शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

लक्षात ठेवा, गाठ शिवसेनेशी आहे

By admin | Updated: July 11, 2017 03:56 IST

बेकायदा बांधकामप्रकरणी २००२ मध्ये २० हजाराची लाच घेताना पकडलेले महाशय जेलमध्ये होते.

लोकमत न्यूज नेटवर्क भाईंदर : बेकायदा बांधकामप्रकरणी २००२ मध्ये २० हजाराची लाच घेताना पकडलेले महाशय जेलमध्ये होते. निवडणुका जिंकण्यासाठी घाणेरडे प्रकार खपवून घेणार नाही. शिवसेनेत आलेल्या नगरसेविका सुमन कोठारी यांना धमकी दिल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले. जीवाशी खेळण्याचे काम कराल तर गाठ सेनेशी आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिला. यावेळी त्यांनी आमदार नरेंद्र मेहता यांचे नाव न घेता सडकून टीका केली. शहरातील व्यापरी त्रस्त झाले आहेत. विकासकांकडून ३०० रुपये चौरस फुटाने पैसे घेतले जात आहेत. व्यापाऱ्यांनी एक पैसाही देऊ नये. कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असे शिंदे म्हणाले. शिवसेनेचा गटनेता व विजयी संकल्प मेळावा भार्इंदर येथे झाला. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विलास जोशी यांनी निवडणुकी संदर्भात मागदर्शन केले. ठाण्याला मंजूर क्लस्टर योजना मीरा भार्इंदरलाही लागू करुन धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवणार असे शिंदे यांनी सांगितले. मीरा- भार्इंदरचा पाण्याचा प्रश सुटावा, मेट्रो यावी यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला, आंदोलने केली. ठाण्याचा विकास जसा केला तसाच मीरा- भार्इंदरमध्ये विकासाचा ठाणे पॅटर्न राबवू असे पालकमंत्री म्हणाले.कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची भिकाऱ्यासारखी अवस्था करुन टाकली अशी भाजपावर झोड उठवत उध्दव ठाकरे यांच्या आक्रमकतेमुळे कर्जमाफी झाल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. भाजपा आमच्या झाडावर वाढलेली वेल असून केवळ अफवा पसरवण्याचे काम असल्याने नागरिकांनी आता सावध व्हावे. आम्ही केलेली कामे भाजपवाले नेहमीच त्यांनी केली असे सांगतात. आम्ही पाठिंबा काढला तर त्यांची हंडी कोसळेल असे गुलाबराव यांनी सांगितले. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, खासदार राजन विचारे, प्रा. नितीन बानुगडे- पाटील, आमदार प्रताप सरनाईक, हाजी अराफत शेख आदींची भाषणे झाली. आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, शरद पोंक्षे, प्रभाकर म्हात्रे, उपमहापौर प्रवीण पाटील, माजी महापौर कॅटलीन परेरा व निर्मला सावळे आदी उपस्थित होते.>‘मराठी मतदारांचे अर्ज मेहतांनी फाडले’मतदारयादीत मराठी व मुस्लीम मतदारांनी नावे नोंदवू नका, त्यांची मते मिळणार नाहीत सांगत त्यांचे अर्ज आमदार नरेंद्र मेहतांनी फाडून फेकून दिल्याचा गौप्यस्फोट भाजपात अनेक पदांवर काम केलेले व शिवसेनेत आलेले शैलेश पांडे यांनी केला. अशा मराठी व मुस्लीमद्वेष्ट्यांना निवडणुकीत भार्इंदरच्या खाडीत ढकला असे पांडे म्हणाले.