शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोल्हापुरात टोल रद्द केल्याची अधिसूचना जारी

By admin | Updated: February 5, 2016 04:12 IST

शहरातून आत व बाहेर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नऊ नाक्यांवर द्यावा लागणारा ‘टोल रद्द’ केल्याची अधिसूचना जारी करून राज्य सरकारने टोलला कायमची मूठमाती दिली.

कोल्हापूर : शहरातून आत व बाहेर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नऊ नाक्यांवर द्यावा लागणारा ‘टोल रद्द’ केल्याची अधिसूचना जारी करून राज्य सरकारने टोलला कायमची मूठमाती दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नगरविकास विभागातर्फे बुधवारी काढलेल्या अधिसूचनेवर राज्यपालांंची स्वाक्षरी व ती राजपत्रात प्रसिद्ध केल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासूनचा टोलविरोधी उद्रेकही आता कायमचा शांत होणार आहे. भाजपा सरकार राज्यात सत्तेत येण्यापूर्वी कोल्हापूरचा ‘टोल रद्द’ करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्याच्या दिवसापासून तो रद्द करण्याचे आमचे प्रयत्न होते. २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘टोल रद्द’ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. बुधवारी राज्यपाल यांच्या सहीने अधिसूचना निघाली. टोल कायमचा रद्द झाला, असे पाटील यांनी सांगितले. ‘टोल रद्द’ करण्याचा निर्णय घेताना सरकारने तामसेकर समितीचा अहवाल विचारात घेतला. सावंत समिती कोणतीही भरपाई देऊ नका, असे सांगत होती. तामसेकर समितीने झालेली कामे, अपूर्ण कामे, ‘आयआरबी’ला दिलेली जागा याचा हिशेब करून ४५९ कोटी रुपये राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ‘आयआरबी’ला दिले जातील. आता राज्य सरकार महामंडळाला सर्व निधी देईल, असेही पाटील यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत झालेल्या आंदोलनात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, ते काढून टाकण्याच्याबाबत सरकारची भूमिका काय आहे, असे विचारता पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारने सन २०१०च्या आधी आणि पाच लाखांपेक्षा कमी नुकसान झालेले होते अशा राजकीय आंदोलनाचे गुन्हे काढून टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता सन २०१०च्या पूर्वीऐवजी २०१५च्या आधी असा बदल केला की असंख्य गुन्हे काढून टाकणे सोपे होईल. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी रविवारी चर्चा करणार आहे. कोल्हापूर-सांगली रस्ता अंशत: टोलमुक्त कोल्हापूर-सांगली रस्ता हा खासगीकरणातून करण्यात येत आहे. या रस्त्यावरून धावणाऱ्या सर्व प्रकारच्या लहान वाहनांना (एल.एम.व्ही.) तसेच एस.टी. बस व शालेय बसेसना टोलमधून वगळण्यात येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेले ५ व पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील ५ टोलनाक्यांवरील टोलवसुली रद्द करण्यासंदर्भात शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल मिळाला आहे. या समितीने टोल रद्द करण्यासंबंधी विविध पर्याय सुचविले असून, त्यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.बिहारचा निकाल लागला की दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महामंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आम्ही निर्णय घेऊ असे आपणच जाहीर केले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा केल्यावर मंत्री पाटील यांनी राजकारणात एक अधिक एक म्हणजे दोन असे घडत नसल्याचे उत्तर दिले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाई भाजपाने सूडबुद्धीने केली असल्याची टीका होत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता पाटील यांनी ‘जय हिंद.. जय महाराष्ट्र..’ म्हणत पत्रकार परिषदच आटोपती घेतली.