शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रोजगार हमी कायदा रद्द करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2016 02:27 IST

केंद्र सरकारच्या महात्मा गांधी नॅशनल ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ अंतर्गत ग्रामीण नागरिकांना महाराष्ट्र रोजगार हमी कायदा १९७७ प्रमाणेच लाभ मिळत असल्याने राज्य

मुंबई : केंद्र सरकारच्या महात्मा गांधी नॅशनल ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ अंतर्गत ग्रामीण नागरिकांना महाराष्ट्र रोजगार हमी कायदा १९७७ प्रमाणेच लाभ मिळत असल्याने राज्य सरकारचा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. राज्य सरकारने केलेल्या कायद्याऐवजी केंद्र सरकारचा कायदा सुरू ठेवावा आणि राज्य सरकारचा कायदा रद्द करावा. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत राज्य सरकारच्या कायद्यांतर्गत निधी जमा न करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी आम आदमी लोकमंचने जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकेद्वारे करण्यात आलेले आरोप सामान्य स्वरूपाचे असल्याचे म्हणत खंडपीठाने ही याचिका फेटाळली. ‘केंद्र आणि राज्य सरकारचा कायदा सामान्यांच्या हितासाठीच आहे. नागरिकांना दोन्ही कायद्यांंतर्गत फायदा मिळत असेल तर आणि दोन्ही कायद्यांत विसंगती नसेल, तर याचिकाकर्त्यांची मागणी मान्य कशी करायची,’ असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.‘निधीचा गैरवापर केल्याचा किंवा निधी अन्य कारणासाठी वळता केल्याचा आरोप असेल तर सामान्य नागरिक ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ शकतात. कोणतीही अनियमितता निदर्शनास आणून न दिल्यामुळे आम्ही ही याचिका फेटाळत आहोत,’ असे खंडपीठाने म्हटले. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, १९७७ एका वर्षानंतर अंमलात आला. ग्रामीण भागातील रोजगार उपलब्ध करून देणे, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारने २००५मध्ये नवा कायदा काढला. त्यामुळे राज्य सरकारचा कायदा अस्तित्वात असणे आवश्यक नाही. दोन्ही कायद्यांचा हेतू ग्रामीण भागातील जनतेला रोजगार पुरवणे आहे. त्यांना कमीतकमी अर्थार्जन मिळावे, हा यामागचा हेतू आहे. गेली कित्येक वर्षे या योजनांचा लाभ लोकांना मिळत आहे, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)