शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

दहावीचा निकाल फुगतोय!

By admin | Updated: June 10, 2015 02:16 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी- बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी- बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले. परंतु,गेल्या काही वर्षांपासून दहावी बारावीचा निकाल फुगत चालला आहे. याबाबत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. तोंडी परीक्षेत संंबंधित शळा- महाविद्यालयांकडे २० गुणांचा अधिकार दिल्याने त्यातील बहुतांश गुण मिळतात. त्यामुळे ५ गुण मिळाले तरी ग्रेस गुणांच्या सहाय्याने विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे (सीबीएसई) राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी ८०-२० पॅटर्न आणला. त्यामुळे विद्यार्थ्यांची २० गुणांची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची जबाबदारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडे सोपविण्यात आली. ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याची जबादारी राज्य मंडळाकडे देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या निकालात दरवर्षी सुमारे अडीच ते तीन टक्क्यांनी वाढ होत आहे. यंदा दहावी बारावीच्या निकालाने नव्वदी ओलांडली. फेब्रुवारी / मार्च २०१५ चा बारावीचा निकाल ९१.२६ टक्के लागला. केवळ ८.७४टक्के विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले तर दहावीचा निकाल ९१.४८ टक्के लागल्याने फक्त ८.५४ टक्के विद्यार्थी नापास झाले.दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ५८३ आहेत. बारावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी ९७ हजार ४२९ आहेत. त्यामुळे आपला मुलगा-मुलगी खरचं एवढे हुशार आहेत का? असा प्रश्न पालकांंना पडू लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळत आहेत. मात्र,आता मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेत ८० पैकी १६ गुण मिळविणे बंधनकारक केले आहे. परिणामी काठावार पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटणार आहे. त्यामुळे आपोआप दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम झालेला दिसून येईल, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)उत्तरपत्रिकाही सैल हाताने तपासल्या जातात केवळ राज्य मंडळाच्याच नाही तर सीबीएसई ,आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा इन हाऊस पद्धतीने घेतल्या जात आहेत. उत्तरपत्रिकाही सैल हाताने तपासल्या जातात. परीक्षा निकोप पद्धतीने घेणे गरजेचे आहे. वाढत चालेल्या निकालावर शिक्षण तज्ज्ञांनी गांभीर्याने विचार करावा. - श्रीधर साळुंके, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण

शैक्षणिक वर्ष २०१५- १६ पासून नववी ते बारावीपर्यंच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना८० पैकी किमान 16 गुण मिळविण्याचे बंधनकारक आहे. राज्य मंडळातर्फे प्रत्येक नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांला १५ ग्रेस गुण दिले जातात. त्यात एका विषयाला जास्तीत जास्त १० आणि केवळ तीन विषयांसाठी विभागून १५ग्रेस गुण दिले जाऊ शकतात. तर अंध व अपंग विद्यार्थ्यांना १५ ग्रेस गुण सर्व विषयांना विभागून दिले जातात.  - कृष्णकुमार पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकेवळ दहावी बारावीच नाही तर एम.ए.पर्यंतच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका तपासताना शिक्षक सढळ हाताने गुण देत असल्याचे निकालावरून दिसून येते. बहुतांश मुलांना २० पैकी २० गुण मिळतात. त्यातही हुशार मुले ८० पैकी ७० गुण प्राप्त करतात. त्यामुळे अनेक मुलांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळतात. आता ८० पैकी किमान १६ गुणांची अट घातल्याने काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांंमध्ये घट होईल.परंतु, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांवर परिणाम होणार नाही.- वसंत काळपांडे, माजी संचालक, राज्य शिक्षण मंडळ

राज्य मंडळाने लेखी परीक्षेत ८० पैकी किमान १६ गुण मिळविण्याचे बंधन घालून धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षी निकालात काही प्रमाणात घट होईल.परंतु,ही मर्यादा २४ गुणांपर्यंत वाढविण्याची आवश्यकता आहे.- वसंत वाघ, माजी प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज, पुणे