शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित तहसीलदारांना दिलासा

By admin | Updated: June 2, 2015 01:59 IST

रेशनच्या धान्याचा काळाबाजार केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील सात तहसीलदारांच्या जागेवर पुढील आदेश होईपर्यंत इतर कोणाची

मुंबई : रेशनच्या धान्याचा काळाबाजार केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील सात तहसीलदारांच्या जागेवर पुढील आदेश होईपर्यंत इतर कोणाची नेमणूक करू नका, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सोमवारी राज्य शासनाला दिले. या प्रकरणी अंतिम सुनावणी १० जूनला होणार आहे.या ७ तहसीलदारांनी निलंबनाच्या विरोधात केलेल्या स्वतंत्र याचिकांवर एकत्रित प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर ‘मॅट’चे सदस्य आर.बी. मल्लिक यांनी हे आदेश दिले. अंतिम सुनावणीत प्रत्येक तहसीलदाराचे म्हणणे स्वतंत्रपणे ऐकले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.गणेश राठोड (नाशिक), मनोज खैरनार (सिन्नर), कैलास कडगल (पेठ), महेंद्र पवार (इगतपुरी), संदीप आहेर (निफाड), नरेशकुमार बहिरम (त्र्यंबकेश्वर) आणि मंदार कुलकर्णी (दिंडोरी) अशी या तहसीलदारांची नावे आहेत. सरकारी वकील एन.के. राजपुरोहित यांनी या याचिकांवर आक्षेप घेत मॅटच्या कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित केला. अर्जदारांनी मॅटपुढे येण्याआधी त्यांच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेल्या अपील प्राधिकरणाकडे अर्ज करायला हवा होता. अशा प्रकारे थेट मॅटपुढे याची सुनावणी होऊ शकत नाही व तसा अधिकारही मॅटला नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. पुरोहित यांनी केला.मात्र प्रशासकीय स्तरावर घडणारे प्रत्येक प्रकरण वेगळे असते. संबंधित प्रकरणाच्या आधारावर त्याची सुनावणी कोठे होऊ शकते हे ठरते. तसेच सरकारी कर्मचारी व अधिकारी थेट मॅटपुढे अर्ज करू शकतात व अशा अर्जांवर सुनावणी घेण्याचा मॅटला अधिकार असल्याचे सर्वोच्च व उच्च न्यायालयाने आपल्या निकालांमध्ये स्पष्ट केले असल्याचे अर्जदार तहसीलदारांचे वकील अ‍ॅड. खैरे यांनी मॅटच्या निदर्शनास आणले.महत्त्वाचे म्हणजे या तहसीलदारांनी नेमके कोणाकडे अपील करता येईल याचा उल्लेख सरकारी नियमांमध्ये नाही. त्यामुळे या तहसीलदारांनी थेट मॅटसमोर अर्ज केला असल्याचे अ‍ॅड. खैरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मॅटने निलंबित तहसीलदारांच्या जागी अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे का, असा सवाल केला. त्याचे नाही, असे उत्तर अ‍ॅड. पुरोहित यांनी दिले. त्यावर अ‍ॅड. खैरे यांनी निलंबनाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यास नकार देत मॅटने वरील आदेश दिले. मुळात आम्ही कधीही सुरगाणा येथे काम केलेले नाही. आमच्या कार्यक्षेत्रातील अन्नपुरवठा गोदामांमध्ये कोणताही काळाबाजार झाला नसल्याचे स्वत: नाशिक जिल्हाधिकारी यांनी शासनाला लेखी कळवले आहे. असे असतानाही केवळ विधान परिषदेत अन्नपुरवठा मंत्र्यांनी निलंबनाची कारवाई जाहीर केल्यामुळे आम्हाला निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई करण्याआधी आम्हाला बाजू मांडण्याची संधी शासनाने दिलेली नाही, असा दावाही या ७ तहसीलदारांनी आपल्या याचिकांमध्ये केला आहे. (प्रतिनिधी)