शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बोंडअळीच्या भरपाईवरून विरोधक परिषदेत संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:51 IST

  मागील हिवाळी अधिवेशनात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३५ हजार ५०० रुपयांची तर धान उत्पादकांना १४ हजारांची मदत सरकारने जाहीर केली होती.

नागपूर -  मागील हिवाळी अधिवेशनात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३५ हजार ५०० रुपयांची तर धान उत्पादकांना १४ हजारांची मदत सरकारने जाहीर केली होती. परंतु ती अद्याप मिळालेली नाही. हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का? मदत कधी देणार हे आधी जाहीर करा, त्यानंतरच कामकाजाला सुरुवात करा अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी विधान परिषदेत घेत यावर २८९ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही मागणी फेटाळल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. दोनदा सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम असल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात झाल्यानंतर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले विलास पोतनीस, कोकण पदवीधरमधील निरंजन डावखरे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले किशोर दराडे यांचा शपथविधी झाला. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारताच धनंजय मुंडे यांनी बोंडअळी व धान उत्पादक नुकसानग्रस्त शेतकºयांना सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत अद्याप मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. डिसेंबर २०१७ मध्ये याच सभागृहात झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने बोंडअळीसाठी प्रतिहेक्टरी ३७ हजार ५०० आणि धानावर आलेल्या तुडतुडा रोगाच्या नुकसान भरपाईसाठी १४ हजार रुपये देण्याची सरकारने घोषणा केली होती. ते कधी देणार, ते सांगा आणि नंतरच कामकाज करा. मात्र, सभापतींनी प्रश्नोत्तराच्या तासात अशा प्रकारचा प्रस्ताव मांडता येत नसल्याने सांगून तो नाकारला. यावर विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या