हे दाखवून देण्यासाठी ‘भारत के वीर’ हे अ‍ॅप तयार केले असून, नागरिकांच्या पाठबळामुळे ते लोकप्रिय आणि उपयुक्त ठरत आहे. ध्वजस्तंभाची वैशिष्ट्ये३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचे वजन २४ टन, ध्वजस्तंभाचा बेस ५ फूट, तिरंगा ध्वज ९0 फूट लांब व ६० फूट रुंद म्हणजे ५४०० चौरस फुटांचा आहे. उंचावरील वाऱ्याच्या झोताने ध्वजाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी स्पेशल पॉलिस्टर पॅराशुट फॅब्रिक्सचे कापड वापरले आहे. तसेच रात्रीच्या वेळी हा ध्वज विद्युत रोशणाईच्या झोतात फडकणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जनरेटरची सोय केली आहे. ध्वजसंहिता नियमानुसार त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली जाणार आहे. उद्यान व ध्वजस्तंभाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सात कर्मचारी ठेवले जातील. दोन पोलीस शिपाई २४ तास पहारा देतील. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना माहिती सांगण्यासाठी प्रशिक्षक ठेवला जाणार आहे. या ध्वजस्तंभाचा महिना ७० हजार रुपये देखभाल येणार खर्च आहे.