शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा

By admin | Updated: March 16, 2016 08:37 IST

१ नोव्हेंबर २००५नंतर शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झाल्यानंतर मृत

मुंबई : १ नोव्हेंबर २००५नंतर शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झाल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. नव्या पेन्शन योजनेविरोधात मंगळवारी आझाद मैदानात काढलेल्या मोर्चादरम्यान ते बोलत होते.या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही आंदोलनकर्त्यांना भेट दिली. शिंदे म्हणाले की, १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पेन्शनसाठी मोठ्या प्रमाणात कपात सुरू आहे. नव्या पेन्शन योजनेतील या त्रुटीबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल. शिवाय उद्या बुधवारी अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान, २०हून जास्त आमदारांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या व्यासपीठावर येऊन पाठिंबा दिला.नवी पेन्शन योजनेविरोधात काढलेल्या मोर्चात पाच हजारांहून अधिक आंदोलनकर्ते सामील झाले होते. नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची संघटनेची एकमुखी मागणी आहे. आकस्मिक मृत्यूनंतर किंवा निवृत्तीनंतर पेन्शनचे कोणते लाभ मिळणार याबाबत सरकारने योजनेत कोणतीही स्पष्टता ठेवली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या पेन्शनमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पैसे कापले जात नव्हते. याउलट नव्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कापली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण पडत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे प्रवक्ते प्राजक्त झावरे यांनी दिली. (प्रतिनिधी)टाळाटाळ केल्यास संप अटळ हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे संघटनेने २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढला होता. त्या वेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर संघटनेसोबत एक बैठक घेण्याचे औदार्यही सरकारने दाखवलेले नाही. मंगळवारी निघालेल्या मोर्चानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास संपाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा झावरे यांनी दिला आहे.