शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसी खातेदारांना दिलासा; पैसे काढण्याची मर्यादा वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 21:52 IST

५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देखातेदारांची पैसे काढताना निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.आतापर्यंत पीएमसी बँकेच्या ८ खातेदारांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांसाठी रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे. पीएमसी खातेदारांना आता आपल्या खात्यातून ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. खातेदारांची पैसे काढताना निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. त्याचबरोबर खातेदारांना पीएमसी बँकेच्याच एटीएममधूनही ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.बँकेचे खातेदार ६ महिन्यात ५० हजार रुपये काढू शकणार आहेत. याअगोदर खातेदारांना ४० हजार रुपये काढता येत होते. पीएमसी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे आरबीआयने बँकेवर अनेक निर्बंध घातले होते. यामध्ये खातेदारांना पैसे काढण्यावरही निर्बंध होते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे तणाव आलेल्या संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) या दोन खातेदारांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. तर एका खातेदाराने आत्महत्या केली होती. ओशिवरा येथे राहणाऱ्या गुलाटी यांच्या खात्यात जवळपास ९० लाख तर मुलुंडमधील फत्तेमुल पंजाबी यांच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम जमा होती. आतापर्यंत पीएमसी बँकेच्या ८ खातेदारांचा मृत्यू झाला आहे. मागील गुरूवारीच अ‍ॅड्य्रू लोबो या एका खातेदाराचा मृत्यू झाला. 

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकMumbaiमुंबईbankबँक