शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही भरती नियम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 05:53 IST

केवळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयाचा पाल्य आहे म्हणून भरती नियम किंवा सामान्य भरती प्रक्रिया डावलून सरकारी नोकरीत थेट भरती केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.

मुंबई - केवळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयाचा पाल्य आहे म्हणून भरती नियम किंवा सामान्य भरती प्रक्रिया डावलून सरकारी नोकरीत थेट भरती केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.वडिलांच्या जागेवर थेट आपली नियुक्ती करण्यात यावी, यासाठी विकास सावंत यांनी महाराष्ट्र प्रशासन लवाद (मॅट)मध्ये धाव घेतली. मात्र मॅटने विकास सावंत यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरमाणी व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. खंडपीठाने मॅटचा १७ एप्रिल २०१४ चा आदेश योग्य ठरवला.याचिकेनुसार, ते अनुसूचित जातीचे असल्याने त्यांच्याबरोबर भेदभाव केला जात आहे. विकास सावंत यांचे वडील १ सप्टेंबर २००२ रोजी निवृत्त झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जागेवर मुलाची नियुक्ती करण्यासाठी ४ जानेवारी २००२ रोजी सेंट्रल प्रेस, मुंबईच्या व्यवस्थापकांना पत्र लिहिले. त्यासोबत त्यांनी राज्य सरकारची १४ एप्रिल १९८१ व मार्च १९९० ची अधिसूचना जोडली.दोन्ही अधिसूचनांनुसार, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांच्या पाल्यांना थेट सरकारी नोकरीत रुजू करून घेतले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी अधिसूचनांमधील अटी व शर्तींची पूर्तता करणे बंधनकारक आहे.याचिकाकर्त्यांच्या वकील नीता गायकवाड यांनी याचिकाकर्ते विकास सावंत यांनी दोन्ही अधिसूचनांमधील अटी व शर्तींची पूर्तता केल्याने त्यांना याच अधिसूचनांनुसार त्यांच्या वडिलांच्या जागी थेट सेवेत रुजू करून घेतले पाहिजे. परंतु, सरकारच्या संबंधित विभागाने त्यांना भरती नियम डावलून थेट सेवेत रुजू करून घेण्यास नकार दिला. याच अधिसूचनांच्या आधारावर सहा जणांना भरती नियम डावलून नोकरी देण्यात आल्याचेही गायकवाड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.सरकारी वकिलांनी ही बाब चुकीची असल्याचे न्यायालयाला सांगितले. या अधिसूचनांच्या आधारावर सहा जणांना स्थानिक एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नाव नोंदविण्यासाठी सवलत देण्यात आली. या अधिसूचनांद्वारे, चौथ्या श्रेणीतील कर्मचाºयांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेचे नियम डावलून थेट सेवेत रुजू करून घेण्याची तरतूद नाही.मॅटचे आदेश योग्यदोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाचे या दोन्ही अधिसूचना समर्थन करत नाहीत. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांच्या पाल्यांची त्यांच्या पालकांच्या जागेवर थेट नियुक्ती करण्यासंदर्भात यामध्ये तरतूद नाही. मॅटने दिलेला आदेश योग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने विकास सावंत यांची याचिका निकाली काढली.

टॅग्स :Employeeकर्मचारीnewsबातम्या