शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सेनेत मंत्र्यांचा प्रादेशिक अनुशेष!

By admin | Updated: April 5, 2017 06:00 IST

शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मुंबईचे, एक ठाण्याचे तर राज्यमंत्र्यांपैकी यवतमाळ, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि जालना या सहा जिल्ह्यांचे प्रत्येकी एक राज्यमंत्री आहेत

यदु जोशी,मुंबई- शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मुंबईचे, एक ठाण्याचे तर राज्यमंत्र्यांपैकी यवतमाळ, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि जालना या सहा जिल्ह्यांचे प्रत्येकी एक राज्यमंत्री आहेत. मोठ्या संख्येने आमदार निवडून देणारे बरेच जिल्हे मंत्रिपदाबाबत मात्र कोरडे आहेत. जयप्रकाश मुंदडा, विजय औटी, संदीपान भुमरे या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळू शकलेले नाही. मुंदडा हे १९९५ मधील युती सरकारमध्ये मंत्री होते. औटी यांनी अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा फडकावत ठेवला आहे. विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भात शिवसेनेचा मंत्री नाही. पश्चिम विदर्भात संजय राठोड हे एकटेच आणि तेही राज्यमंत्री आहेत. मुंबईत शिवसेनेचे तब्बल १४ आमदार आहेत, पण त्यांच्यापैकी कोणीही मंत्री नाही. मुंबईतील सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डॉ. दीपक सावंत हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. कदम हे मूळ कोकणातील असले तरी ते मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून केवळ विजय शिवतारे यांच्याकडे राज्यमंत्रिपद आहे. बाकी जिल्हे कोरडे आहेत. शिवसेनेला सहा आमदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याची झोळी शिवसेना मंत्र्यांबाबत तरी रिकामीच आहे. उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील आणि दादा भुसे हे दोघे राज्यमंत्री आहेत. मराठवाड्यात पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर असे भाजपाचे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे असे वजनदार नेते भाजपाकडे आहेत. त्या तुलनेने मराठवाड्यात शिवसेनेचे केवळ एक राज्यमंत्री आहेत. शिवसेनेचे काही ज्येष्ठ मंत्री आमची कामे करत नाहीत, अशी तक्रार पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अलीकडेच केलेली आहे. तसेच, विधान परिषदेच्या ऐवजी विधानसभेच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी द्यावी, असा अनेकांचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे हे काही मंत्र्यांना घरी बसवून नव्यांना संधी देतील का याबाबत आमदारांमध्ये उत्सुकता आहे. >मराठवाड्यात एक राज्यमंत्रिपदमराठवाडा हा मुंबईनंतर शिवसेनेचा गड समजला जातो. मात्र अख्ख्या मराठवाड्यातून एकच म्हणजे अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री आहेत. औरंगाबादमध्ये पक्षाचे तीन तर नांदेडमध्ये चार आमदार आहेत पण मंत्रिपद मात्र नाही. शिवसेनेचे प्राबल्य राहिलेल्या कोकणच्या वाट्याला केवळ एक राज्यमंत्रिपद आलेले आहे. >शिवसेनेचे विद्यमान मंत्रीमुंबई : सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम,डॉ. दीपक सावंत (कॅबिनेट)ठाणे : एकनाथ शिंदे (कॅबिनेट)जळगाव : गुलाबराव पाटील, यवतमाळ - संजय राठोड, जालना - अर्जुन खोतकर, नाशिक - दादा भुसे, पुणे - विजय शिवतारे, सिंधुदुर्ग - दीपक केसरकर (सर्व राज्यमंत्री)