शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

आव्हाडांची सुरक्षा तुमचीच जबाबदारी - पवारांचे फडणवीसांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2015 18:53 IST

जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमचीच असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करत राज्याचा गृह विभागाचा प्रमुख म्हणून आव्हाडांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमचीच आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. 
शिवशाहीर बाबासेहब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका मांडणा-या आव्हाड यांच्यावर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, तसेच त्यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली.  त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत ' या संदर्भातील राज्याचा गृह विभागाचा प्रमुख म्हणून आपण योग्य जबाबदारी घ्याल' अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
'जितेंद्र आव्हाड यांच्या सांगली सभेमध्ये घुसून झालेला हल्ल्याचा प्रकार व त्या संदर्भात टेलिव्हिजनवर येऊन आव्हाड यांच्याबद्दल अशीच भूमिका घेतली जाईल अशी दिलेली धमकी हे धक्कादायक आहे.  महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा अभिमान बाळगणा-या महाराष्ट्रात वाढत असलेली ही असहिष्णूता व झुंडशाही चिंताजनक बाब आहे, असे पवारांनी पत्रात नमूद केले आहे. 
' आव्हाड यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची नोंद राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आपण व्यक्तिशः घ्याल व आव्हाड यांच्यासंदर्भात काही अघटित घडू नये अशी आपली भूमिका असेल अशी अपेक्षा व्यक्त करत  राज्याचा गृह विभागाचा प्रमुख म्हणून आपणास या संदर्भातील जबाबदारी टाळता येणार नाही' असेही पवारांनी म्हटले आहे.