शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मिठागरातील भूमिपुत्रांचे पुनर्वसन करा!

By admin | Updated: May 18, 2016 03:56 IST

अनेक वर्षांपासून झोपडीवजा घरे बांधून वास्तव्य करणाऱ्या भूमिपुत्रांना पालिकेने रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हुसकावून लावण्याचा कट रचला

भार्इंदर : मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील गावदेवीनगर या मिठागराच्या भागात अनेक वर्षांपासून झोपडीवजा घरे बांधून वास्तव्य करणाऱ्या भूमिपुत्रांना पालिकेने रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हुसकावून लावण्याचा कट रचला आहे. या सर्व भूमिपुत्रांचे पुनर्वसन पालिका जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत त्यांची घरे तोडू नका, अशी मागणी माजी आ. विवेक पंडित यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.हवालदिल झालेल्या या भूमिपुत्रांनी हक्काचे घर मिळावे, यासाठी पंडित यांच्याकडे धाव घेतली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी ते पालिकेत आले होते. गावदेवीनगर या मिठागराच्या जागेत वसलेल्या भूमिपुत्रांची घरे मिठागरामुळे सीआरझेडबाधित आहेत. या भूमिपुत्रांना घरांचा विकास न करताच झोपडीवजा घरांत वास्तव्य करावे लागत आहे. येथील सुमारे २५० एकर मिठागरांची जागा एका बड्या बिल्डरला आर्थिक तडजोडीतून देण्यात आल्याने हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मिठागर सीआरझेडबाधित असतानाही पालिका येथे २००० मधील मंजूर विकास आराखड्यानुसार राजकीय दबावातून विकासकाचे हित जोपासण्यासाठी रस्ता तयार करण्याचा घाट घालत आहे. त्यात ३६ भूमिपुत्रांची घरे आणि दुकाने बाधित होत असल्याने त्यांना पालिकेने स्थलांतरित करण्याचे ठरवले आहे. कनाकिया येथे विकसित केलेल्या इमारतींत त्या भूमिपुत्रांना पालिका बेघरांसाठी घर या योजनेंतर्गत घरे देणार आहे. बाधितांनी कागदपत्रे सादर केल्यास त्यांना घरे देण्याचे पालिकेने मान्य केले असले तरी २ घरे, ६ दुकाने अपात्र ठरवली आहेत. (प्रतिनिधी) >विवेक पंडीत यांची मागणीदुकानदारांकडे २००० पूर्वीचे गुमास्ता लायसन्स नसल्याचा दावा करून त्यांना अपात्र ठरवल्याने ते हवालदिल झाले आहेत. या सर्व बाधितांना केवळ निर्धारित कालावधीतील कागदपत्रे नसल्याचे कारण देत वारसा हक्काचा दावा अमान्य करणे योग्य नाही. अनेक वर्षांपासूनचे वास्तव्य असलेली कोणतीही कागदपत्रे वास्तव्याचा ठोस पुरावा मानून सर्व भूमिपुत्रांना कायमस्वरूपी घरे दिल्यानंतरच त्यांची घरे तोडण्यात यावीत.