शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा

By admin | Updated: March 16, 2016 08:37 IST

१ नोव्हेंबर २००५नंतर शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झाल्यानंतर मृत

मुंबई : १ नोव्हेंबर २००५नंतर शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झाल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. नव्या पेन्शन योजनेविरोधात मंगळवारी आझाद मैदानात काढलेल्या मोर्चादरम्यान ते बोलत होते.या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही आंदोलनकर्त्यांना भेट दिली. शिंदे म्हणाले की, १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पेन्शनसाठी मोठ्या प्रमाणात कपात सुरू आहे. नव्या पेन्शन योजनेतील या त्रुटीबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल. शिवाय उद्या बुधवारी अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान, २०हून जास्त आमदारांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या व्यासपीठावर येऊन पाठिंबा दिला.नवी पेन्शन योजनेविरोधात काढलेल्या मोर्चात पाच हजारांहून अधिक आंदोलनकर्ते सामील झाले होते. नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची संघटनेची एकमुखी मागणी आहे. आकस्मिक मृत्यूनंतर किंवा निवृत्तीनंतर पेन्शनचे कोणते लाभ मिळणार याबाबत सरकारने योजनेत कोणतीही स्पष्टता ठेवली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या पेन्शनमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पैसे कापले जात नव्हते. याउलट नव्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कापली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण पडत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे प्रवक्ते प्राजक्त झावरे यांनी दिली. (प्रतिनिधी)टाळाटाळ केल्यास संप अटळ हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे संघटनेने २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढला होता. त्या वेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर संघटनेसोबत एक बैठक घेण्याचे औदार्यही सरकारने दाखवलेले नाही. मंगळवारी निघालेल्या मोर्चानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास संपाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा झावरे यांनी दिला आहे.