शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून मनी व मुनीच्या चौकशीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर; सेनेच्या तक्रारीची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 15:12 IST

आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

राजू काळेभार्इंदर, दि. २४ - आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी राज्य निवडणूक आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला पाठविलेल्या पत्रात त्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पालिकेने नुकताच चौकशी अहवाल आयोगाला सादर केल्याचे पालिका उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले.निवडणुकीपूर्वी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळत नसल्याने त्याची दोरी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली. निवडणुकीत प्रचार सभांद्वारे भाजपालाच मतांचा जोगवा देण्याच्या आनाभाका घालण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपाच्याच हाती सत्ता यावी, यासाठी केंद्र तसेच राज्यातील भाजपा मंत्र्यांसह खासदार, आमदारांना मतदारांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान विविध खासगी संस्थांच्या मार्फत केलेल्या सर्वेक्षणात भाजपा ३५ ते ४० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली.काहींनी पहिल्या क्रमांकावर शिवसेना तर काहींनी शिवसेना, भाजपा व काँग्रेसची त्रिशंकू सत्ता येणार असल्याचे भाकीत केले. या सर्वेक्षणामुळे बिथरलेल्या काही भाजपा उमेदवारांनी आपापल्या प्रभागांतील मतदारांना पैसे वाटल्याचे समोर येऊ लागले. यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शहराला ख-या अर्थाने निवडणूक दंगलीचे स्वरुप येऊ लागले. याप्रकरणी पोलिसांत शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षांनी त्या पैसे वाटपाविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात तथ्य आढळले नसल्याची क्लिन चीट पोलिसांकडुन देण्यात आल्याने विरोधकांची हवा गुल झाली. तरीदेखील ही निवडणूक हाती राखण्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी चालविलेल्या भाजपाने अखेर धर्माचे शस्त्र बाहेर काढले. शहरात गुजराती, मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने धर्मगुरुंच्या माध्यमातुन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यांना भाजपाच्याच पारड्यात मते टाकण्याच्या आवाहनाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. आणि अखेर भाजपाने सत्तेसाठीचे बहुमत मिळविलेच. एकूण ९५ पैकी ६१ जागांवर विजय संपादन करून भाजपाचे एकहाती सत्तेचे स्वप्न सत्यात उतरले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मिळविलेल्या अहवालात भाजपा ६० ते ६५ जागा मिळविणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने मतदानाच्या आदल्या दिवशीच भाजपा सत्ता काबीज करणार असल्याचे संकेत मिळाले होते. परंतु भाजपाने बहुमत मिळविण्यासाठी मनी आणि मुनीचाच वापर करुन सत्ता मिळविण्यासाठी धर्माचाच आधार घेतल्याचा आरोप करीत त्याच्या चौकशीची मागणी देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

टॅग्स :Anil Desaiअनिल देसाई