शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

दिलासा : दाखल्यांसाठी आता १० जुलैची मुदत, सर्व्हरची क्षमता वाढविण्याचा निर्णय

By दीपक भातुसे | Updated: July 1, 2023 09:05 IST

Mumbai: राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे.

- दीपक भातुसे मुंबई : राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत सर्व्हरची क्षमता वाढवून ही अडचणही दूर केली जाणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

केवळ विद्यार्थीच नव्हे, तर विविध कामांसाठी राज्यातील जनतेला विविध दाखल्यांची गरज लागते. मात्र, सध्या तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन, तसेच सेतू केंद्रावर दाखले मिळण्यास प्रचंड विलंब लागत आहे. यात निवासाचा दाखला, जातप्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांचा समावेश आहे. दाखले मिळत नसल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी हुकते की काय, अशी विशेषतः आरक्षित जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होती. 'लोकमत'ने ही अडचण समोर आणली होती. त्याची दखल सरकारने घेतली आहे.

अर्जांची संख्या वाढली- सर्व्हर गती मंदावल्याने दाखले विलंबाने मिळत आहेत. पूर्वी ३० सेकंद ते १ मिनिटाला एक दाखला काढणे शक्य होते.- मात्र, अर्जांची संख्या प्रचंड वाढल्याने सर्व्हरवर ताण येतो आहे. त्यामुळे एक दाखला काढायला ५ ते ६ मिनिटे लागत आहेत.- एका सेतू केंद्रावर साधारणतः १५ ते २० हजार अर्ज येतात. मात्र, सध्या काही सेतू केंद्रांवर हा आकडा ५० ते ६० हजारांच्या घरात गेला आहे.-मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून सर्व्हरची गती मंदावल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याची आम्ही सर्व्हरची संख्या वाढवत आहोत. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर अर्जाचा निपटारा जलद गतीने होऊ शकेल. -पराग जैन, प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र