शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘सारथी’चा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 06:08 IST

राज्यातील मराठा, कुणबी समाजासह शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी अधिकाधिक संधी मिळावी यावर भर देणारा

मुंबई : राज्यातील मराठा, कुणबी समाजासह शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी अधिकाधिक संधी मिळावी यावर भर देणारा आणि या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजना सुचविणारा अहवाल छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) मार्गदर्शन समितीने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सारथीच्या स्थापनेची घोषणा केली होती. ख्यातनाम विचारवंत आणि सामाजिक अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील ‘सारथी’च्या स्थापनेसंदर्भात पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन समितीचीही स्थापना करण्यात आली होती. सदानंद मोरे यांच्या समितीने गुरुवारी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. या वेळी मोरे, समिती सदस्य परिहार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.मोरे यांच्या अहवालात विविध शिष्यवृत्त्या, विद्यावेतन, स्पर्धा परीक्षा व करिअरविषयक मार्गदर्शन, साहित्य निर्मिती, कौशल्यविषयक संधी, यासह अनेक विकासविषयक योजना सुचविल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून कृषी, कृषीसंलग्न व्यवसाय व जलसंधारणविषयक संशोधन, प्रसार व प्रशिक्षण यासाठी समन्वयाचे काम होणार आहे. तसेच मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाजातील विविध घटकांच्या कौशल्य विकासासाठी विशेष प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत.सारथीच्या माध्यमातून किमान दोन वर्षांसाठी सहा विशेष प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याचीही शिफारस समितीने केली आहे. संस्थेमार्फत सुचविलेल्या विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील आठ ठिकाणी प्रादेशिक कार्यालयांची स्थापना, सर्व तालुकास्तरावर दूत नेमण्याची शिफारस आहे. याशिवाय सारथी संस्थेची संरचना, कार्यपद्धती, कार्यक्रम-उपक्रमांबाबतही अहवालात सविस्तर सूचना केल्या आहेत. समितच्या शिफारशीनुसार सारथी ही संस्था ना नफा-ना तोटा या तत्त्वावर चालविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.