शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण नामंजूर, मराठा नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:37 IST

आंदोलनाची उपसणार तलवार  : जल्लोश फक्त भाजपचाच! 

-  गणेश देशमुख

अमरावती - मराठ्यांना देण्यात आलेले आरक्षण ही मराठ्यांची फसगत असून, हे आरक्षण आम्हाला नामंजूर आहे, असा सूर सकल मराठ्यांमधून उमटला आहे. आरक्षणासाठी उगारलेली आंदोलनाची तलवार म्यान केली जाणार नाही, असा निर्धारही सकल मराठ्यांनी व्यक्त केला.  

गुरुवारी विधानसभा आणि विधान परिषदेत आरक्षण विधेयक पारित केल्यानंतर हायकमांडच्या आदेशावरून भाजपजन गावोगावी, तालुका आणि जिल्हा मुख्यालयी जल्लोषाचा ‘इव्हेन्ट’ आयोजित करीत सुटले आहेत. मराठ्यांमध्ये मात्र त्याच ताकदीने निषेध व्यक्त केला जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्याचे  भाजपकडून केले जाणारे मार्केटिंग मराठ्यांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळेच मराठा मंडळींनी व्हॉट्सअ‍ॅपच्या असंख्य ग्रुपवरून  शासनाच्या या फसव्या आरक्षणावर हल्ला चढविला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठ्यांची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी दिवसभर राज्यात अनेक ठिकाणी मंथन करण्यात आले. अद्याप निश्चित नीती जाहीर करण्यात आली नसली तरी आंदोलनात्मक पवित्रा कायम ठेवायचाच, हा निर्धार मात्र सर्वांनी एकमताने केला. विदर्भात मराठ्यांचा खासा प्रभाव असलेल्या अमरावती जिल्ह्यात या आरक्षण घोषणेनंतर निषेधाचे सूर सर्वत्र उमटत आहेत. मूक मोर्चासाठी १५ लक्ष मराठा एकत्र आणण्याची क्षमता सिद्ध केलेल्या अमरावती जिल्ह्यात कुण्याही मराठा संघटनेने जल्लोष साजरा केला नाही. राज्यातील मराठा आंदोलनासंबंधीची नीती ठरविणाºयांमध्ये अमरावतीतील मराठ्यांचा सक्रिय सहभाग होता, हे येथे उल्लेखनीय.    

मराठ्यांच्या नाराजीचे कारण काय? शासनाने आरक्षणाचे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत पारित केले. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला. तथापि, आरक्षण खरोखरीच द्यावयाचे असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांत हा कायदा पारित करावा लागेल. त्यासाठी विशेष दुरुस्ती करून राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या आरक्षणाचा समावेश व्हावा लागेल, तरच मराठ्यांना संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यासारख्या नोकºयांमध्ये आरक्षण मिळेल. आताच्या आरक्षणातून हा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्राबाहेरील मराठा समुदायालाही या आरक्षणाचा लाभ नाही. राज्याबाहेर निष्प्रभ असे हे आरक्षण न्यायालयात टिकणारेदेखील नाही. तामिळनाडू राज्याने केंद्रातून मंजूर करवून घेतलेल्या आरक्षणाची मागणी मराठ्यांनी केली होती. राज्य शासनाने मात्र शब्द पाळला नाही, अशी भावना मराठ्यांची आहे. 

 

निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून भाजपने खेळलेली ही खेळी आहे. काँग्रेसलाही आरक्षण द्यावयाचे नव्हते, भाजपलाही ते द्यावयाचे नाही. मराठा आता जागरूक आहे. संसदेतून आरक्षण मिळाल्याशिवाय मराठ्यांचा लढा थांबणार नाही. - सकल मराठा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण