शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा

By admin | Updated: March 16, 2016 08:37 IST

१ नोव्हेंबर २००५नंतर शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झाल्यानंतर मृत

मुंबई : १ नोव्हेंबर २००५नंतर शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झाल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. नव्या पेन्शन योजनेविरोधात मंगळवारी आझाद मैदानात काढलेल्या मोर्चादरम्यान ते बोलत होते.या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही आंदोलनकर्त्यांना भेट दिली. शिंदे म्हणाले की, १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पेन्शनसाठी मोठ्या प्रमाणात कपात सुरू आहे. नव्या पेन्शन योजनेतील या त्रुटीबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल. शिवाय उद्या बुधवारी अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान, २०हून जास्त आमदारांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या व्यासपीठावर येऊन पाठिंबा दिला.नवी पेन्शन योजनेविरोधात काढलेल्या मोर्चात पाच हजारांहून अधिक आंदोलनकर्ते सामील झाले होते. नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची संघटनेची एकमुखी मागणी आहे. आकस्मिक मृत्यूनंतर किंवा निवृत्तीनंतर पेन्शनचे कोणते लाभ मिळणार याबाबत सरकारने योजनेत कोणतीही स्पष्टता ठेवली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या पेन्शनमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पैसे कापले जात नव्हते. याउलट नव्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कापली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण पडत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे प्रवक्ते प्राजक्त झावरे यांनी दिली. (प्रतिनिधी)टाळाटाळ केल्यास संप अटळ हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे संघटनेने २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढला होता. त्या वेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर संघटनेसोबत एक बैठक घेण्याचे औदार्यही सरकारने दाखवलेले नाही. मंगळवारी निघालेल्या मोर्चानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास संपाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा झावरे यांनी दिला आहे.