शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल फुगतोय!

By admin | Updated: June 10, 2015 02:16 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी- बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी- बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले. परंतु,गेल्या काही वर्षांपासून दहावी बारावीचा निकाल फुगत चालला आहे. याबाबत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. तोंडी परीक्षेत संंबंधित शळा- महाविद्यालयांकडे २० गुणांचा अधिकार दिल्याने त्यातील बहुतांश गुण मिळतात. त्यामुळे ५ गुण मिळाले तरी ग्रेस गुणांच्या सहाय्याने विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे (सीबीएसई) राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी ८०-२० पॅटर्न आणला. त्यामुळे विद्यार्थ्यांची २० गुणांची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची जबाबदारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडे सोपविण्यात आली. ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याची जबादारी राज्य मंडळाकडे देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या निकालात दरवर्षी सुमारे अडीच ते तीन टक्क्यांनी वाढ होत आहे. यंदा दहावी बारावीच्या निकालाने नव्वदी ओलांडली. फेब्रुवारी / मार्च २०१५ चा बारावीचा निकाल ९१.२६ टक्के लागला. केवळ ८.७४टक्के विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले तर दहावीचा निकाल ९१.४८ टक्के लागल्याने फक्त ८.५४ टक्के विद्यार्थी नापास झाले.दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ५८३ आहेत. बारावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी ९७ हजार ४२९ आहेत. त्यामुळे आपला मुलगा-मुलगी खरचं एवढे हुशार आहेत का? असा प्रश्न पालकांंना पडू लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळत आहेत. मात्र,आता मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेत ८० पैकी १६ गुण मिळविणे बंधनकारक केले आहे. परिणामी काठावार पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटणार आहे. त्यामुळे आपोआप दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम झालेला दिसून येईल, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)उत्तरपत्रिकाही सैल हाताने तपासल्या जातात केवळ राज्य मंडळाच्याच नाही तर सीबीएसई ,आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा इन हाऊस पद्धतीने घेतल्या जात आहेत. उत्तरपत्रिकाही सैल हाताने तपासल्या जातात. परीक्षा निकोप पद्धतीने घेणे गरजेचे आहे. वाढत चालेल्या निकालावर शिक्षण तज्ज्ञांनी गांभीर्याने विचार करावा. - श्रीधर साळुंके, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण

शैक्षणिक वर्ष २०१५- १६ पासून नववी ते बारावीपर्यंच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना८० पैकी किमान 16 गुण मिळविण्याचे बंधनकारक आहे. राज्य मंडळातर्फे प्रत्येक नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांला १५ ग्रेस गुण दिले जातात. त्यात एका विषयाला जास्तीत जास्त १० आणि केवळ तीन विषयांसाठी विभागून १५ग्रेस गुण दिले जाऊ शकतात. तर अंध व अपंग विद्यार्थ्यांना १५ ग्रेस गुण सर्व विषयांना विभागून दिले जातात.  - कृष्णकुमार पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकेवळ दहावी बारावीच नाही तर एम.ए.पर्यंतच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका तपासताना शिक्षक सढळ हाताने गुण देत असल्याचे निकालावरून दिसून येते. बहुतांश मुलांना २० पैकी २० गुण मिळतात. त्यातही हुशार मुले ८० पैकी ७० गुण प्राप्त करतात. त्यामुळे अनेक मुलांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळतात. आता ८० पैकी किमान १६ गुणांची अट घातल्याने काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांंमध्ये घट होईल.परंतु, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांवर परिणाम होणार नाही.- वसंत काळपांडे, माजी संचालक, राज्य शिक्षण मंडळ

राज्य मंडळाने लेखी परीक्षेत ८० पैकी किमान १६ गुण मिळविण्याचे बंधन घालून धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षी निकालात काही प्रमाणात घट होईल.परंतु,ही मर्यादा २४ गुणांपर्यंत वाढविण्याची आवश्यकता आहे.- वसंत वाघ, माजी प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज, पुणे