शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चाला प्रतिसाद हा मराठ्यांना गृहित धरल्याचा उद्वेग - डॉ.जयसिंगराव पवार यांचे मत

By admin | Updated: October 4, 2016 18:30 IST

मराठा समाजातील बहुतेक जण हे शेतकरी आहेत. म्हणजे एकीकडे हा मराठा सर्व समाजाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो; तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शत्रूपासून

- समीर देशपांडे / ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 04 -  मराठा समाजातील बहुतेक जण हे शेतकरी आहेत. म्हणजे एकीकडे हा मराठा सर्व समाजाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो; तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शत्रूपासून तुमचे-आमचे संरक्षण करतो. म्हणजेच एकीकडे आमचे पोट भरणारा आणि दुसरीकडे आमचे संरक्षणही करणारा असा हा मराठा बदलत्या परिस्थितीत चोहोबाजूंनी पिचला आहे. आतापर्यंत अनेक वर्षे मराठ्यांना सर्व पक्षांनी गृहीत धरल्याचा हा परिणाम असल्याचे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.मराठा समाजाच्या बदलत्या परिस्थितीचे विश्लेषण करताना डॉ. पवार म्हणाले, गेल्या ३० वर्षांत सर्वसामान्य मराठा वेगवेगळ्या पद्धतींनी अडचणीत येत गेला. प्रगती झाली नाही का? तर झाली. मात्र शहरी नागरिकांमध्ये मराठ्यांची जी प्रतिमा आहे, तसा मराठा खेड्यांमध्ये सध्या नाही. मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचा सदस्य, सभापती, साखर कारखानदार अशी अनेक सत्तास्थाने मराठ्यांकडे आहेत. मात्र हेच सर्वजण म्हणजे मराठा समाज असे होत नाही. यांच्याही पलीकडे फार मोठा मराठा समाज, जो केवळ आणि केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्याची अवस्था बिकट आहे. मराठा समाज सर्व पक्षांत विभागला गेला आणि सर्वच पक्षांनी मराठ्यांना गृहीत धरले. ह्यमराठा म्हणजे बागायतदारह्ण असे चित्र पुढे आले. शेकडो टन ऊस घालणारा, चारचाकी गाड्या फिरविणारा मराठा शेतकरी तुलनेत संख्येने कमी आहे. मात्र, दुसरीकडे जिरायतदार शेतकऱ्यांचे बुडीतचे अर्थशास्त्र कुणी पाहतच नाही. अल्पभूधारक मराठा शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. एकीकडे कमी होत जाणारी शेती, दुसरीकडे शेती असूनही त्याला पाण्याची उपलब्धता नाही; तिसरीकडे त्याने पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही, कर्जे काढून शिकविलेल्या मुलाला किंवा मुलीला पाहिजे तेथे प्रवेश मिळेल याची खात्री नाही. प्रवेश मिळालाच आणि तो किंवा ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला किंवा झालीच तर नोकरीची हमी नाही, अशी नकारात्मकतेची मालिकाच सर्वसामान्य मराठ्यांच्या आयुष्यात गेली अनेक वर्षे सुरू आहे. आमच्या आधीच्या किंबहुना आमच्याही पिढीने हे सर्व सहन केले. मात्र आताची पिढी हे सहन करायला तयार नाही. यातूच राज्यभर हे मोर्चे निघत आहेत. राज्यातील जे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यात बहुतांश मराठा शेतकरीच आहेत. आपला प्यारा जीवही नकोसा वाटावा इतकी विपरीत परिस्थिती मराठा शेतकऱ्यांवर आली असेल तर मग याचा उद्रेक हा होणारच. म्हणजेच सर्वसामान्य मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सगळं दुखणं लपलं आहे. म्हणूनच केवळ मलमपट्टी न करता हे दुखणं मुळापासूनच बरं करण्यासाठीची तातडीची पावलं आता उचलली गेली पाहिजेत. राजकीय इच्छाशक्ती हवीमराठ्यांची स्थिती काय आहे, याची सर्वांना जाणीव आहे. आपल्यावर वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे तो आता पेटून उठला आहे. विशेषत: तरुण आणि तरुणी अधिक पेटून उठल्या आहेत; कारण प्रवेशापासून नोकरीपर्यंत सर्वत्र ते भरडले जात आहेत. त्यामुळे नेत्यांना बाजूला ठेवून त्यांनी ही चळवळ हाती घेतली आणि तिथे आता एवढे विशाल रूप धारण केले आहे की, नेत्यांनाच सहभागी होण्याची आता वेळ आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यासाठी केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती असल्यास तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी काही अडचण असेल, असे मला वाटत नाही. पुढची पायरी उचलायला लावू नकामराठा समाज हा आतापर्यंत झोपलेल्या ड्रॅगनप्रमाणे होता. तो आता कुठे डोळे चोळत उठायला लागला आहे. तर असे लाखालाखांचे मोर्चे महाराष्ट्रात निघायला लागले आहेत. आत्ताच या सर्व युवाशक्तीला विधायक वळण देण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलावीत. पारंपरिक समित्या आणि गट स्थापन न करता थेट निर्णय घ्यावा. मात्र तसे न झाल्यास ही मराठा युवाशक्ती पुढची पायरी उचलेल, असे मला वाटते. मात्र शासनाने तिला तशी पायरी उचलायला लावू नये.