शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जीवनवादाचा सन्मान

By admin | Updated: February 7, 2015 02:11 IST

भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यातही मला झालेला आनंद अधिक आहे; कारण मी त्यांचा प्रकाशकही आहे आणि मित्रसुद्धा आहे.

नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांनाच आनंदरामदास भटकळ भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यातही मला झालेला आनंद अधिक आहे; कारण मी त्यांचा प्रकाशकही आहे आणि मित्रसुद्धा आहे. गेली जवळजवळ ४० वर्षे आम्ही एकत्र काम केले आहे. त्यांच्या पहिल्या कादंबरीपासून आताच्या ‘हिंदू’पर्यंत आम्ही एकत्र आहोत. त्यांचे कवितासंग्रह असोत किंवा अगदी ‘कोसला’चे इंग्रजी भाषांतर असो, हे सगळे आम्ही प्रकाशित केले आहे. त्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान होत असताना आमचीही मान कुठेतरी ताठ झाल्याचे जाणवते.मला असे वाटते, की पुरस्काराच्या महत्त्वापेक्षा त्यानिमित्ताने त्यांची एकूण जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे आणि त्यांनी साहित्यात जीवनवाद पुन्हा नव्याने रुजवला तसेच देशीवाद ही एक कल्पना मांडली. या दोन्ही गोष्टींचे त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंब दिसते. ‘मी जे जगतो, ते लिहितो’ ही त्यांची वृत्ती मला भावते. कारण पुष्कळवेळा लेखक खूप चांगले लिहितो; पण त्याचा त्याच्या जीवनाशी काही संबंध नसतो; परंतु नेमाडे यांचे तसे नाही. जीवनाकडे आणि साहित्याकडे पाहण्याचा, तसेच साहित्यात जीवनवादी विचार आणण्याचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन आहे. ते आपली मते ठामपणे मांडतात. अनेकदा ती लोकांना, मला किंवा तुम्हाला रुचणार नाहीत; पण त्यांची त्यामागची भूमिका अत्यंत स्पष्ट असल्यामुळे ती रोखठोकपणे मांडणे आवश्यकच ठरते. त्याने कधी मतभेद होतील किंवा कुणी दुखावतीलही! पण ती मांडणे हे महत्त्वाचे असते. त्यांच्या लेखनामागे खूप विचार आहे. त्यांच्या पहिल्या पाच कादंबऱ्या या प्रामुख्याने स्वत:च्या आयुष्याबद्दलच्या होत्या; पण त्या आत्मचरित्रात्मक नव्हत्या. प्रत्यक्ष घटनांचा आराखडा तेवढा त्यात होता. त्यामागचा विचार ही त्यांची कादंबरी आहे; त्यातल्या घटना म्हणजे त्यांची कादंबरी नव्हे. त्यांच्या प्रत्येक वाक्यामागचे जे चिंतन आहे ते महत्त्वाचे आहे. ‘हिंदू’ या त्यांच्या कादंबरीचा व्यापच मुळी मोठा आहे़ (शब्दांकन : राज चिंचणकर)मातृभाषा संवर्धन ज्ञानपीठापेक्षा महत्त्वाचे मातृभाषा संवर्धनाचा विषय हा ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा महत्त्वाचा असल्याचे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. ज्ञानपीठ पुरस्कारांसारखे पुरस्कार मरणोत्तरच मिळतात अशी माझी समज होती, त्यामुळे आता मरण जवळ आले आहे की काय अशी शंकाही मनात येऊन गेली अशी आपल्या खास शैलीतील प्रतिक्रिया नेमाडे यांनी व्यक्त केली. केवळ मराठीचाच कैवार नाही मातृभाषा संवर्धन सभेचा कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी शाळांच्या अनुदानाचा प्रश्न घेऊन काही व्यक्ती राज्याच्या कानाकोपऱ्यातून शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांना भेटायला आले होते. मात्र कार्यक्रम काहीसा लांबल्याने वैतागलेल्या तावडे यांनी या व्यक्तींना न भेटताच सभागृह सोडले. शिवाय, सभागृहातून जाता- जाता केवळ मराठीचाच मी कैवारी नव्हे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्नही आमच्यासमोर आहे असे सांगत सभागृह सोडले. या घटनेनंतर, लगचेच कार्यक्रमाचे आयोजक अ‍ॅड. गिरीश राऊत मंचावर धावले. माईक हातात घेत त्यांनी तावडेंच्या वागण्यावर रोष व्यक्त केला.इंग्रजीमुळे नोकरी मिळते ही निव्वळ अंधश्रद्धाइंग्रजीमुळे नोकरी मिळते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, याचा समावेश नरेंद्र दाभोलकरांच्या अजेंड्यामध्ये का नव्हता हा प्रश्न सतत भेडसावत राहतो. इंग्रजी हे गांजा, अफूप्रमाणे व्यसन असून त्यावर कायदेशीर बंदी असली पाहिजे, असे मत ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांनी मांडले. दादर सार्वजनिक वाचनालयात मातृभाषा संवर्धन सभा आयोजित केली होती. याप्रसंगी, नेमाडे बोलत होते. बाहेरचे बूट घरात आणू नये, ते बाहेरच असावे. आपणही इंग्रजीचे महत्त्व तेवढेच ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.मराठी साहित्याचा सन्मानमराठीतील साठोत्तरी साहित्याने नवनवे प्रवाह निर्माण करीत वाङ्मयात क्रांतिकारी परिवर्तन घडविले आहे. या परंपरेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचाच सन्मान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमाडे यांचे अभिनंदन केले आहे.विशेष गौरव करणार -तावडेमहाराष्ट्र सरकारतर्फे ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांचा भव्य सत्कार केला जाईल, अशी घोषणा मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केली. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व समीक्षक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तावडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.भालचंद्र वनाजी नेमाडेजन्म : २७ मे १९३८, सांगवी, खानदेशसाहित्यप्रकार : कादंबरी, कविता, समीक्षाप्रसिद्ध साहित्यकृती : कोसलापुरस्कार : साहित्य अकादमी शिक्षणखानदेशात मॅट्रिक(१९५५), (बी.ए.१९५९, फर्ग्युसन कॉलेज, पुणे), एम.ए. १९६१, (भाषाशास्त्र, डेक्कन कॉलेज, पुणे), आणि एम.ए., (इंग्रजी साहित्य, मुंबई विद्यापीठ) मुंबई- १९६४. त्यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.व्यवसाय इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर(१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), आणि १९७४ पासून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. शेवटी ते मुबई विद्यापीठातील तुलनात्मक साहित्याच्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले.कोसला पहिली कादंबरी(१९६३)कोसला हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाडयमय प्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.कोसलानंतर...कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार(१९६७), जरीला(१९७७) व झूल(१९७९) या चांगदेव पाटील या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे यांनी लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१० ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबरीसोबतच त्यांचे ह्यदेखणीह्णआणि ह्यमेलडी (१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरेही प्रकाशित झाली आहेत.१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.कादंबऱ्याकोसला (१९६३)जरीला (१९७७)झूल (१९७९)बिढार (१९६७)हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११)हूलकवितादेखणीमेलडी (१९७०)समीक्षा टीकास्वयंवरतुकाराममुलाखतीसाहित्याची भाषासोळा भाषणेजन्मगावी आनंदोत्सवभालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या सांगवी बुद्रुक या मूळ गावी आनंदोत्सव साजरा झाला. नेमाडे यांचे प्राथमिक शिक्षण सांगवी बुद्रुक येथे झाले. तर भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. अनेक साहित्यिकांची खंत असते, की ‘ज्ञानपीठ’ मिळत नाही. पण नेमाडे हे या पुरस्कारास निश्चित पात्र आहेत. - डॉ. सदानंद मोरे, नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्षक्क्क्ज्येष्ठ साहित्यिक बा. सी. मर्ढेकर यांच्या तोडीचे काम करणारे नेमाडे हे एकमेव साहित्यिक आहेत. ते प्रक्षुब्ध निबंधकार आहेत. व्यवस्थेविरोधात असंतोष व्यक्त करण्याची त्यांची भाषा आहे. प्रचलित मतांपेक्षा काहीतरी वेगळे मांडताना त्याकडे ‘वाच्यार्थ’ म्हणून न पहाता एका भूमिकेच्या दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे. - डॉ. द. भि. कुलकर्णी, माजी संमेलनाध्यक्षक्क्क्ामच्यात वैचारिक मतभेद आहेत. ते कमी होतील असे नाही, तर ते राहतीलच. पण तरीही नेमाडे यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर होणे हे आनंदाचा क्षण आहे. - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी संमेलनाध्यक्ष क्क्क्डॉ. नेमाडे हे आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहेत. वास्तविक पहाता त्यांच्या कार्याचा गौरव हा कधीच व्हायला हवा होता. परंतु उशीरा का होईना त्यांच्या कार्याची दखल घेतली. - रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिकक्क्क्गुरू शिष्य आणि वडील-मुलगा असे आमचे नाते आहे. त्यांना हा सन्मान प्राप्त झाल्याने तो आम्हालाच मिळाल्यासारखा आहे. त्यांनी मराठी साहित्याची परंपरा खणखणीतपणे मोडून काढली. ते म्हणजे एक विद्यापीठच आहेत. - राजन खान, ज्येष्ठ साहित्यिक क्क्क्नेमाडे यांच्या लिखाणाला धार असून, प्रतिभा आहे. ‘कोसला’नंतर तरुणाईने त्यांच्याकडून लिखणाची प्रेरणा घेतली. शिवाय त्यांनी संशोधन करून लिहलेली ‘हिंदू’देखील तेवढीच गाजली.- रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ साहित्यिकक्क्क्नेमाडेंच्या योगदानाची दखल शासनाने घेतली याचा आनंद आहे़ आणि लवकरच नेमाडे त्यांच्या रोखठोक शैलीत पुन्हा भेटतील, अशी आशा आहे़- रा़ ग़ कर्णिक, साहित्यिकनेमाडेंच्या पिढीतला साहित्य सहवास मला लाभला याचा मला आनंद आहे़ त्यांच्यासारखा साहित्यिक मराठी साहित्य विश्वात होणे नाही़ - विजया राजाध्यक्ष, साहित्यिकानेमाडे यांना मिळालेला हा ज्ञानपीठ पुरस्कार आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची येऊ घातलेली प्रक्रिया हा सुवर्ण योग, हा मराठी भाषेचा अनोखा सन्मान आहे़- मधु मंगेश कर्णिकमातृभाषा संवर्धन सभेच्या दिवशी भालचंद्रे नेमाडे यांना हा पुरस्कार जाहीर होणे आणि त्याही पेक्षा ही सभा आणि या सभेचा उद्देश नेमाडे यांना महत्त्वाचा वाटणे यातच सारे काही आले.- अ‍ॅड़ गिरीष राऊतभालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन आहे. मात्र हा पुरस्कार यापूर्वीच नेमाडेंना मिळायला पाहिजे होता. - डॉ. विजया वाडयोग्य व्यक्तीला ज्ञानपीठ मिळाले असून, अशा व्यक्तीला ज्ञानपीठ मिळणे म्हणजे सोन्याहून पिवळे आहे. - शिरीष पै (कवयित्री )