शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

मागासवर्गीयांचे आरक्षण धाब्यावर

By admin | Updated: February 11, 2016 03:41 IST

राज्यातील एकूण २६ महापालिकांमध्ये अनुसूचित जातींसाठी नगरसेवकपदाच्या १३ टक्क्यांप्रमाणे ३३८ जागा राखीव ठेवणे बंधनकारक असताना केवळ २६० जागाच राखीव ठेवण्यात

मुंबई : राज्यातील एकूण २६ महापालिकांमध्ये अनुसूचित जातींसाठी नगरसेवकपदाच्या १३ टक्क्यांप्रमाणे ३३८ जागा राखीव ठेवणे बंधनकारक असताना केवळ २६० जागाच राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी राज्यात सात टक्क्यांप्रमाणे १८२ जागा आरक्षित करणे आवश्यक असताना केवळ ७० ठिकाणीच आरक्षण बहाल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, लातूर, चंद्रपूर, नांदेड, सांगली-मिरज-कुपवाडा, औरंगाबाद आणि अहमदनगर वगळता इतर पंधरा महानगरपालिकांनी मागासवर्गीयांचे आरक्षण दडवून त्या जागा खुल्या प्रवर्गाला बहाल केल्या आहेत. मुंबई महापालिकेत निर्धारित आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी ३०, तर जमातींसाठी १५ जागा राखीव असायला हव्या. प्रत्यक्षात मात्र अनुसूचित जातींसाठी ११, तर जमातींसाठी केवळ दोन जागाच राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात तर केवळ ७ टक्केच आरक्षण देण्यात आले आहे. अनुसूचित जातींच्या नगरसेवकांची संख्या १६ असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ ६ नगरसेवकच पालिकेत निवडून आले. तर जमातींच्या सदस्यांची संख्या नऊ असायला हवी होती. पण तीनच नगरसेवक या आरक्षणात निवडून आले आहेत. ठाण्यातल्याच भिवंडी महानगरपालिकेतील सदस्यांची संख्या ९० आहे. तिथे अनु. जातींसाठी ११ जागा तर जमातींसाठी सहा जागांवर आरक्षण असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात दोन्ही प्रवर्गांतून केवळ एकच नगरसेवक सभागृहात आहे. मीरा- भार्इंदर महानगरपालिकेतही केवळ एक टक्का आरक्षण देण्यात आले आहे. ९५ सदस्यांच्या सभागृहात दोन्ही प्रवर्गातून प्रत्येकी एकच नगरसेवक सभागृहात निवडून आले आहेत.मालेगाव महानगरपालिकेत किमान १० अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून यायला हवे होते. मात्र केवळ ३ जागा भरण्यात आल्यात. अनु. जमातीच्या पाचपैकी केवळ दोन जागाच भरण्यात आल्या. जळगाव महानगरपालिकेत आरक्षित जागांची संख्या अनु. जातींसाठी ९ आणि जमातींसाठी ५ इतकी होती. मात्र प्रत्यक्षात भरण्यात आलेल्या आरक्षित जागांची संख्या अनुक्रमे ५ आणि २ असल्याचे स्पष्ट झाले आहे. धुळे महानगरपालिकेच्या ७७ जागांपैकी ९ ठिकाणी मागास आणि ४ ठिकाणी जमातींसाठी आरक्षण आवश्यक असताना अनुक्रमे ५ आणि ३ जागाच राखीव ठेवल्या आहेत. (प्रतिनिधी)या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितल्याचे गजभिये यांनी सांगितले. आयोगाने मागासवर्गीयांना तातडीने न्याय द्यावा, अन्यथा उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.