शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

रखडलेले निकाल जाहीर करा : युवासेनेचे आंदोलन

By admin | Updated: July 27, 2016 02:39 IST

विद्यापीठातर्फे एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या १६५ परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या

मुंबई : विद्यापीठातर्फे एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या १६५ परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुलगुरूंना विद्यार्थी संघटनांशी चर्चा करण्याकरिता वेळच मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या कारभाराविरोधात मंगळवारी युवासेनेने आंदोलन करत रोष व्यक्त केला.मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी विविध विषयांच्या ४२६ परीक्षा घेतल्या जातात. आतापर्यंत २६१ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. यामधील ६५ परीक्षांचे निकाल ३० दिवसांत, ७९ निकाल ४५ दिवसांत, ११७ निकाल ४५ दिवस उलटून गेल्यानंतर जाहीर करण्यात आले आहेत. असे असले, तरी अजूनही १६५ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याविरोधात युवासेनेने आवाज उठवत मोर्चा काढला होता.विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर होणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यापीठाने घेतलेल्या शेकडो परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. विशेष म्हणजे, जाहीर झालेल्या निकालांच्या गुणपत्रिका मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणासाठीचे प्रवेश रखडले आहेत. (प्रतिनिधी)विद्यार्थी संघटनांशी चर्चायुवासेनेने केलेल्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने २ आॅगस्ट रोजी युवासेनेसह विद्यार्थी संघटनांसोबत विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच दर दोन महिन्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांसोबत खास बैठक घेण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.