शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा : दाखल्यांसाठी आता १० जुलैची मुदत, सर्व्हरची क्षमता वाढविण्याचा निर्णय

By दीपक भातुसे | Updated: July 1, 2023 09:05 IST

Mumbai: राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे.

- दीपक भातुसे मुंबई : राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत सर्व्हरची क्षमता वाढवून ही अडचणही दूर केली जाणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

केवळ विद्यार्थीच नव्हे, तर विविध कामांसाठी राज्यातील जनतेला विविध दाखल्यांची गरज लागते. मात्र, सध्या तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन, तसेच सेतू केंद्रावर दाखले मिळण्यास प्रचंड विलंब लागत आहे. यात निवासाचा दाखला, जातप्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांचा समावेश आहे. दाखले मिळत नसल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी हुकते की काय, अशी विशेषतः आरक्षित जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होती. 'लोकमत'ने ही अडचण समोर आणली होती. त्याची दखल सरकारने घेतली आहे.

अर्जांची संख्या वाढली- सर्व्हर गती मंदावल्याने दाखले विलंबाने मिळत आहेत. पूर्वी ३० सेकंद ते १ मिनिटाला एक दाखला काढणे शक्य होते.- मात्र, अर्जांची संख्या प्रचंड वाढल्याने सर्व्हरवर ताण येतो आहे. त्यामुळे एक दाखला काढायला ५ ते ६ मिनिटे लागत आहेत.- एका सेतू केंद्रावर साधारणतः १५ ते २० हजार अर्ज येतात. मात्र, सध्या काही सेतू केंद्रांवर हा आकडा ५० ते ६० हजारांच्या घरात गेला आहे.-मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून सर्व्हरची गती मंदावल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याची आम्ही सर्व्हरची संख्या वाढवत आहोत. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर अर्जाचा निपटारा जलद गतीने होऊ शकेल. -पराग जैन, प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र