शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

अपहरणकर्त्यांपासून केली सुटका

By admin | Updated: June 29, 2016 04:23 IST

अपहरणकर्त्यांपासून सुटका करत चेन्नईत राहणाऱ्या आणि दहावीत शिकणाऱ्या तीन मुलींनी थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी घडली.

मुंबई : अपहरणकर्त्यांपासून सुटका करत चेन्नईत राहणाऱ्या आणि दहावीत शिकणाऱ्या तीन मुलींनी थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर मुंबई मध्य रेल्वे सुरक्षा दलाने चेन्नई पोलीस आणि मुलींच्या नातेवाइकाशी संपर्क साधून सगळी घटना समोर आणली. या प्रकरणाची अधिक चौकशी मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) करतानाच चेन्नई पोलीसही अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले. मुलींचे नातेवाईक मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चेन्नईत राहणाऱ्या १५ वर्षे वयाच्या तीन मुली दहावीत शिकतात. सोमवारी या तिघी शाळेत जाण्यासाठी मनीपुट्टोर या बसस्टॉपवर बसची वाट पाहत होत्या. तेव्हा एका व्हॅनमधील इसमाने मुलींना पत्ता विचारला. पत्ता सांगत असतानाच त्यांना गाडीत खेचण्यात आले व व्हॅन सुरू केली. व्हॅन सुरू झाल्यानंतर अन्य एका इसमाशी त्या तिघींची झटापट झाली. ही झटापट होत असतानाच चेन्नईतील टी-नगर जंक्शनजवळ संधी साधत त्या तिघीही गाडीतून उतरल्या; त्यांनी समोरच असलेले सेंट्रल चेन्नई स्थानक गाठले आणि जीव वाचविण्यासाठी एक्स्प्रेसमध्ये चढल्या. मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ट्रेन सीएसटी स्टेशनवर आली असता त्यांना घाबरलेल्या अवस्थेत बघून एका महिला प्रवाशाने त्यांचाकडे विचारणा केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. सदर महिलेने तत्काळ सीएसटी स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) याची माहिती दिली आणि या तिघींनाही रेल सुरक्षा दलाने आपल्या ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)चेन्नईतील मुली असल्याने त्यांना संवाद साधता येत नव्हता. हिंदी भाषा येत नसल्याने रेल्वे पोलिसांनाही त्यांच्याशी संवाद साधता येत नव्हता. ज्या महिलेने तिघींना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले ती महिला निघून गेल्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रश्न रेल्वे पोलिसांसमोर उभा राहिला. यानंतर सीएसटी स्थानकातच कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि तामिळ अवगत असणाऱ्या दोन महिलांना रेल्वे पोलिसांनी बोलावले व त्यांच्यामार्फत संवाद साधला. त्या वेळी बरीच माहिती समोर आली. यानंतर मध्य रेल्वे पोलिसांनी तत्काळ त्यांच्या पालकांशी आणि पोलिसांशी संपर्क साधला.मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) चौकशी करतानाच चेन्नई पोलीसही अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. मुलींचे नातेवाईक मुंबईत दाखल झाल्यानंतर मुलींना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या तीन मुली १५ वर्षांच्या आहेत. चेन्नईत त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. मुली बेपत्ता असल्याची तक्रारही चेन्नईत दाखल झाली आहे. मुलींच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना सर्व कल्पना देण्यात आली. यासंदर्भात चेन्नईतील पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे. - अजय यादव (सीएसटी रेल्वे सुरक्षा दल-वरिष्ठ निरीक्षक)