शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

‘त्या’ वाढीव बेकायदा बांधकामांबाबत पुढील सभेत अहवाल

By admin | Updated: September 5, 2016 03:36 IST

शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यान झालेल्या रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्यांनी पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बेकायदा बांधकामे केली

कल्याण : पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यान झालेल्या रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्यांनी पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बेकायदा बांधकामे केली आहेत. याप्रकरणी ‘क’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांना निलंबित करा, असा प्रस्ताव शिवसेनेचे स्थायी समितीचे सदस्य मोहन उगले यांनी शुक्रवारच्या स्थायीच्या सभेत दाखल केला होता. यावर वानखेडे यांच्याकडून खुलासा मागवून तो अहवाल पुढील सभेत ठेवू, असे स्पष्टीकरण उपायुक्त सुनील लहाने यांनी दिले.जानेवारीत शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील असलेल्या दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यात आला. यात काही इमारतीही होत्या. मात्र, रस्ता रुंदीकरणात बांधकामे बाधित झालेल्या काही व्यापाऱ्यांनी सर्रासपणे दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बांधकामे केली आहेत. काही बांधकामांचे इमले दोन ते तीन मजल्यांपर्यंत उभारले गेले आहेत. ज्यांच्या बांधकामांना स्थगिती आदेश आहेत, त्यांचेही या रस्तारुंदीकरणात चांगलेच फावले आहे. याकडे सर्वपक्षांच्या नगरसेवकांची अळीमिळी गुपचिळीची भूमिकाही आश्चर्यकारक ठरली होती. उशिरा का होईना नगरसेवक उगले यांनी याकडे लक्ष वेधत प्रभाग अधिकारी वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव स्थायीच्या सभेत मांडला होता. यावरच्या चर्चेत वानखेडे यांच्या कारभाराविषयी उगले यांच्यासह सभापती संदीप गायकर यांनी नाराजी व्यक्ती केली. वानखेडे यांना पदावरून हटवण्यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच स्थायीत ठराव झाला होता. परंतु, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. रस्तारुंदीकरणातील वाढीव बांधकामे आणि मोहम्मद युसूफ चाळीवरील कारवाई या दोन्ही प्रकरणी पुढील स्थायीच्या सभेत अहवाल ठेवू, असे उपायुक्त लहाने यांनी स्पष्ट केले.>आरटीआय कार्यकर्त्याचा हस्तक्षेपकल्याण पश्चिमेतील मोहम्मद युसूफ चाळ ही धोकादायक वास्तू तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेऊनही एका आरटीआय कार्यकर्त्याच्या हस्तक्षेपामुळे ती तोडलेली नाही, असा मुद्दा सदस्य कासीफ तानकी यांनी उपस्थित केला.ही चाळ ६० ते ७० वर्षे जुनी आहे. ती धोकादायक असल्याने स्ट्रक्चरल आॅडिटनंतर ती पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी वानखेडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. ही चाळ तोडण्याची ७० हजार फीही मनपाच्या फंडात जमा केल्याकडे तानकी यांनी लक्ष वेधले. या चाळीत एक कुटुंब राहत आहे. त्यामुळे जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही, असे तानकी यांनी सांगितले.एका आरटीआय कार्यकर्त्याने हस्तक्षेप केल्याने महापालिकेने कारवाई केली नसल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. यावर आरटीआय कार्यकर्ते महापालिका चालवतात का, असा सवाल सभापती गायकर यांनी प्रशासनाला केला.