शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

आरक्षण नामंजूर, मराठा नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:37 IST

आंदोलनाची उपसणार तलवार  : जल्लोश फक्त भाजपचाच! 

-  गणेश देशमुख

अमरावती - मराठ्यांना देण्यात आलेले आरक्षण ही मराठ्यांची फसगत असून, हे आरक्षण आम्हाला नामंजूर आहे, असा सूर सकल मराठ्यांमधून उमटला आहे. आरक्षणासाठी उगारलेली आंदोलनाची तलवार म्यान केली जाणार नाही, असा निर्धारही सकल मराठ्यांनी व्यक्त केला.  

गुरुवारी विधानसभा आणि विधान परिषदेत आरक्षण विधेयक पारित केल्यानंतर हायकमांडच्या आदेशावरून भाजपजन गावोगावी, तालुका आणि जिल्हा मुख्यालयी जल्लोषाचा ‘इव्हेन्ट’ आयोजित करीत सुटले आहेत. मराठ्यांमध्ये मात्र त्याच ताकदीने निषेध व्यक्त केला जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्याचे  भाजपकडून केले जाणारे मार्केटिंग मराठ्यांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळेच मराठा मंडळींनी व्हॉट्सअ‍ॅपच्या असंख्य ग्रुपवरून  शासनाच्या या फसव्या आरक्षणावर हल्ला चढविला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठ्यांची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी दिवसभर राज्यात अनेक ठिकाणी मंथन करण्यात आले. अद्याप निश्चित नीती जाहीर करण्यात आली नसली तरी आंदोलनात्मक पवित्रा कायम ठेवायचाच, हा निर्धार मात्र सर्वांनी एकमताने केला. विदर्भात मराठ्यांचा खासा प्रभाव असलेल्या अमरावती जिल्ह्यात या आरक्षण घोषणेनंतर निषेधाचे सूर सर्वत्र उमटत आहेत. मूक मोर्चासाठी १५ लक्ष मराठा एकत्र आणण्याची क्षमता सिद्ध केलेल्या अमरावती जिल्ह्यात कुण्याही मराठा संघटनेने जल्लोष साजरा केला नाही. राज्यातील मराठा आंदोलनासंबंधीची नीती ठरविणाºयांमध्ये अमरावतीतील मराठ्यांचा सक्रिय सहभाग होता, हे येथे उल्लेखनीय.    

मराठ्यांच्या नाराजीचे कारण काय? शासनाने आरक्षणाचे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत पारित केले. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला. तथापि, आरक्षण खरोखरीच द्यावयाचे असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांत हा कायदा पारित करावा लागेल. त्यासाठी विशेष दुरुस्ती करून राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या आरक्षणाचा समावेश व्हावा लागेल, तरच मराठ्यांना संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यासारख्या नोकºयांमध्ये आरक्षण मिळेल. आताच्या आरक्षणातून हा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्राबाहेरील मराठा समुदायालाही या आरक्षणाचा लाभ नाही. राज्याबाहेर निष्प्रभ असे हे आरक्षण न्यायालयात टिकणारेदेखील नाही. तामिळनाडू राज्याने केंद्रातून मंजूर करवून घेतलेल्या आरक्षणाची मागणी मराठ्यांनी केली होती. राज्य शासनाने मात्र शब्द पाळला नाही, अशी भावना मराठ्यांची आहे. 

 

निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून भाजपने खेळलेली ही खेळी आहे. काँग्रेसलाही आरक्षण द्यावयाचे नव्हते, भाजपलाही ते द्यावयाचे नाही. मराठा आता जागरूक आहे. संसदेतून आरक्षण मिळाल्याशिवाय मराठ्यांचा लढा थांबणार नाही. - सकल मराठा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण