शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

तब्बल ९ कोटींचे पॅकेज नाकारत घेतली दीक्षा; संयमश्रीजींची प्रेरणादायी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 07:58 IST

संयमश्रीजी महाराज यांची प्रेरणादायी कहाणी, मी बरोबर आहे. माझेच खरे आहे. इतरांच्या मतांना माझ्या लेखी काहीच किंमत नाही. जगातल्या अशांततेच्या मुळाशी याच गोष्टी कारणीभूत आहेत.

जिजाबराव वाघ  चाळीसगाव  (जि. जळगाव) : कॅलिफोर्निया येथील कंपनीने  व्यक्तिमत्त्व विकासासंबंधीचा जॉब ऑफर करताना वार्षिक ९ कोटी रुपयांचे घसघशीत पॅकेज दिले होते.  मात्र, यावर पाणी सोडत संयमश्रीजी म. सा. यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी दीक्षा घेतली आणि धर्मप्रसारासाठी वयाच्या २२ व्या वर्षी स्वतःला झोकून दिले आहे. राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे, हे विशेष. 

श्री श्वेतांबर जैन संघाच्या वतीने येथील अरिहंत मंगल कार्यालयात १३ पासून चातुर्मासानिमित्त संत्सग सोहळा होत आहे. त्यासाठी संयमश्रीजी म. सा. यांचे येथे शनिवारी आगमन झाले. विशेष म्हणजे, यावर्षी हा सोहळा प्रथमच जैन समाजासह इतर समाज घटकांसाठीही आयोजित करण्यात आला आहे. संयमश्रीजी म. सा. यांनी दीक्षा घेण्याअगोदरचा प्रवासपट ‘लोकमत’शी बोलताना उलगडला. त्यांना भाऊ आणि  बहीण आहेत. त्या सुखवस्तू परिवारातील आहेत. वादविवाद, गायन, संभाषण, क्रीडा आदी प्रकारांमध्ये त्यांनी आजवर उल्लेखनीय यश मिळविले आहे.  

संयमश्रीजी म. सा. म्हणाल्या की, आठ वर्षं परिवाराशी आणि स्वतःच्या मनाशी संघर्ष करून अखेरीस दीक्षा घेतली. एकदा तुम्ही तुमचे ध्येय निवडा. त्याच्याशी प्रामाणिक राहा. त्यामुळे तुमच्यात संघर्षाची प्रेरणा निर्माण होते. सन २०१३ पासून आपला दीक्षा घेण्याचा संघर्ष सुरू झाला. यासाठी  परिवाराचे मनपरिवर्तन करण्यासाठी आठ वर्षं लागली.  माझी मनाची तयारी मात्र अगोदरच झाली होती. यासाठी  काकांचे मिळालेले प्रोत्साहन मोलाचे ठरले. संतांचा संपर्क, जैन तत्त्वज्ञान यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. शांतता, समाधान शोधण्याऐवजी ते मानण्यावर अधिक असल्याचे  त्यांनी सांगितले. यावेळी अक्षयश्री अ.खा., संसिध्दीजी म.सा., विभवश्री म.सा. यादेखील उपस्थित होत्या. 

यशस्वी जीवनाची ‘ही’ त्रिसूत्री आहे गुरुकिल्ली मोबाइल युगात संवादही ठेवा. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घाला. साधू-संत यांचा संत्सग, सद्गुरुंचा संपर्क या गोष्टी अंतिमतः  समाधानासह शांततेकडेच घेऊन जातात. कष्ट करण्याची तयारी, थोरा-मोठ्यांचा आदर आणि सकारात्मकता ही त्रिसूत्री यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. - संयमश्रीजी महाराज म.सा.