शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

सेनेत मंत्र्यांचा प्रादेशिक अनुशेष!

By admin | Updated: April 5, 2017 06:00 IST

शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मुंबईचे, एक ठाण्याचे तर राज्यमंत्र्यांपैकी यवतमाळ, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि जालना या सहा जिल्ह्यांचे प्रत्येकी एक राज्यमंत्री आहेत

यदु जोशी,मुंबई- शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मुंबईचे, एक ठाण्याचे तर राज्यमंत्र्यांपैकी यवतमाळ, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि जालना या सहा जिल्ह्यांचे प्रत्येकी एक राज्यमंत्री आहेत. मोठ्या संख्येने आमदार निवडून देणारे बरेच जिल्हे मंत्रिपदाबाबत मात्र कोरडे आहेत. जयप्रकाश मुंदडा, विजय औटी, संदीपान भुमरे या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळू शकलेले नाही. मुंदडा हे १९९५ मधील युती सरकारमध्ये मंत्री होते. औटी यांनी अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा फडकावत ठेवला आहे. विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भात शिवसेनेचा मंत्री नाही. पश्चिम विदर्भात संजय राठोड हे एकटेच आणि तेही राज्यमंत्री आहेत. मुंबईत शिवसेनेचे तब्बल १४ आमदार आहेत, पण त्यांच्यापैकी कोणीही मंत्री नाही. मुंबईतील सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डॉ. दीपक सावंत हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. कदम हे मूळ कोकणातील असले तरी ते मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून केवळ विजय शिवतारे यांच्याकडे राज्यमंत्रिपद आहे. बाकी जिल्हे कोरडे आहेत. शिवसेनेला सहा आमदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याची झोळी शिवसेना मंत्र्यांबाबत तरी रिकामीच आहे. उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील आणि दादा भुसे हे दोघे राज्यमंत्री आहेत. मराठवाड्यात पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर असे भाजपाचे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे असे वजनदार नेते भाजपाकडे आहेत. त्या तुलनेने मराठवाड्यात शिवसेनेचे केवळ एक राज्यमंत्री आहेत. शिवसेनेचे काही ज्येष्ठ मंत्री आमची कामे करत नाहीत, अशी तक्रार पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अलीकडेच केलेली आहे. तसेच, विधान परिषदेच्या ऐवजी विधानसभेच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी द्यावी, असा अनेकांचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे हे काही मंत्र्यांना घरी बसवून नव्यांना संधी देतील का याबाबत आमदारांमध्ये उत्सुकता आहे. >मराठवाड्यात एक राज्यमंत्रिपदमराठवाडा हा मुंबईनंतर शिवसेनेचा गड समजला जातो. मात्र अख्ख्या मराठवाड्यातून एकच म्हणजे अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री आहेत. औरंगाबादमध्ये पक्षाचे तीन तर नांदेडमध्ये चार आमदार आहेत पण मंत्रिपद मात्र नाही. शिवसेनेचे प्राबल्य राहिलेल्या कोकणच्या वाट्याला केवळ एक राज्यमंत्रिपद आलेले आहे. >शिवसेनेचे विद्यमान मंत्रीमुंबई : सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम,डॉ. दीपक सावंत (कॅबिनेट)ठाणे : एकनाथ शिंदे (कॅबिनेट)जळगाव : गुलाबराव पाटील, यवतमाळ - संजय राठोड, जालना - अर्जुन खोतकर, नाशिक - दादा भुसे, पुणे - विजय शिवतारे, सिंधुदुर्ग - दीपक केसरकर (सर्व राज्यमंत्री)