शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

पुन्हा ‘थर’थराट!, गोविंदांना १४ वर्षे वयाची अट : उंचीचा निर्णय विधिमंडळात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 05:18 IST

१४ वर्षांहून लहान वयाच्या बालगोविंदांना दहीहंडी फोडण्यास बंदी घातल्याची हमी राज्य सरकारने दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरांवरील २० फुटांच्या उंचीचे बंधनही मागे घेतल्याने उंच थरांचा थरार यंदाच्या कालाष्टमीला पुन्हा अनुभवता येणार आहे.

मुंबई : १४ वर्षांहून लहान वयाच्या बालगोविंदांना दहीहंडी फोडण्यास बंदी घातल्याची हमी राज्य सरकारने दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरांवरील २० फुटांच्या उंचीचे बंधनही मागे घेतल्याने उंच थरांचा थरार यंदाच्या कालाष्टमीला पुन्हा अनुभवता येणार आहे.दहीहंडीच्या थरांची उंची किती असावी, हा विधिमंडळाच्या अखत्यारितील विषय असल्याने, त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजनांचे काटेकोर करण्याची ताकीद न्यायालयाने सरकार व आयोजकांना दिली.चेंबूरच्या स्वाती पाटील व अन्य काही स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या जनहित याचिकांच्या निमित्ताने दहीहंडीतील सुरक्षेचा विषय न्यायालयापुढे आहे. उंच थरांवरून खाली पडून विशेषत: सर्वात वरच्या थरावर चढणारी लहान मुले जकणी होतात व प्रसंगी त्यांच्या जिवावरही बेतते, याची दखल घेत २०१४ मध्ये न्यायालयाने बालगोविंदांच्या वयावर व दहीहंडीच्या थरांवर निर्बंध घातले होते.सर्वोच्च न्यायालयानेही ते कायम केले होते. मात्र, हे निर्बंध शिथिल करावे, यासाठी सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर १ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला निर्बंधावर विचार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सोमवारी या याचिकांवर न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.सेल्फी काढणेही जिवावर बेततेयाचिकाकर्त्याने निदर्शनास आणलेल्या अपघाताच्या मुद्द्यावर बोलताना न्यायाधीश म्हणाले की, अपघात सगळीकडेच होतात. सेल्फी घेताना लोक पडतात आणि मरण पावतात. जिम्नॅस्टिकमध्ये किंवा क्रिकेट खेळतानाही अपघात होतात. शौचलयामध्येही अपघात होतात. आम्ही इथे बसून, असे सर्व अपघात कसे रोखू शखणार केला.काय झाले न्यायालयातराज्य सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गोविंदांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेण्याचे आश्वासन दिले. दहीहंडीचा समावेश ‘साहसी क्रीडा’ प्रकारात केल्याने, बाल कामगार प्रतिबंध कायद्याप्रमाणे १४ वर्षांखालील मुलांना यात सहभागी होऊ देणार नाही, अशी हमी दिली. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हेही सुनावणीस उपस्थित होते.थरांच्या उंचीवरील निर्बंध कायम ठेवावेत, असा आग्रह धरून याचिकाकर्त्यांनी या बंधनांमुळे अपघात ७८ टक्के कमी झाल्याचे सांगितले. स्वत:भगवान श्रीकृष्णही दहीहंडी फोडायचे, पण ते थर फार तर दहा फूट उंचीचे असायचे, असा दाखलाही दिला.याला नकार देत न्यायालय म्हणाले, मुळात भगवान श्रीकृष्ण अस्तित्वात होते की नाही, हेच माहीत नाही. शिवाय थर १० फुटांचेच लावा, असे म्हटल्यावर, मग ते २० ते ५० फुटांचे का नको, असा प्रश्न निर्माण होईल.जखमींना १० लाखदहीहंडीमध्ये जखमी होणाºयांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दहीहंडी समन्वय समितीने न्यायालयाला दिले.राज्य सरकारने उंची वाढविण्याचा निर्णय घेतल्यास, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, तसेच राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिलेले आश्वासन पाळले नाही, तर अवमान याचिका दाखल करू.- स्वाती पाटील, याचिकाकर्त्यागोविंदांच्या वयाबाबत किंवा दहीहंडीच्या थरांबाबत एका वटहुकमाद्वारे किंवा खासगी विधेयकाद्वारे निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, न्यायालयाने गोविंदांच्या सुरक्षेसंदर्भात दिलेल्या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करू.- आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजपा