शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

दंड घेऊन बांधकामे नियमित

By admin | Updated: August 2, 2016 05:37 IST

महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रशमन शुल्क (कम्पाऊंडिंग चार्जेस) आणि दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

यदु जोशी,

मुंबई- राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रशमन शुल्क (कम्पाऊंडिंग चार्जेस) आणि दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या शिवाय, यापुढे अनधिकृत बांधकामे होऊच नयेत यासाठी प्रशासकीय सुधारणा करताना काही नियम अत्यंत कडक करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने या संदर्भात दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये या बाबी प्रस्तावित करण्यात आल्या असून उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की ज्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम झालेले आहे त्या भूखंडाच्या रेडिरेकनरच्या दराच्या १० टक्के प्रशमन शुल्क आकारले जाईल. तसेच बांधकामाच्या एकूण मूल्याच्या १० टक्के रक्कम ही दंड म्हणून शासनाकडे भरावी लागेल.नियमानुसार मार्जिन सोडून बांधकाम केलेले आहे की नाही ते बघितले जाईल. बांधकामाच्या परवानगीसाठी नियमानुसार शुल्क भरलेले नसेल तर ते भरावे लागणार आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करताना कोणतेही प्रीमियम दिले जाणार नाही. तसेच वाढीव एफएसआयदेखील दिला जाणार नाही. त्या शहरासाठी देय असलेल्या एफएसआयच्या मर्यादेतील बांधकामच अधिकृत करण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्तीचे बांधकाम केलेले असेल तर ते अनुज्ञेय नसेल.>परवडणाऱ्या घरांची सर्व पालिकांत तरतूदतसेच, २० टक्के जमिनीवर आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरे बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने अलिकडेच या बाबतची अधिसूचना जारी केली आहे. हे धोरण एमआयडीसीमधील जमिनींसाठी लागू नसेल; केवळ त्या बाहेरील उद्योगांच्या जमिनींसाठीच ते लागू असेल.नवी मुंबईसाठी पहिल्यांदाच‘आय टू आर’चे धोरणराज्यातील सर्व महापालिकांच्या क्षेत्रात उद्योगांच्या ठिकाणी निवासी वसाहती उभारण्याचे (इंडस्ट्री टू रेसिडेन्शियल) धोरण आता नवी मुंबई महापालिका क्षेत्रासाठीदेखील लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या परिसरात खासगी उद्योगांना आपल्या उद्योगांच्या ठिकाणी निवासी वसाहती उभारता येतील. या निर्णयामुळे काही बड्या उद्योजकांना मोठा लाभ होणार आहे.