शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मोर्चाला प्रतिसाद हा मराठ्यांना गृहित धरल्याचा उद्वेग - डॉ.जयसिंगराव पवार यांचे मत

By admin | Updated: October 4, 2016 18:30 IST

मराठा समाजातील बहुतेक जण हे शेतकरी आहेत. म्हणजे एकीकडे हा मराठा सर्व समाजाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो; तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शत्रूपासून

- समीर देशपांडे / ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 04 -  मराठा समाजातील बहुतेक जण हे शेतकरी आहेत. म्हणजे एकीकडे हा मराठा सर्व समाजाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो; तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शत्रूपासून तुमचे-आमचे संरक्षण करतो. म्हणजेच एकीकडे आमचे पोट भरणारा आणि दुसरीकडे आमचे संरक्षणही करणारा असा हा मराठा बदलत्या परिस्थितीत चोहोबाजूंनी पिचला आहे. आतापर्यंत अनेक वर्षे मराठ्यांना सर्व पक्षांनी गृहीत धरल्याचा हा परिणाम असल्याचे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.मराठा समाजाच्या बदलत्या परिस्थितीचे विश्लेषण करताना डॉ. पवार म्हणाले, गेल्या ३० वर्षांत सर्वसामान्य मराठा वेगवेगळ्या पद्धतींनी अडचणीत येत गेला. प्रगती झाली नाही का? तर झाली. मात्र शहरी नागरिकांमध्ये मराठ्यांची जी प्रतिमा आहे, तसा मराठा खेड्यांमध्ये सध्या नाही. मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचा सदस्य, सभापती, साखर कारखानदार अशी अनेक सत्तास्थाने मराठ्यांकडे आहेत. मात्र हेच सर्वजण म्हणजे मराठा समाज असे होत नाही. यांच्याही पलीकडे फार मोठा मराठा समाज, जो केवळ आणि केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्याची अवस्था बिकट आहे. मराठा समाज सर्व पक्षांत विभागला गेला आणि सर्वच पक्षांनी मराठ्यांना गृहीत धरले. ह्यमराठा म्हणजे बागायतदारह्ण असे चित्र पुढे आले. शेकडो टन ऊस घालणारा, चारचाकी गाड्या फिरविणारा मराठा शेतकरी तुलनेत संख्येने कमी आहे. मात्र, दुसरीकडे जिरायतदार शेतकऱ्यांचे बुडीतचे अर्थशास्त्र कुणी पाहतच नाही. अल्पभूधारक मराठा शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. एकीकडे कमी होत जाणारी शेती, दुसरीकडे शेती असूनही त्याला पाण्याची उपलब्धता नाही; तिसरीकडे त्याने पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही, कर्जे काढून शिकविलेल्या मुलाला किंवा मुलीला पाहिजे तेथे प्रवेश मिळेल याची खात्री नाही. प्रवेश मिळालाच आणि तो किंवा ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला किंवा झालीच तर नोकरीची हमी नाही, अशी नकारात्मकतेची मालिकाच सर्वसामान्य मराठ्यांच्या आयुष्यात गेली अनेक वर्षे सुरू आहे. आमच्या आधीच्या किंबहुना आमच्याही पिढीने हे सर्व सहन केले. मात्र आताची पिढी हे सहन करायला तयार नाही. यातूच राज्यभर हे मोर्चे निघत आहेत. राज्यातील जे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यात बहुतांश मराठा शेतकरीच आहेत. आपला प्यारा जीवही नकोसा वाटावा इतकी विपरीत परिस्थिती मराठा शेतकऱ्यांवर आली असेल तर मग याचा उद्रेक हा होणारच. म्हणजेच सर्वसामान्य मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सगळं दुखणं लपलं आहे. म्हणूनच केवळ मलमपट्टी न करता हे दुखणं मुळापासूनच बरं करण्यासाठीची तातडीची पावलं आता उचलली गेली पाहिजेत. राजकीय इच्छाशक्ती हवीमराठ्यांची स्थिती काय आहे, याची सर्वांना जाणीव आहे. आपल्यावर वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे तो आता पेटून उठला आहे. विशेषत: तरुण आणि तरुणी अधिक पेटून उठल्या आहेत; कारण प्रवेशापासून नोकरीपर्यंत सर्वत्र ते भरडले जात आहेत. त्यामुळे नेत्यांना बाजूला ठेवून त्यांनी ही चळवळ हाती घेतली आणि तिथे आता एवढे विशाल रूप धारण केले आहे की, नेत्यांनाच सहभागी होण्याची आता वेळ आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यासाठी केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती असल्यास तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी काही अडचण असेल, असे मला वाटत नाही. पुढची पायरी उचलायला लावू नकामराठा समाज हा आतापर्यंत झोपलेल्या ड्रॅगनप्रमाणे होता. तो आता कुठे डोळे चोळत उठायला लागला आहे. तर असे लाखालाखांचे मोर्चे महाराष्ट्रात निघायला लागले आहेत. आत्ताच या सर्व युवाशक्तीला विधायक वळण देण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलावीत. पारंपरिक समित्या आणि गट स्थापन न करता थेट निर्णय घ्यावा. मात्र तसे न झाल्यास ही मराठा युवाशक्ती पुढची पायरी उचलेल, असे मला वाटते. मात्र शासनाने तिला तशी पायरी उचलायला लावू नये.