शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

रखडलेले निकाल जाहीर करा : युवासेनेचे आंदोलन

By admin | Updated: July 27, 2016 02:39 IST

विद्यापीठातर्फे एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या १६५ परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या

मुंबई : विद्यापीठातर्फे एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या १६५ परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुलगुरूंना विद्यार्थी संघटनांशी चर्चा करण्याकरिता वेळच मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या कारभाराविरोधात मंगळवारी युवासेनेने आंदोलन करत रोष व्यक्त केला.मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी विविध विषयांच्या ४२६ परीक्षा घेतल्या जातात. आतापर्यंत २६१ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. यामधील ६५ परीक्षांचे निकाल ३० दिवसांत, ७९ निकाल ४५ दिवसांत, ११७ निकाल ४५ दिवस उलटून गेल्यानंतर जाहीर करण्यात आले आहेत. असे असले, तरी अजूनही १६५ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याविरोधात युवासेनेने आवाज उठवत मोर्चा काढला होता.विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर होणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यापीठाने घेतलेल्या शेकडो परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. विशेष म्हणजे, जाहीर झालेल्या निकालांच्या गुणपत्रिका मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणासाठीचे प्रवेश रखडले आहेत. (प्रतिनिधी)विद्यार्थी संघटनांशी चर्चायुवासेनेने केलेल्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने २ आॅगस्ट रोजी युवासेनेसह विद्यार्थी संघटनांसोबत विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच दर दोन महिन्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांसोबत खास बैठक घेण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.