शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

पेप्सीगोळा फुकट न दिल्याने खून करणाऱ्याची जन्मठेप रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:58 IST

६ जून २०१२ रोजीच्या घटनेतून दाखल खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने बालाजीला खुनाच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून जन्मठेप दिली होती.

मुंबई : लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील चेरा गावात रस्त्यावर फिरून पेप्सीगोळा विकणा-या तुकाराम या विक्रेत्याचे पेप्सीगोळा फुकट दिला नाही म्हणून त्याच गावातील बालाजी किसन नगरवाड या इसमान तुकारामची केलेली हत्या हे वेडाच्या भरात केलेले कृत्य होते, असा निष्कर्ष काढून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बालाजीची निर्दोष मुक्तता केली.६ जून २०१२ रोजीच्या घटनेतून दाखल खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने बालाजीला खुनाच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून जन्मठेप दिली होती. त्याविरुद्ध बालाजीने केलेले अपील मंजूर करून न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने उपरोक्त निकाल दिला.तुकारामची हत्या बालाजीनेच केली हे पुराव्यानिशी सिद्ध झाले असले तरी ती हत्या त्याने वेडाच्या भरात केली असावी, अशी दाट शक्यता दिसत असल्याने भादंवि कलम ८४ नुसार हा खून ठरत नाही. त्यामुळे बालाजी खुनातून निर्दोष सुटला असला तरी कायद्याच्या दृष्टाने तो वेडा ठरत असल्याने त्याला समाजात मोकळे सोडणे हिताचे होणार नाही. त्यामुळे सध्या औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बालाजीला येरवडा मनोरुग्णालयात दाखल करून तेथे त्याच्यावर योग्य ते उपचार केले जावेत, असा आदेश खंडपीठाने दिला.विशेष म्हणजे सत्र न्यायालयात किंवा अपिलातही आरोपीच्या वकिलाने त्याने ही हत्या वेडाच्या भरात केल्याचा बचावाचा मुद्दा अजिबात मांडला नव्हता. उलट अपिलात तर त्याच्या वकिलाने बालाजीकडून तुकारामची हत्या झाली असली तरी त्याला ठार मारण्याचा त्याचा हेतू नव्हता. परिणामी त्यास सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरवावे, अशी विनंती केली होती. बालाजी वेडा नसल्याचा निर्वाळा येरवड्यातील डॉक्टरांनी आधी दिला होता, हेही लक्षणीय आहे. मात्र खंडपीठाने खंडपीठाने सर्व साक्षीपुराव्यांची बाकराईने छाननी करून असे नमूद केले की, एरवी फौजदारी खटल्यात आरोपीवरील गुन्हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी अभियोग पक्षावर असते व यासाठी नि:संशय पुरावे हा निकष असतो.मात्र जेव्हा आरोपीने वेडाच्या भरात गुन्हा केल्याचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा ते सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर येते. तरीही ज्यातून तशी प्रबळ शक्यता दिसून येऊन न्यायालयाच्या मनात संशय निर्माण होईल, एवढा पुरावा त्यासाठी पुरेसा ठरतो. प्रस्तुत प्रकरणात तशी प्रबळ शक्यता वाटावी, अशी परिस्थिती दिसते.का ठरला बालाजी वेडा?बालाजीने तुकारामची हत्या केली तेव्हा त्याचे मन ताळयावर नव्हते असा निष्कर्ष काढताना खंडपीठाने पुढील बाबी विचारात घेतल्या:एक रुपयांचा पेप्सीगोळा फुकट न देण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून बालाजीने तुकारामच्या डोक्यात दगड घातला.हे घडत असताना तेथे असलेल्या बघ्यांपैकी कोणीही मध्ये पडण्यास धजावले नाही.भावास बोलावल्यावर त्याने बालाजीला जमिनीवर आडवे पाडून त्याचे हात-पाय बांधले तेव्हा कुठे तो आटोक्यात आला.रिमांडसाठी दंडाधिकाºयांपुढे उभे केले तेव्हा बालाजीच्या वेडाचा उल्लेख झाला होता व दंडाधिकाºयांनी त्यासा तपासणीसाठी लातूर जिल्हा रुग्णालयात पाठविले होते.बालाजीने बचावासाठी काहीच केले नाही. त्याला सरकारकडून वकील दिला गेला.खटल्यात काही साक्षीदारांनी बालाजीच्या वेड्यासारख्या वागण्याचे दाखले दिले होते.खटला सुरु असताना किंवा शिक्षा झाल्यावरही बालाजीला भेटायला त्याचा कोणीही नातेवाईक फिरकलाही नाही.खटला सुरु असताना किंवा शिक्षा झाल्यावरही बालाजीला भेटायला त्याचा कोणीही नातेवाईक फिरकलाही नाही.

टॅग्स :Courtन्यायालय