शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातग्रस्तांच्या नुकसान भरपाईतील बदलाला विरोध

By admin | Updated: February 13, 2015 01:48 IST

रेल्वे प्रवासा दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत रेल्वेच्या नविन कायद्यात बदल केला जाणार आहे.

मुंबई : रेल्वे प्रवासा दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत रेल्वेच्या नविन कायद्यात बदल केला जाणार आहे. यात नुकसानभरपाईचा भार रेल्वेवर कमी पडावा यासाठी कायद्यात करण्यात येत असलेल्या तरतुदीत अपघातग्रस्त प्रवाशाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई न मिळण्यासाठीच प्रयत्न करण्यात येत असून त्याला लोकल प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे. संसद स्थायी समिती (रेल्वे) अध्यक्ष दिनेश त्रिवेदी, समितीचे सदस्य तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेचे अधिकारी तसेच प्रवासी संघटना यांची नरीमन पॉर्इंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये रेल्वेच्या अ‍ॅमेंडमेन्ट अ‍ॅक्ट (बिल) २0१४ मधील नविन तरतुदींवर एक बैठक झाली. या बैठकीत प्रथम सर्व प्रवासी संघटनांचे मत घेण्यात आले आणि त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना किमान चार लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. रेल्वे न्यायालयात गेल्यानंतर सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांचे सोपस्कार पार पाडल्यानतर ही नुकसान भरपाई मिळते. १९९१ सालापासून अशाप्रकारच्या नुकसानभरपाईची तरतुद करण्यात आली असून आता या तरतुदीत नविन रेल्वे कायद्यात बदल करण्याचे सूचविण्यात आले आहे. हा तर प्रवाशांवर अन्याय होण्यासारखे आहे. रेल्वे आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे आमचा याला जोरदार विरोध आहे, असे रेल्वे अ‍ॅक्सिडेंट व्हिक्टिम असोसिएशन अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले. चुकीची तरतुद करण्यात येत असून त्याला आमचा विरोध आहे, असे मुंबई रेल यात्री संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणाले.