शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

सेनेत मंत्र्यांचा प्रादेशिक अनुशेष!

By admin | Updated: April 5, 2017 06:00 IST

शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मुंबईचे, एक ठाण्याचे तर राज्यमंत्र्यांपैकी यवतमाळ, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि जालना या सहा जिल्ह्यांचे प्रत्येकी एक राज्यमंत्री आहेत

यदु जोशी,मुंबई- शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मुंबईचे, एक ठाण्याचे तर राज्यमंत्र्यांपैकी यवतमाळ, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि जालना या सहा जिल्ह्यांचे प्रत्येकी एक राज्यमंत्री आहेत. मोठ्या संख्येने आमदार निवडून देणारे बरेच जिल्हे मंत्रिपदाबाबत मात्र कोरडे आहेत. जयप्रकाश मुंदडा, विजय औटी, संदीपान भुमरे या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळू शकलेले नाही. मुंदडा हे १९९५ मधील युती सरकारमध्ये मंत्री होते. औटी यांनी अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा फडकावत ठेवला आहे. विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भात शिवसेनेचा मंत्री नाही. पश्चिम विदर्भात संजय राठोड हे एकटेच आणि तेही राज्यमंत्री आहेत. मुंबईत शिवसेनेचे तब्बल १४ आमदार आहेत, पण त्यांच्यापैकी कोणीही मंत्री नाही. मुंबईतील सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डॉ. दीपक सावंत हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. कदम हे मूळ कोकणातील असले तरी ते मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून केवळ विजय शिवतारे यांच्याकडे राज्यमंत्रिपद आहे. बाकी जिल्हे कोरडे आहेत. शिवसेनेला सहा आमदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याची झोळी शिवसेना मंत्र्यांबाबत तरी रिकामीच आहे. उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील आणि दादा भुसे हे दोघे राज्यमंत्री आहेत. मराठवाड्यात पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर असे भाजपाचे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे असे वजनदार नेते भाजपाकडे आहेत. त्या तुलनेने मराठवाड्यात शिवसेनेचे केवळ एक राज्यमंत्री आहेत. शिवसेनेचे काही ज्येष्ठ मंत्री आमची कामे करत नाहीत, अशी तक्रार पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अलीकडेच केलेली आहे. तसेच, विधान परिषदेच्या ऐवजी विधानसभेच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी द्यावी, असा अनेकांचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे हे काही मंत्र्यांना घरी बसवून नव्यांना संधी देतील का याबाबत आमदारांमध्ये उत्सुकता आहे. >मराठवाड्यात एक राज्यमंत्रिपदमराठवाडा हा मुंबईनंतर शिवसेनेचा गड समजला जातो. मात्र अख्ख्या मराठवाड्यातून एकच म्हणजे अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री आहेत. औरंगाबादमध्ये पक्षाचे तीन तर नांदेडमध्ये चार आमदार आहेत पण मंत्रिपद मात्र नाही. शिवसेनेचे प्राबल्य राहिलेल्या कोकणच्या वाट्याला केवळ एक राज्यमंत्रिपद आलेले आहे. >शिवसेनेचे विद्यमान मंत्रीमुंबई : सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम,डॉ. दीपक सावंत (कॅबिनेट)ठाणे : एकनाथ शिंदे (कॅबिनेट)जळगाव : गुलाबराव पाटील, यवतमाळ - संजय राठोड, जालना - अर्जुन खोतकर, नाशिक - दादा भुसे, पुणे - विजय शिवतारे, सिंधुदुर्ग - दीपक केसरकर (सर्व राज्यमंत्री)