शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा!

By admin | Updated: May 20, 2016 02:28 IST

पवना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली

पवनानगर : पवना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्या वेळी शेतकऱ्यांनी ‘अगोदर पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा,’ अशी जोरदार मागणी केली. अधिकाऱ्यांशी शाब्दिक वादावादीही झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. या प्रश्नी शुक्रवारी बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र व हिंजवडी आयटी पार्क या नागरी वस्तीतील भागाला व औद्योगिक क्षेत्राला मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. या कामांची पाहणी खासदार बारणे यांच्यासह तहसीलदार शरद पाटील, पवना जलसिंचन अधिकारी श्री. मटकरी, पवना जलसिंचन शाखाधिकारी मनोहर खाडे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शरद हुलावळे, अमित कुंभार यांनी केली. (वार्ताहर)>शेतकऱ्यांकडून शासनाचा निषेधगेली चाळीस वर्षे पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने शेतकरी संतप्त आहेत. लोकसहभागातून गाळ काढला जात आहे, ही माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील शेतकरी गाळ काढण्याच्या ठिकाणी आले. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत गाळ काढू नये, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना केली. काम होऊ देणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली. या वेळी आपल्या भावना शासनाला कळवून न्याय दिला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी शांत झाले.$$्रिपुनर्वसनाचा प्रश्नपवना धरणातील सुमारे साडेतीनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, उर्वरित साडेआठशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. शेतकरी संघटनांनी केलेल्या पाहणीत आता पुनर्वसन शेतकऱ्यांची संख्या बाराशेवर गेली आहे. या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करायलाच हवे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे पुनर्वसन मावळ परिसरातच करून प्रत्येकाला एक एकर क्षेत्र द्यावे, तसेच महापालिकेत नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण ठेवावे, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या.