शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणाची रजा साडेसहा महिने

By admin | Updated: November 26, 2015 02:54 IST

प्रचलित कायद्यात सुधारणा करून नोकरदार महिलांना १२ ऐवजी २६ आठवड्यांची बाळंतपणाची रजा देण्यावर मंगळवारी येथे झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत एकमत झाले.

नवी दिल्ली : प्रचलित कायद्यात सुधारणा करून नोकरदार महिलांना १२ ऐवजी २६ आठवड्यांची बाळंतपणाची रजा देण्यावर मंगळवारी येथे झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत एकमत झाले.१९६१ च्या ‘मॅटर्निटी बेनिफिट अ‍ॅक्ट’मध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेल्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाने ही त्रिपक्षीय बैठक आयोजित केली होती. यात सरकार, केंद्रीय कामगार संघटना आणि मालकांचे प्रतिनिधी हजर होते.या कायद्यानुसार सध्या नोकरदार महिलांना प्रसूतीच्या अपेक्षित तारखेच्या आधी सहा आठवडे व प्रसूतीनंतर सहा आठवडे भरपगारी बाळंतपणाची रजा देण्याची तरतूद आहे. ही रजा वाढवून २६ आठवडे करण्याचे दुरुस्ती विधेयकात प्रस्तावित करण्यात आले आहे. रजेचा कालावधी वाढविण्यावर बैठकीत सर्व पक्षांचे एकमत झाले, असे सूत्रांनी सांगितले.मात्र ही रजा कोणाला द्यावी, यावर कामगार संधटना आणि सरकार यांच्यात एकवाक्यता दिसली नाही. ही बाळंतपणाची रजा केवळ स्वत: अपत्य जन्माला घालणाऱ्या नैसर्गिक मातांनाच न देता मूल दत्तक घेणाऱ्या मातांना आणि दुसऱ्या महिलेची कूस भाड्याने घेऊन तिच्याकरवी मूल जन्माला घालणाऱ्या मातांनाही २० आठवड्यांची बाळंतपणाची रजा मिळावी, असे कामगार संघटनांचे म्हणणे होते. परंतु नैसर्गिक मातेप्रमाणे मूल दत्तक घेणाऱ्या किंवा ‘सरोगेट मदर’ करवी मूल जन्माला घालणाऱ्या सिया नवजात अर्भकास स्तनपान करीत नसल्याने त्यांनाही ही वाढीव रजा देणे योग्य होईल का, यावर सरकारच्या वतीने साशंकता व्यक्त केली गेली, असे सेंटर फॉर ट्रेन युनियन काँग्रेसचे अध्यक्ष ए. के. पद्मनाभन यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)नोकरदार महिलांच्या सोयीसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरांची सोय करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. नवजात अर्भकांच्या निकोप वाढीसाठी आणि मूल व आई यांच्यातील भावनिक बंध दृढ करण्यासाठी कामाच्या ठिकाणी अशी पाळणाघरे असण्याच्या गरजेवर सर्वांचेच एकमत झाले, असे भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रिय संघटन सचिव बलदेव सिंग यांनी सांगितले.किमान ३० महिला अथवा एकूण ५० किंवा त्याहून जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयास पाळणाघराची सोय करणे सक्तीचे करावे, यावरही बैठकीत सर्वसाधारण एकमत झाले. तसेच ज्या आया कामावर येताना आपल्या अपत्यास बरोबर आणतील व त्यांना पाळणाघरात ठेवतील त्यांना त्या अपत्याची काळजी घेण्यासाठी जेवणाच्या सुट्टीआधी व नंतर प्रत्येकी १५ मिनिटांची जादा रजा द्यावी, असेही ठरले.