शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

पोलिस पाटील भरतीतील गैरप्रकारांना बसणार लगाम

By admin | Updated: August 29, 2014 01:55 IST

अधिकारांचे विकेंद्रीकरण : उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होणार तीन सदस्यीय समिती

अकोला : राज्यात पोलिस पाटील पदांच्या नियुक्तीसाठी ८0 गुणांची लेखी आणि २0 गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाते. या भरतीत होणारा गैरप्रकार थांबविण्यासाठी शासनाने अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. त्यानुसार पूर्वी केवळ उपविभागीय अधिकार्‍यांकडे असलेले अधिकार हे उपविभागीय स्तरावरील तीन सदस्यीय समितीकडे राहतील. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर पोलिस पाटील नियुक्त केला जातो. हा शासनाने मानधनावर नियुक्त केलेला प्रतिनिधी असल्यामुळे शासकीय पातळीवर त्यांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत ही परीक्षा केवळ उपविभागीय अधिकार्‍यांच्या स्तरावर घेतली जात असे. तुटपुंज्या मानधनावर पाच वर्षांसाठी नियुक्ती करताना यामध्ये मोठय़ाप्रमाणावर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत राज्य उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून तहसीलदार, तर सदस्यपदी उपविभागीय पोलीस अधिकारी असतील. *तात्काळ प्रभावाने आदेश लागूपोलिस पाटील नियुक्तीसंदर्भात राज्य शासनाच्या गृहविभागाने २७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्याचे निर्देश सहसचिव चारूशीला तांबेकर यांनी दिले आहेत.