शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बारसू प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांना दिलासा; मनाई आदेश मागे घेतला, सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 06:31 IST

प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांविरोधातील याचिका निकाली काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लावणे तर्कसंगत नाही

मुंबई - बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आठ शेतकऱ्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रवेशास तसेच प्रकल्पाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई करणारा, असे दोन्ही आदेश सरकारने मागे घेतले आहेत. यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. सरकारी वकिलांच्या या माहितीनंतर न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढली.

प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांविरोधातील याचिका निकाली काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लावणे तर्कसंगत नाही. असा आदेश काढल्याने लोक उदरनिर्वाह गमावतील. त्यांना रोखले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. 

प्रकरण काय?राज्य सरकारने २२ आणि २५ एप्रिल २०२३ रोजी दोन आदेश काढत अमोल बोले व अन्य सात शेतकऱ्यांना राजापूर तालुक्यात ३१ मेपर्यंत प्रवेश करण्यास मनाई केली. तसेच रिफायनरी प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई करणारा आदेशही काढला. बोले व अन्य सात जणांनी आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

याचिकेत काय?सीआरपीसी १४४ (२) अंतर्गत आदेश देत याचिकादारांना गावाबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने सरकार याचिकादारांना शस्त्रांशिवाय शांततेने एकत्र येण्याचा  तसेच भाषण व अभिव्यक्तिस्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच घटनेने हमी दिलेल्या मुक्तपणे संचार करण्याच्या स्वातंत्र्यावरही घाला घालण्यात येत आहे,  असे याचिकादारांचे वकील मिहीर देसाई, विजय हिरेमठ यांनी न्यायालयाला सांगितले. याचिकादार व काही रहिवासी प्रस्तावित रत्नागिरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रा.लि. विरोधात आहेत. कारण त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे. २०१७ पासून याचिकादार प्रस्तावित रिफायनरीला विरोध करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प