शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

बारसू प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांना दिलासा; मनाई आदेश मागे घेतला, सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 06:31 IST

प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांविरोधातील याचिका निकाली काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लावणे तर्कसंगत नाही

मुंबई - बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आठ शेतकऱ्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रवेशास तसेच प्रकल्पाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई करणारा, असे दोन्ही आदेश सरकारने मागे घेतले आहेत. यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. सरकारी वकिलांच्या या माहितीनंतर न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढली.

प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांविरोधातील याचिका निकाली काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लावणे तर्कसंगत नाही. असा आदेश काढल्याने लोक उदरनिर्वाह गमावतील. त्यांना रोखले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. 

प्रकरण काय?राज्य सरकारने २२ आणि २५ एप्रिल २०२३ रोजी दोन आदेश काढत अमोल बोले व अन्य सात शेतकऱ्यांना राजापूर तालुक्यात ३१ मेपर्यंत प्रवेश करण्यास मनाई केली. तसेच रिफायनरी प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई करणारा आदेशही काढला. बोले व अन्य सात जणांनी आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

याचिकेत काय?सीआरपीसी १४४ (२) अंतर्गत आदेश देत याचिकादारांना गावाबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने सरकार याचिकादारांना शस्त्रांशिवाय शांततेने एकत्र येण्याचा  तसेच भाषण व अभिव्यक्तिस्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच घटनेने हमी दिलेल्या मुक्तपणे संचार करण्याच्या स्वातंत्र्यावरही घाला घालण्यात येत आहे,  असे याचिकादारांचे वकील मिहीर देसाई, विजय हिरेमठ यांनी न्यायालयाला सांगितले. याचिकादार व काही रहिवासी प्रस्तावित रत्नागिरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रा.लि. विरोधात आहेत. कारण त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे. २०१७ पासून याचिकादार प्रस्तावित रिफायनरीला विरोध करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प