शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

दहावीचा निकाल फुगतोय!

By admin | Updated: June 10, 2015 02:16 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी- बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी- बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले. परंतु,गेल्या काही वर्षांपासून दहावी बारावीचा निकाल फुगत चालला आहे. याबाबत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. तोंडी परीक्षेत संंबंधित शळा- महाविद्यालयांकडे २० गुणांचा अधिकार दिल्याने त्यातील बहुतांश गुण मिळतात. त्यामुळे ५ गुण मिळाले तरी ग्रेस गुणांच्या सहाय्याने विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे (सीबीएसई) राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी ८०-२० पॅटर्न आणला. त्यामुळे विद्यार्थ्यांची २० गुणांची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची जबाबदारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडे सोपविण्यात आली. ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याची जबादारी राज्य मंडळाकडे देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या निकालात दरवर्षी सुमारे अडीच ते तीन टक्क्यांनी वाढ होत आहे. यंदा दहावी बारावीच्या निकालाने नव्वदी ओलांडली. फेब्रुवारी / मार्च २०१५ चा बारावीचा निकाल ९१.२६ टक्के लागला. केवळ ८.७४टक्के विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले तर दहावीचा निकाल ९१.४८ टक्के लागल्याने फक्त ८.५४ टक्के विद्यार्थी नापास झाले.दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ५८३ आहेत. बारावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी ९७ हजार ४२९ आहेत. त्यामुळे आपला मुलगा-मुलगी खरचं एवढे हुशार आहेत का? असा प्रश्न पालकांंना पडू लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळत आहेत. मात्र,आता मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेत ८० पैकी १६ गुण मिळविणे बंधनकारक केले आहे. परिणामी काठावार पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटणार आहे. त्यामुळे आपोआप दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम झालेला दिसून येईल, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)उत्तरपत्रिकाही सैल हाताने तपासल्या जातात केवळ राज्य मंडळाच्याच नाही तर सीबीएसई ,आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा इन हाऊस पद्धतीने घेतल्या जात आहेत. उत्तरपत्रिकाही सैल हाताने तपासल्या जातात. परीक्षा निकोप पद्धतीने घेणे गरजेचे आहे. वाढत चालेल्या निकालावर शिक्षण तज्ज्ञांनी गांभीर्याने विचार करावा. - श्रीधर साळुंके, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण

शैक्षणिक वर्ष २०१५- १६ पासून नववी ते बारावीपर्यंच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना८० पैकी किमान 16 गुण मिळविण्याचे बंधनकारक आहे. राज्य मंडळातर्फे प्रत्येक नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांला १५ ग्रेस गुण दिले जातात. त्यात एका विषयाला जास्तीत जास्त १० आणि केवळ तीन विषयांसाठी विभागून १५ग्रेस गुण दिले जाऊ शकतात. तर अंध व अपंग विद्यार्थ्यांना १५ ग्रेस गुण सर्व विषयांना विभागून दिले जातात.  - कृष्णकुमार पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकेवळ दहावी बारावीच नाही तर एम.ए.पर्यंतच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका तपासताना शिक्षक सढळ हाताने गुण देत असल्याचे निकालावरून दिसून येते. बहुतांश मुलांना २० पैकी २० गुण मिळतात. त्यातही हुशार मुले ८० पैकी ७० गुण प्राप्त करतात. त्यामुळे अनेक मुलांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळतात. आता ८० पैकी किमान १६ गुणांची अट घातल्याने काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांंमध्ये घट होईल.परंतु, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांवर परिणाम होणार नाही.- वसंत काळपांडे, माजी संचालक, राज्य शिक्षण मंडळ

राज्य मंडळाने लेखी परीक्षेत ८० पैकी किमान १६ गुण मिळविण्याचे बंधन घालून धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षी निकालात काही प्रमाणात घट होईल.परंतु,ही मर्यादा २४ गुणांपर्यंत वाढविण्याची आवश्यकता आहे.- वसंत वाघ, माजी प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज, पुणे