शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा!

By admin | Updated: May 20, 2016 02:28 IST

पवना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली

पवनानगर : पवना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्या वेळी शेतकऱ्यांनी ‘अगोदर पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा,’ अशी जोरदार मागणी केली. अधिकाऱ्यांशी शाब्दिक वादावादीही झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. या प्रश्नी शुक्रवारी बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र व हिंजवडी आयटी पार्क या नागरी वस्तीतील भागाला व औद्योगिक क्षेत्राला मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. या कामांची पाहणी खासदार बारणे यांच्यासह तहसीलदार शरद पाटील, पवना जलसिंचन अधिकारी श्री. मटकरी, पवना जलसिंचन शाखाधिकारी मनोहर खाडे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शरद हुलावळे, अमित कुंभार यांनी केली. (वार्ताहर)>शेतकऱ्यांकडून शासनाचा निषेधगेली चाळीस वर्षे पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने शेतकरी संतप्त आहेत. लोकसहभागातून गाळ काढला जात आहे, ही माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील शेतकरी गाळ काढण्याच्या ठिकाणी आले. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत गाळ काढू नये, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना केली. काम होऊ देणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली. या वेळी आपल्या भावना शासनाला कळवून न्याय दिला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी शांत झाले.$$्रिपुनर्वसनाचा प्रश्नपवना धरणातील सुमारे साडेतीनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, उर्वरित साडेआठशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. शेतकरी संघटनांनी केलेल्या पाहणीत आता पुनर्वसन शेतकऱ्यांची संख्या बाराशेवर गेली आहे. या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करायलाच हवे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे पुनर्वसन मावळ परिसरातच करून प्रत्येकाला एक एकर क्षेत्र द्यावे, तसेच महापालिकेत नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण ठेवावे, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या.