शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही भरती नियम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 05:53 IST

केवळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयाचा पाल्य आहे म्हणून भरती नियम किंवा सामान्य भरती प्रक्रिया डावलून सरकारी नोकरीत थेट भरती केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.

मुंबई - केवळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयाचा पाल्य आहे म्हणून भरती नियम किंवा सामान्य भरती प्रक्रिया डावलून सरकारी नोकरीत थेट भरती केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.वडिलांच्या जागेवर थेट आपली नियुक्ती करण्यात यावी, यासाठी विकास सावंत यांनी महाराष्ट्र प्रशासन लवाद (मॅट)मध्ये धाव घेतली. मात्र मॅटने विकास सावंत यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरमाणी व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. खंडपीठाने मॅटचा १७ एप्रिल २०१४ चा आदेश योग्य ठरवला.याचिकेनुसार, ते अनुसूचित जातीचे असल्याने त्यांच्याबरोबर भेदभाव केला जात आहे. विकास सावंत यांचे वडील १ सप्टेंबर २००२ रोजी निवृत्त झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जागेवर मुलाची नियुक्ती करण्यासाठी ४ जानेवारी २००२ रोजी सेंट्रल प्रेस, मुंबईच्या व्यवस्थापकांना पत्र लिहिले. त्यासोबत त्यांनी राज्य सरकारची १४ एप्रिल १९८१ व मार्च १९९० ची अधिसूचना जोडली.दोन्ही अधिसूचनांनुसार, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांच्या पाल्यांना थेट सरकारी नोकरीत रुजू करून घेतले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी अधिसूचनांमधील अटी व शर्तींची पूर्तता करणे बंधनकारक आहे.याचिकाकर्त्यांच्या वकील नीता गायकवाड यांनी याचिकाकर्ते विकास सावंत यांनी दोन्ही अधिसूचनांमधील अटी व शर्तींची पूर्तता केल्याने त्यांना याच अधिसूचनांनुसार त्यांच्या वडिलांच्या जागी थेट सेवेत रुजू करून घेतले पाहिजे. परंतु, सरकारच्या संबंधित विभागाने त्यांना भरती नियम डावलून थेट सेवेत रुजू करून घेण्यास नकार दिला. याच अधिसूचनांच्या आधारावर सहा जणांना भरती नियम डावलून नोकरी देण्यात आल्याचेही गायकवाड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.सरकारी वकिलांनी ही बाब चुकीची असल्याचे न्यायालयाला सांगितले. या अधिसूचनांच्या आधारावर सहा जणांना स्थानिक एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नाव नोंदविण्यासाठी सवलत देण्यात आली. या अधिसूचनांद्वारे, चौथ्या श्रेणीतील कर्मचाºयांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेचे नियम डावलून थेट सेवेत रुजू करून घेण्याची तरतूद नाही.मॅटचे आदेश योग्यदोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाचे या दोन्ही अधिसूचना समर्थन करत नाहीत. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांच्या पाल्यांची त्यांच्या पालकांच्या जागेवर थेट नियुक्ती करण्यासंदर्भात यामध्ये तरतूद नाही. मॅटने दिलेला आदेश योग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने विकास सावंत यांची याचिका निकाली काढली.

टॅग्स :Employeeकर्मचारीnewsबातम्या