शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

पालिकेकडून मनी व मुनीच्या चौकशीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर; सेनेच्या तक्रारीची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 15:12 IST

आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

राजू काळेभार्इंदर, दि. २४ - आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी राज्य निवडणूक आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला पाठविलेल्या पत्रात त्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पालिकेने नुकताच चौकशी अहवाल आयोगाला सादर केल्याचे पालिका उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले.निवडणुकीपूर्वी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळत नसल्याने त्याची दोरी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली. निवडणुकीत प्रचार सभांद्वारे भाजपालाच मतांचा जोगवा देण्याच्या आनाभाका घालण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपाच्याच हाती सत्ता यावी, यासाठी केंद्र तसेच राज्यातील भाजपा मंत्र्यांसह खासदार, आमदारांना मतदारांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान विविध खासगी संस्थांच्या मार्फत केलेल्या सर्वेक्षणात भाजपा ३५ ते ४० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली.काहींनी पहिल्या क्रमांकावर शिवसेना तर काहींनी शिवसेना, भाजपा व काँग्रेसची त्रिशंकू सत्ता येणार असल्याचे भाकीत केले. या सर्वेक्षणामुळे बिथरलेल्या काही भाजपा उमेदवारांनी आपापल्या प्रभागांतील मतदारांना पैसे वाटल्याचे समोर येऊ लागले. यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शहराला ख-या अर्थाने निवडणूक दंगलीचे स्वरुप येऊ लागले. याप्रकरणी पोलिसांत शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षांनी त्या पैसे वाटपाविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात तथ्य आढळले नसल्याची क्लिन चीट पोलिसांकडुन देण्यात आल्याने विरोधकांची हवा गुल झाली. तरीदेखील ही निवडणूक हाती राखण्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी चालविलेल्या भाजपाने अखेर धर्माचे शस्त्र बाहेर काढले. शहरात गुजराती, मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने धर्मगुरुंच्या माध्यमातुन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यांना भाजपाच्याच पारड्यात मते टाकण्याच्या आवाहनाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. आणि अखेर भाजपाने सत्तेसाठीचे बहुमत मिळविलेच. एकूण ९५ पैकी ६१ जागांवर विजय संपादन करून भाजपाचे एकहाती सत्तेचे स्वप्न सत्यात उतरले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मिळविलेल्या अहवालात भाजपा ६० ते ६५ जागा मिळविणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने मतदानाच्या आदल्या दिवशीच भाजपा सत्ता काबीज करणार असल्याचे संकेत मिळाले होते. परंतु भाजपाने बहुमत मिळविण्यासाठी मनी आणि मुनीचाच वापर करुन सत्ता मिळविण्यासाठी धर्माचाच आधार घेतल्याचा आरोप करीत त्याच्या चौकशीची मागणी देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

टॅग्स :Anil Desaiअनिल देसाई