शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

‘मी कसा घडलो’च्या व्याख्यानाची आठवण बारामतीत आजही ताजी

By admin | Updated: February 17, 2015 01:23 IST

गरिबी क्लेशकारक असते, याचा अनुभव घेतला आहे. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचेच कपडे घालून शिक्षण पूर्ण केले. ‘कमवा व शिका’ योजनेत मातीच्या पाट्या वाहिल्या.

बारामती : गरिबी क्लेशकारक असते, याचा अनुभव घेतला आहे. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचेच कपडे घालून शिक्षण पूर्ण केले. ‘कमवा व शिका’ योजनेत मातीच्या पाट्या वाहिल्या. त्यातून मिळालेल्या पैशातून बहिणीचे, स्वत:चे शिक्षण पूर्ण केले... सत्य तेच बोलायचे... हे ध्येय ठेवून काम केल्यामुळेच एक सामान्य मुलगा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकला, असा जीवनपट आर. आर. पाटील यांनी बारामतीच्या शारदा व्याख्यानमालेत उलघडला होता. तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले होते. येथील नवनिर्माण संघटनेचे संयोजक अनिल गलांडे यांनी २००७ साली आर. आर. आबा यांना ‘मी कसा घडलो’ या विषयावर बोलते केले होते. शारदा व्याख्यानमालेच्या अंतर्गत पाटील यांनी त्यांचा जीवनपटच उलघडला होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे कपडे वापरत नाहीत, अशी परंपरागत रीत आहे. मात्र, त्यांची कपडे कमी करून वापरल्याचे सांगताना त्यावेळी बारामतीतच उपविभागीय पोलीस अधिकारी असलेल्या संजय शिंत्रे या अधिकाऱ्याच्या वडिलाने धीर दिला होता, असे पाटील यांनी सांगितले. शिक्षणासाठी माती वाहिली. वक्तृत्व स्पर्धेतून बक्षिसे मिळविली. या स्पर्धांमधूनच तयार झालो. ज्या दिवशी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो होतो. त्याच दिवशी शाळेच्या पडवीत झोपलो. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर पायात चप्पल आली. कोणत्याही ठेकेदाराचा मिंधा झालो नाही. सत्य या न्यायाने लोकांची कामे करून राज्याचा उपमुख्यमंत्री झालो. पाटील आपला जीवनपट एका पाठोपाठ उलघडत होते. बारामतीच्या शारदा प्रांगणात व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्यांमध्ये ‘पिनड्राप सायलेन्स’ होता. त्यांच्या जीवनातील अनुभव ऐकून उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले होते. जवळपास पावणे दोन तास आबांनी त्यांच्या जीवनातील पैलू उलघडून दाखविले. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार झाल्याचा घटनाक्रम सांगितला. त्यांच्या पाठिंंब्यामुळेच डान्सबार बंदी, पोलिसांचे वेतनवाढ, भरतीतील गैरप्रकार थांबविला. तर ग्रामविकास मंत्री म्हणून गाडगेबाबा स्वच्छता अभियान, यशवंत ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून गावांचा विकास केल्याचे सांगितले होते.गटसचिवांचे अधिवेशन अखेरचा कार्यक्रम४गेल्या आॅगस्टमध्ये पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात गटसचिवांच्या अधिवेशनात आर. आर. पाटील उपस्थित होते. हा त्यांचा पुण्यातील शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला. अधिवेशनात सर्वात आधी उपस्थित झालेल्या आर. आर. पाटील यांनी मी गृहमंत्री म्हणून या कार्यक्रमाला आलो नाही, गटसचिवाचा मुलगा म्हणून आलो आहे. माझे वडील गटसचिव म्हणून काम करीत असत. या गटसचिवांच्या घरात काय यातना असतात हे मला माहिती आहे, असे म्हणत मने जिंंकली. ४ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते तब्बल तीन तास उशिराने कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यांच्या आधी उपस्थित झालेल्या आर. आर. पाटील यांच्यामुळे चैतन्य निर्माण झाले. पांढऱ्या रंगाची सफारी त्यांनी परिधान केली होती. ४प्रसन्न मूडमध्ये त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले होते. प्रश्न सोडविण्यासाठी जसे हक्काने आमच्याकडे येता, तसे निवडणुकीच्या काळात आम्हालाही तुमच्याकडे हक्काने येऊ द्या, अशा शब्दांत पक्षाला मते देण्याचे आवाहन करायला आर. आर. पाटील विसरले नव्हते. हर्षवर्धन पाटील यांना आजही हा प्रसंग जसाच्या तसा आठवतो.