शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची समस्या होणार दूर

By admin | Updated: July 21, 2016 03:01 IST

उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये जमा झालेला कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी घंटागाडीच्या माध्यमातून उल्हास नदीच्या पात्रात टाकत असल्याचे उघड झाले

नेरळ : कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये जमा झालेला कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी घंटागाडीच्या माध्यमातून उल्हास नदीच्या पात्रात टाकत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी पाणी दूषित होत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत ग्रामपंचायतीने तातडीने डम्पिंग ग्राऊंड तयार केले आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या आता दूर होणार आहे.उमरोली ग्रामपंचायत हद्दीत डिकसळ, उमरोली, वावे, कोषाणे, पाली, पोतदार वसाहत ही गावे येतात. या सर्व गावांमधील कचरा जमा करु न तो डम्पिंग ग्राऊंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी हा कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी थेट घंटागाडीच्या माध्यमातून उल्हास नदीत टाकत होते. ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राऊंड आहे त्या ठिकाणी घंटागाडी जात नसल्याने कर्मचारी वावे येथील ओहळात कचरा टाकत होते. त्यामुळे पाणी दूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक गावांना हे दूषित पाणी जाणार असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले होते, त्यामुळे या दूषित पाण्याने रोगराई पसरण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. हा सर्व प्रकार संतापजनक असल्याने ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने गावातील जमा झालेला कचरा गावाबाहेरील एखाद्या खड्ड्यात अथवा गुरचरण जागेत टाकावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. याची दखल घेत सरपंच मोनिका सालोखे आणि सदस्यांनी तातडीने निर्णय घेऊन घंटागाडी जाऊ शकेल अशा ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राऊंड उभारण्याचे काम सुरू केले आहे. तसेच ग्रामपंचायतीत फॉगिंग मशीन असून सुद्धा फवारणी करण्यात येत नव्हती. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र आता फवारणीही करण्यात येणार आहे.