शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 05:13 IST

उस्मानाबादेत धुमशान । मधुकर चव्हाण, राणा पाटील, तानाजी सावंतांनी थोपटले दंड

उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत यावेळी उथळ पक्षांतर, बंडखोरीने चांगलाच खळखळाट निर्माण केला आहे़ उमेदवारीसाठी ऐनवेळी दुसरा झेंडा हाती घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे़ या सगळ्या उलथापालथीत मतदारांचे लक्ष मात्र, तुळजापूर अन् परंडा मतदारसंघाकडे लागले आहे़ येथून तीन आजी-माजी मंत्री आखाड्यात आहेत़ यावेळची लढत ही तिघांसाठीही प्रतिष्ठेची आहे़ कोणत्याही स्थितीत प्रतिस्पर्ध्याची पाठ लावायचीच, या इर्ष्येने वेगवेगळे डाव टाकले जात आहेत़

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात रंगतदार लढत ही तुळजापुरात होत आहे़ येथे भाजपने माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील व काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यात कुस्ती लागली आहे़ पाचवेळा निवडून आलेल्या चव्हाणांसमोर यावेळी भाजपने राणा पाटील यांना उतरवून पहिल्यांदाच आव्हान निर्माण केले आहे़ दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी व प्रहारनेही तगडे उमेदवार दिल्याने रंगत वाढली आहे़ असे असले तरी राणा व मधुकररावांसाठी ही लढत टोकाच्या प्रतिष्ठेची आहे़विधानपरिषदेची टर्म अजून बरीच शिल्लक असतानाही जनतेतून निवडून जाण्याचा चंग बांधलेल्या जलसंधारणमंत्री प्रा़तानाजी सावंत यांनी परंडा मतदारसंघात सेनेकडून शड्डू ठोकला आहे़ त्यांच्यापुढे हॅट्ट्रीक साधलेल्या राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचे आव्हान आहे़ राष्ट्रवादीचा हा गड सर करण्यासाठी सावंतांनी जंग-जंग पछाडले आहे़ दरम्यान, या दोघांच्या भांडणात ‘वंचित’च्या सुरेश कांबळे यांनीही मतदारसंघात आपली ‘हवा’ तयार करण्यात यश मिळविले आहे़

उमरग्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार हॅट्ट्रीक साधण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत़ मात्र, त्यांच्यापुढे काँग्रेसच्या दिलीप भालेराव यांनी आव्हान निर्माण केले आहे़ येथे वंचित बहुजन आघाडीही निर्णायक स्थितीत आहे़उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने कैलास पाटील या तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे़ तर राष्ट्रवादीने संजय निंबाळकर यांच्या माध्यमातून सेनेला आव्हान दिले आहे़ या दोघांपुढे बंडखोर अजित पिंगळे, सुरेश पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे धनंजय शिंगाडे यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे़ खा़ओमराजेंसाठी ही जागा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे़प्रचारातील चर्चेचे मुद्देपरंड्यापासून तुळजापूर व्हाया उस्मानाबाद, कृष्णेच्या पाण्याचा मुद्दाच प्रचारात अग्रस्थानी आहे़ मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी पुढच्या पाच वर्षात आपणच आणून दाखवू, अशी ग्वाही वरील तिन्ही मतदारसंघात सर्वच उमेदवार मतदारांना देत आहेत़रोजगार हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरत आहे़ जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नसल्याने तरुणांना गाव सोडावे लागते़ त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय सर्वच उमेदवारांनी अजेंड्यावर घेतला आहे़ निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघात रोजगार देणारे मोठे उद्योग आणण्याचे आश्वासन उमेदवार मतदारांना देत आहेत़जिल्ह्यात बहुसंख्य मतदार हे शेतकरी आहेत़ त्यामुळे स्वाभाविकच प्रचारात हा घटक फ्रंटफुटवर असणाऱ त्यांच्यासाठी सिंचन सुविधा, शेतमालास भाव, कृषी प्रक्रिया उद्योग, पीकविमा, असे परंपरागत मुद्दे रेटले जात आहेत़