शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

रेल्वे अपघातग्रस्तांच्या नुकसान भरपाईतील बदलाला विरोध

By admin | Updated: February 13, 2015 01:48 IST

रेल्वे प्रवासा दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत रेल्वेच्या नविन कायद्यात बदल केला जाणार आहे.

मुंबई : रेल्वे प्रवासा दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत रेल्वेच्या नविन कायद्यात बदल केला जाणार आहे. यात नुकसानभरपाईचा भार रेल्वेवर कमी पडावा यासाठी कायद्यात करण्यात येत असलेल्या तरतुदीत अपघातग्रस्त प्रवाशाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई न मिळण्यासाठीच प्रयत्न करण्यात येत असून त्याला लोकल प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे. संसद स्थायी समिती (रेल्वे) अध्यक्ष दिनेश त्रिवेदी, समितीचे सदस्य तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेचे अधिकारी तसेच प्रवासी संघटना यांची नरीमन पॉर्इंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये रेल्वेच्या अ‍ॅमेंडमेन्ट अ‍ॅक्ट (बिल) २0१४ मधील नविन तरतुदींवर एक बैठक झाली. या बैठकीत प्रथम सर्व प्रवासी संघटनांचे मत घेण्यात आले आणि त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना किमान चार लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. रेल्वे न्यायालयात गेल्यानंतर सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांचे सोपस्कार पार पाडल्यानतर ही नुकसान भरपाई मिळते. १९९१ सालापासून अशाप्रकारच्या नुकसानभरपाईची तरतुद करण्यात आली असून आता या तरतुदीत नविन रेल्वे कायद्यात बदल करण्याचे सूचविण्यात आले आहे. हा तर प्रवाशांवर अन्याय होण्यासारखे आहे. रेल्वे आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे आमचा याला जोरदार विरोध आहे, असे रेल्वे अ‍ॅक्सिडेंट व्हिक्टिम असोसिएशन अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले. चुकीची तरतुद करण्यात येत असून त्याला आमचा विरोध आहे, असे मुंबई रेल यात्री संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणाले.